पोवारी बोलीभाषा सर्वांना सामावून घेणारी भाषा-प्रा.डॉ.मंजू अवस्थी

0
208
बुंदेलीभाषेची उपभाषा पोवारी बोली
गेल्या काही दशकात पोवारी बोली भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर
गोंदिया,(खेमेंद्र कटरे)दि.०३ः-देशातील विविध प्रदेशात बोलीभाषांमधून सवांद साधून आपसातील व्यवहार केले जातात,प्रमाण भाषेपेक्षा बोलीभाषा ही सोपी असल्याने या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक समाजाला झटणे गरजेचे आहे.पोवारी बोली भाषा ही देशातील महत्वाची भाषा असून राष्ट्रीय स्तरावर ४६ व्या क्रमांकावर या भाषेचे स्थान आहे.पोवारी बोलीभाषेमध्ये राजस्थानी,गुजराती,गोंडीसह जैन संस्कृती मिसळली गेली असून त्या भाषेने पोवारी बोलीभाषेतील काही शब्दांना आपल्या सामावून घेतले अशा पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी मात्र समाज कुठे तरी मागे पडल्याने गेल्या एक दशकाचा विचार केल्यास पोवारी भाषेचा èहास झाल्याने ही भाषाच लुप्त होण्याच्या मार्गावर आली आहे.या पोवारी भाषेच्या संवर्धनासाठी समाजाच्यावतीने आयोजित केलेले हे पहिले साहित्य संस्कृती समेंलन मोलाचे ठरणार असून पोवारी बोलीभाषा ही बुंदेली भाषेची उपभाषा असल्याने या भाषेला अन्यन महत्व असल्याचे प्रतिपादन पोवारी बोलीभाषेच्या अभ्यासक प्रा.डॉ.मंजू अवस्थी यांनी केले.त्या राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभाप्रणित राष्ट्रीय पवारी साहित्य कला संस्कृती मंडळाच्यावतीने तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथील गणेश हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित पहिल्या अखिल भारतीय पोवारी भाषा साहित्य समेलनात समेलनाध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
साहित्य समेलनाची सुरवात पुस्तक पोह्याने करण्यात आली.या समेलनाचे उदघाटन तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षण महर्षी राधेलाल पटले होते.समेलनाच्या विचारमंचावर जेष्ठ पवारी साहित्यिक जयपालqसह पटले,वरिष्ठ साहित्यकार वल्लभ डोंगरे,राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे,भोयर पवार महासभेचे अध्यक्ष डॉ.नामदेव राऊत,अ‍ॅड दिलीप कालभोर,सरपंच ओमप्रकाश पटले,डॉ.योगेंद्र भगत,राजलक्ष्मी तुरकर,पंचम बिसेन,मोतीलाल चौधरी,साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टेंभरे,कार्याध्यक्ष लखनqसह कटरे,बाबा भैरम,देवेंद्र चौधरी, सी.डी.पटले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना समेंलनाध्यक्ष प्रा.डॉ. मंजू अवस्थी म्हणाल्या की आपण जेव्हा उत्तरप्रदेशातील बनारस येथून बालाघाट शहरात १९७१ ला पहिल्यांदा आले तेव्हा बालाघाटच्या भाजीबाजारातील विक्रेत्यांकडून पहिला शब्द कानावर पडला तो म्हणजे भेदरा व संभार या शब्दामुळे माझ्या मनात नवीन उत्कंठा निर्माण झाली की हे शब्द कुठले आहेत कोण बोलतात याचा अभ्यास करायला पाहिजे.तेव्हापासून मी आजपर्यंत पोवारी बोलीभाषेच्याच नव्हे तर मरारी व लोधी भाषेच्या शब्दसंग्रहाचाही अभ्यास केला.तो अभ्यास करीत असतांना पोवारी बोलीभाषेतील सुमारे १२ हजार शब्द एकत्र करुन त्यांच्यावर अभ्यास सुरु केला आणि १९९२ ला पहिला शोधप्रबंध या भाषेवर अलाहाबाद विद्यापीठात सादर केला.तेव्हा तेथील प्राध्यापकांनाही पोवारयपवार ही जात अस्तित्वात आहे हे माहिती नव्हते असे म्हणाल्या.
