
सोलापूर,दि.११ : जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन अंतर्गत सर्व योजनांची कामे जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची बैठक घेणेत आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत,महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे,कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाराम शिवमुर्ती,जिल्हा परिषद सदस्या गीतांजली साळुंखे,जिल्हा परिषद सदस्या वंदना कांबळे जिल्हा परिषद सदस्य सन्मुखी कोरके,कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर,जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिश्चंद्र सपताळे,यांच्यासह इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत सर्व योजनांची आर्थिक व भौतिक प्रगतींचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. 2.0 ते 100 सिंचन क्षमतेच्या लघु पाटबंधारे योजना या मध्ये 0 ते 100 सिंचन क्षमतेच्या कोल्हापूर पद्धतीचे बंधारेची कामे हाती घेणेत येत आहेत. या मध्ये जि.प.उपकर पाझर तलाव व गाव तलाव दुरुस्ती. अटल भूजल योजना, जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना, सन 2025-26 आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल घेण्यात आला.





