जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची-जि.प.उपाध्यक्ष हर्षे

0
62

गोंदिया,दि.०५ः जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांच्या पुढाकारातून प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षातील पुर्वतयारी नियोजनाला घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे केद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या सहविचार सभेचे तचेस शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण २९ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन येथील पोवार बोर्डींग सभागृहात नुकतेच पार पडले.या सहविचार सभेला मुख्याध्यापक,अधिकारी व पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती नोंदवली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते.मार्गदर्शक म्हणून जि.प.उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश यशवंतराव हर्षे, बांधकाम व अर्थ सभापती डॉ.लक्ष्मण भगत,कृषी व पशुसंवर्धन सभापती दीपाताई चंद्रीकापुरे,महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगे उपस्थित होते.यावेळी जि.प.सदस्य सौ.सविता पुराम,सौ.पूजाताई सेठ,सौ.रचनाताई गहाणे.सौ.तुमेश्वरी बघेले,सौ.अश्विनीताई पटले,जि.प.सदस्य शैलेश नंदेश्वर,शसेंद्र भगत,वंदना काळे,निशा तोडासे,अंजलीताई अटरे,सौ.छायाताई नागपुरे,छबूताई उके,आनंदाताई वाडीवा,वैशालीताई पंधरे, सौ नेहा तुरकर,सुधाताई रहांगडाले,जयश्रीताई देशमुख,लक्ष्मी तरोणे,विमलताई कटरे,रीतेशकुमार मलगाम, माध्य. शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये,उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे,विस्तार अधिकारी डी.बी दिघोरे,एम.जी.डहाके,शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी, केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,नवोदय शाळेचे शिक्षक ,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी केले.शासन स्तरावरून शासकीय जिल्हा परिषद शाळेला वेळोवेळी होत असलेले मार्गदर्शन, नवीन उपक्रम प्रशिक्षण व तंत्रज्ञान,जिल्हा परिषद शाळेला उपलब्ध होत असलेले सर्व प्रशिक्षण सेवा याबाबत माहिती दिली.
शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांनी सहविचार सभेला मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याकरीता गावस्तरावार चांगली सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून राज्य शासनाने पहिल्या वर्गापासून सीबीएससी पॅटर्न सन २०२५ ला लागू केला आहे.त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने ग्रामीण क्षेत्रातील गरजू गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता जिल्हा निधी व 15 वित्त आयोग अंतर्गत अंदाजे येणाऱ्या काळामध्ये 300 स्वयंसेवक,मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 165 शिक्षक व पवित्र पोर्टल टप्पा- २,२०२५-२६ ला १६८ शिक्षक भरती प्रक्रिया होणार असल्याचे सांगितले.जिल्हा परिषदेने वेळीच स्वयंसेवक व घड्याळ तासिका शिक्षकांचे मानधन कसे करता येईल याकरिता जिल्हा निधी अंतर्गत ५० लक्ष रू.घड्याळी तासिका शिक्षक व ९० लक्ष रू.स्वयंसेवक मानधनाकरिता तरतूद २०२५-२६ या आर्थिक वर्षाला करून ठेवल्याचे सांगितले .जिल्हा परिषदेला ३१ ऑगस्टच्या बिंदूंनामावलीप्रमाणे ६२९ शिक्षकाची उणीव असून वरील प्रमाणे नमूद शिक्षकाची भरपाई भरुन काढणार व ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त हर्षे यांनी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे शिक्षक हा देशाच्या भविष्य घडवणारा व आम्हा सर्वंचा गुरु आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शिक्षकांनी गुरुवरची भूमिका अदा करत सामान्य जनतेचे विश्वास जिंकावे.गावातील पालकाच्या भेटीगाठी पालकाची सहविचार व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची माहिती पालकापर्यंत कशी पोहोचता येईल व पालकांना विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता व कमतरता कळवावे.प्रत्येक महिन्याला घटक चाचणीच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला चाचणी घ्यावी जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे .जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उत्तीर्णच्या प्रमाण बघितलं किंवा गुणवत्ता बघितली तर जिल्हा परिषद शाळा कुठेही मागे नाही फक्त प्रचार प्रसार व आत्मविश्वास वाढवून काम करण्याची शिक्षक व शिक्षण विभागाला आवश्यकता असल्याबाबत मत व्यक्त केले.त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये स्वयं अर्थसहाय्य ग्रामपंचायत शाळा समिती व शिक्षकांनी सहकार्यांनी कॉनवेंट सुरू व्हावी जेणेकरून बालपणापासून त्याला इंग्रजी विषयी यायला पाहिजे जेणेकरून सीबीएससी पॅटर्नच्या माध्यमातून त्याला सहजतेने गुणवत्ता प्राप्त करता येईल त्याचप्रमाणे आता ग्रामीण क्षेत्रांमध्ये पण शासनाच्या धोरणामुळे प्रत्येक गावाला सीबीएससी अभ्यासक्रम सुरू होत असलेल्या बाबत शिक्षकांनी,मुख्याध्यापकांनी पालकांना सांगावं व ज्या शासन स्तर किंवा जिल्हा परिषद स्तर असलेल्या शिक्षकांचे प्रश्न वेळी कसे मार्गी लावता येतील याकरिता प्रत्येक महिन्याला किंवा दोन महिन्यांनी आपण संघटनांशी बोलून प्रश्न मार्गी लावू व जिल्हा परिषद स्तर राज्यस्तर टप्प्याटप्प्याने कसा सोडवता येईल हा प्रयत्न करू याप्रमाणे शिक्षकांना आव्हान केले.आपल्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कशी वाढेल व गुणवत्तापूर्वक शिक्षण कसं मिळेल याकरिता जिल्हा परिषदेपासून राबवत असलेल्या योजनेबाबत पाठपुरावा सादर करत संपूर्ण जिल्हा परिषदेची माहिती आढावा सभेला सहविचार सभेला सादर केली.