पोवारी बोलीभाषा ही मधुर व कोमल अशी भाषा असून सर्वांना आपल्याकडे आकर्षित करणारी भाषा आहे.त्यामुळेच या बोलीभाषेचा प्रभाव हा गुजराती,राजस्थानी,गोंडीसह जैन समाजाच्या भाषेवर दिसून येतो.पवारी भाषेचे अस्तित्व केवळ पोवारबहुल क्षेत्रातच आहे असे नव्हे तर संपुर्ण भारतात ती तुम्हाला कुठल्या न कुठल्या भाषेच्या माध्यमातून दिसते.हा समाज एक सुसंस्कृत समाज असून महिलांना मानाचे स्थान देणारा समाज आहे.सुन मुलींचा सन्मान करणारा समाज असून दहेज परंपरेच्या विरोधातील समाज आहे.या समाजाने आपलेपण आपली भाषा आजही ग्रामीण भागात जोपासून ठेवली आहे.मात्र जस जसे या समाजाचे शहरीकरणात रुपांतर होत गेले तस तसी पोवारीबोलीभाषा संपुष्ठात येऊ लागली हे वास्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या.आपल्या बोलीवर कुणाचा प्रभाव नसायल हवे तर गर्व असायला हवे.या समाजातील ग्रामीण संस्कृतीची ओळख म्हणजे खाचर,गरसोली,लुगडा ही आहे.जगातील पहिले लोकगीत सुध्दा पोवारीत गायले गेल्याचा उल्लेख त्यांनी करीत आपण पोवारीबोलीवर केलेला शोधप्रंबध आज या साहित्य समेंलनाच्या माध्यमातून समाजाला समर्पित करीत आहोत असे त्या म्हणाल्या.
पाचव्या ते सहाव्या शत्बादीपासूनचा या समाजाचा इतिहास असून अग्नीवंशीय समाजातून पोवार समाजाची उत्पती आहे.परशुरामाने जेव्हा पृथ्वी निक्षत्रिय करण्यास सुरवात केली तेव्हा त्यांनी पोवार समाजालाही नष्ठ करण्याचा प्रयत्न केला.आज आपण आपली पोवारी बोली बोलण्यासाठी लाजतो हे योग्य नव्हे आपला इतिहास हा मोठा असून आपली भाषाही मोठी आहे असे त्या म्हणाल्या.यावेळी बोलतांना राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष मुरलीधर टेंभरे म्हणाले की,समाज एकत्रीकरन करण्यासाठी काम सुरू  असून आमची एक स्वतंत्र भाषा आहे.त्या भाषेचा सवर्धन व विस्तार करण्यासाठी साहित्य संस्कृती मंडल तयार करण्यात आले आहे.
साहित्य समाजाला जोडण्याचे काम करते-आ.रहागंडाले
कार्यक्रमाचे उदघाटक आमदार विजय रहागंडाले म्हणाले की, साहित्य समाजाला जोडण्याचे काम करते.आपली भाषा आज लुप्त होत असेल तर ती कुठून तुटायला लागली याचाही विचार व्हायला हवे.आज आम्ही गावातून शहरात आलो की आपल्या बोलीभाषेला विसरुन प्रमाणभाषेच्या मागे धावत असल्यानेच आपली बोलीभाषा संपायला लागल्याची खंत व्यक्त करीत ग्रामीण भागातच पोवारी भाषेचे सवंर्धन होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.गावातील गोष्टी घडामोडींना लिखित स्वरुपात गोळा केले तर ते साहित्याच्या रुपात समोर येईल.सोबतच आपली बोलीभाषा बोलण्यासाठी स्वाभीमानाची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.
