
नांदेड/दि.18-नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणादायी आवाहनानुसार व गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने व शिक्षणविस्तारधिकारी संजय कराड यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्याच दिवशी ‘एक पेड माॅ के नाम’ या अनोख्या उपक्रमासह उत्साही वातावरणात सुरुवात करण्यात आली.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळीने सजावट करण्यात आली होती. तसेच पारंपरिक हलगी वादन करत व बैलगाडीतून व घोड्यावरून विद्यार्थ्यांची दींडी काढून जंगी स्वागत करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक उत्तम बाबळे व संपूर्ण,पदाधिकारी, शिक्षकवृंद ,वनधिकारी यांच्या पुढाकाराने फुल व रोपट्यांनी नवागत विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याने स्वागत करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या ‘आई’च्या सन्मानार्थ एक रोपटे भेट देण्यात आले. यामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आईप्रती कृतज्ञता, निसर्गप्रति प्रेम व सामाजिक भान जागृत करणे हा होता.तसेच सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. शिक्षणाचा हा पवित्र प्रारंभ ज्ञान , घोड्यावरून मिरवणूक तसेच हलगीचे वादन व बैलगाडीतून मिरवणूक केल्याबद्दल आणि आईच्या मायेच्या संगमाने भावनिक व पवित्र ठरला. आकर्षक ठरले.पहीले पाऊल व हाताचे ठसे घेत माझे शाळेतील पहिले पाऊल हा अनोखा प्रयत्न केला.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आयुष्यातील शैक्षणिक प्रवासाची ही सुरुवात विद्यार्थ्यांना न विसरण्यासारखा अनुभव देणारी ठरली.याप्रसंगी विद्यार्थ्यांना गोड भोजन देण्यात आले.शाळेतील उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे हा उपक्रम उत्साहाने यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
“शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांचा कुतूहलचा, आनंदाचा व उत्साहाचा दिवस आहे. गोंडजेवली व गोंडजेवली तांडा नेहमीच विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह द्विगुणित करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. या वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गुलाबपुष्प व औक्षण तसेच पाठयपुस्तक देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांवर शाळेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. चिमुकल्यांसाठी हा अनुभव नवीनच होता.विशेष करून विद्यार्थ्यांचा आवडता खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी काढण्यात आलेली हलगी वादन, जिथे लग्नासाठी घोडे वेळेत उपलब्ध होत नाही तिथे घोड्यावरून व बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक,रांगोळी, फुलांची व फुग्यांची सजावट , सेल्फी पाॅईट या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. सौजन्यने धनराज जाधव बैलगाडी उपलब्ध करून दिले,घोडा उत्तम महाराज यांनी उपलब्ध करून दिले,हलगी रामु विशेष सहकार्य राजू जाधव,मधूकर जाधव,मुन्ना राठोड, यांच्या सहकार्य मिळाले.किनवट तालुक्यातील तेलंगणा व महाराष्ट्राच्या बॉर्डर वर असलेले या गावाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या भेटीचा एक विशेष क्षण अनुभवला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि शिक्षणावरील ओढ पाहून ऊर्जा आणि आशेने मन भरून गेले.
यावेळी या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी पी.एस.आय.सुभाष राठोड,प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख सत्यनारायण कौड,वरिष्ठ मुख्याध्यापक प्रमोद रत्नाळीकर,शाळेस सदिच्छा भेट माजी जिल्हा परिषद सदस्य सुर्यकांत आरंडकर साहेब यांनी भेट देऊन शुभेच्या दिले.उपक्रमात गावाचे सरपंच सुधाकर जाधव,सुरेश जाधव,पोलिस पाटील उदय राठोड,अंकुश पवार,रेखोबा जाधव,सखाराम राठोड,लत्ता जाधव, सविता चव्हाण,गोंडजेवली शाळेचे मुख्याध्यापक बुरावाड राजेशकुमार ,सहशिक्षक बस्वराज आचारे,व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, निसर्गप्रेमी, शिक्षण प्रेमी, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेतील शिक्षक दिलीप वाघमारे यांनी मानले.