श्री पब्लिक स्कूलच्या ३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी

0
19

तिरोडा-महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतीम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करते. या शिष्यवृत्तीचा उद्देश महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी शाळांमधील शैक्षणिकदृष्ट्या पात्र विद्यार्थ्यांना मदत करणे आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री पब्लिक स्कूल तिरोडयाच्या तीन विद्यार्थ्यांनी अभ्यासात उल्लेखनीय समर्पण आणि बुद्धिमत्ता दाखवली आहे. यामध्ये इयत्ता पाचवीचे विद्यार्थी अवनी विलास मून, आश्लेषा किरण कुमार गोबाडे, पूरब गणेश खोब्रागडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यासाठी श्री पब्लिक स्कूल तिरोडाचे संस्थापक रामकृष्ण शेंडे आणि मुख्याध्यापक राधा कृष्ण शेंडे आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.