गणेशदेवींनी जगासमोर पोवारी बोलीभाषेचा चुकीचा इतिहास पोचविला-लखनसिंह कटरे
या समेलनातील पवारी भाषा,कला,संस्कृती व संवर्धन या विषयावरील आयोजित परिसवांदाची भूमिका मांडताना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य लखनसिंह कटरे म्हणाले की,आपण सर्वांनी आधी साहित्याची माहिती जानूण घ्यायला हवे.जोपर्यंत आपल्याला साहित्याची,लेखणाची माहिती कळणार नाही तोपर्यंत साहित्य समजणार नाही. संस्कृत ही नैसर्गिक भाषा नव्हे तर ती वेगवेगळ्या तुटक भाषा व शब्दांना एकत्रित करून तयार झालेली भाषा असून जरी त्या भाषेचे सामाजिक व्यवहारात वापर कमी असले तरी ती आजच्या घडीला महत्वाच्या ठिकाणी पोचली आहे.त्याचप्रमाणे पोवारी बोलीभाषा ही एका महत्वाच्या टप्यावर पोचू शकते,त्यासाठी शब्दसंग्रह साठवून ठेवण्याची गरज आहे.साहित्य जिवन कसे जगावे हे शिकवते साहित्य समजण्यासाठी संस्कृतीची जाणिव हवी.१९१७ मध्ये पहिल्यांदा बोली भाषेचे सर्वेक्षण झाले त्यानंतर तब्बल १०० वर्षांनी २०१५  मध्ये बोलीभाषेचे सर्वेक्षण करण्यात आले.परंतु हे सर्वेक्षण करतांना ज्यां ज्ञानेश्वर टेंभरेंनी पोवारी बोलीभाषेचा इतिहास समोर आणलाच नव्हे तर त्यावर संशोधनही केले,त्या टेंभरेंचा एकही नामोलेख त्या सर्वेक्षणात दिसून येत नाही उलट ज्यांना पोवारी भाषेचा गंधही नव्हता अशा काही लोकांच्या नावाचा उल्लेख पुण्यातील गणेशदेवी व जांगडे यानी त्या ११ पानात पोवारी भाषेचे विश्लेषण करतांना करुन एकप्रकारे सर्वेक्षण करत्यांनी पोवारी भाषेचा चुकीचा इतिहासच जगासमोर मांडला गेल्याचे म्हणाले.
या दरम्यान साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.झाडीबोलीत प्रसिध्द असलेल्या दंडारीचे सादरीकरण करण्यात आले.तसेच पोवारीभाषेतील कवीसमेंलनही घेण्यात आले.पहिल्या उदघाटन सत्राचे संचालन देवेंद्र चौधरी यांनी केले तर आभार बाबा भैरम यांनी मानले.
पोवारी भाषेवर हिंदीपेक्षा भाषिक भाषेंचा प्रभाव
पोवारी भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे तोवर विचार केल्यास या भाषेवर पश्चिम हिंदी व बुंदेली भाषेचाही प्रभाव नसून qहदी भाषेचाही जो प्रभाव असायला पाहिजे होता तो नाही आहे.उलट पोवारी भाषेवर विविध राज्यातील भाषेंचा विचार केल्यास राजस्थानी,गुजराती,मारवाडी व मराठी सारख्या भाषांचा प्रभाव पडल्याचे दिसून येते.
९ व्या शताब्दीपासून ते १४ व्या शताब्दीपर्यंत प्रमर राज होते.मुगलांच्या त्रासामुळे पवार,प्रमरांनी मराठ्यांना साथ दिली.१७२४-१७२५ च्या काळात बाजीराव पेशव्याने उदाजी पवार या सरदाराला चौथ वसुलीसाठी मालवा प्रदेशातील धार येथे पाठविले.त्यावेळी मुगलसोबतच्या लढाई झाली.१७३२ मध्ये धार स्वतंत्र्य राज्य झाले ते १९४७ पर्यंत स्वतंत्र राज्याच्या रुपातच होते.११९० मध्ये शहाबुद्दी गौरीच्या नेतृत्वातील मुगल सेनेने जेव्हा उज्जैनवर आक्रमण केले त्यावेळी पवार राजा मित्रसेन होते.वारंवारच्या आक्रमणामुळे राजाभोज ने उज्जैन सोडून दिले.पवार इतिहास मोठा असून इस १७०० च्या जवळपास औरंगजेबच्या अत्याचाराने त्रस्त होऊन गोंडराजा बख्त बुलंदशहाच्या आश्रयस्थानाला आले.त्यांनी आश्रय देत जंगलात शेती करण्यास सुरवात केली व काही काळानंतर मालगुजारी रुपात गावे दिली.मराठा कार्यकाळात पवार समाज याभागात स्थायी झाला.