
देवरी,दि.०५::तालुक्यातील पुराडा या गावातील एका शेतकऱ्याने दुबार पेरणीच्या संकटाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थितीवर मात करून धानाची लागवड केली. मात्र, पावसाअभावी पीक करपू लागले. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची परिस्थिती निर्माण झाली तर आधिच सावकराकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे ? या विंवचनेतून पुराडा येथील शेतकऱ्याने शनिवारी आपले जीवन संपवले आहे. श्रीराम चैनलाल उईके (५७ ) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.




