
तिरोडा -अर्जुनी रस्त्यावर रेल्वे पुलाचे बांधकाम मागील दोन वर्षापासून महारेल विभागामार्फत सुरु असल्याने या रस्तावरील वाहतूकीला तहसिल कार्यालय मार्गे वळणमार्ग दिलेला आहे. परिणामी अर्जुनी मार्गे होणारी वाहतूक ही तिरोडा तहसिल कार्यालय चिरेखनी मार्गाने होत असते. कवलेवाडा रेल्वे चौकी ते झेंडा चौक पर्यंत रस्त्यावर सद्यास्थितीत मोठमोठे खड्डे पडलेले असून या मार्गावर सर्व शासकिय कार्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करित असतात.नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.रस्ता दुरुस्त करण्याबाबत नागरिकांनी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचे कडे तक्रार करताच तातडीने आमदार रहागंडाले यांनी महारेल विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून सदर रस्ता दुरुस्त केल्याच्या सूचना दिल्या.याबाबत शनिवारला उपविभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम व जिल्हापरिषद, महारेल विभाग व उपविभागीय अधिकारी यांचेसोबत बैठक बोलाविली असून या बैठकीमध्ये सोमवारपासून काम सुरू केले नाही तर रस्ता बंद इशारा दिला आहे. व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत सर्व विभागाची राहिल अशी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.