<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>महाराष्ट्र Archives - Berar Times</title>
	<atom:link href="https://www.berartimes.com/category/maharashtra/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.berartimes.com/category/maharashtra/</link>
	<description>News Paper</description>
	<lastBuildDate>Thu, 23 Jul 2026 12:56:50 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0.2</generator>

<image>
	<url>https://www.berartimes.com/wp-content/uploads/2017/09/cropped-bgt5-2-32x32.jpg</url>
	<title>महाराष्ट्र Archives - Berar Times</title>
	<link>https://www.berartimes.com/category/maharashtra/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>चरणसेवा&#8217;ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ</title>
		<link>https://www.berartimes.com/maharashtra/233023/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 23 Jul 2026 12:56:50 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=233023</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई, दि. २३ : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या &#8216;चरणसेवा&#8217; उपक्रमाचा समारोप शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील १४ जिल्ह्यांतील ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी थेट चरणसेवा आणि आरोग्यसेवेचे लाभ [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/233023/">चरणसेवा&#8217;ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>मुंबई</strong>, दि. २३ : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या &#8216;चरणसेवा&#8217; उपक्रमाचा समारोप शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील १४ जिल्ह्यांतील ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी थेट चरणसेवा आणि आरोग्यसेवेचे लाभ घेतला.<br />
आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना होणारा शारीरिक ताण, स्नायूदुखी, पायांना येणारे फोड, थकवा तसेच पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षी सात जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा विस्तार करून तो दिंडी मार्गावरील १४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला.<br />
या चौदा जिल्ह्यांत उपक्रम :<br />
सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सांगली, अमरावती आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतील १४० मुक्कामस्थळांवर सेवा केंद्रे उभारण्यात आली. या केंद्रांमधून वारकऱ्यांना चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, आवश्यक औषधांचे वितरण, रुग्णवाहिका सुविधा तसेच गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.<br />
३ हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर :<br />
या उपक्रमात १६४ आरोग्य संस्थांनी सहभाग घेतला. ७ हजार ५३८ स्वयंसेवक तसेच ११ हजार ३३१ डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवाकार्यात योगदान दिले. सेवेसाठी १० हजार टी-शर्ट आणि ३ हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा उपयोग चरणसेवेसाठी करण्यात आला. तसेच ८ रथांद्वारे जनजागृती करण्यात आली. लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या या उपक्रमातून तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांना प्रत्यक्ष चरणसेवा आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली.<br />
दिंडीत अवयव दानावर जनजागृती :<br />
उपचारांबरोबरच आरोग्य जनजागृतीलाही विशेष महत्त्व देण्यात आले. आरोग्य जनजागृती रथांद्वारे स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, रक्तदान, अवयवदान संदर्भात जनजागृती, निरोगी जीवनशैली तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती वारकऱ्यांपर्यंत आरोग्य रथाच्या माध्यमातून पोहोचविण्यात आली<br />
<strong>प्रतिक्रिया</strong> :<br />
राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ४ लाख ९६ हजारांपेक्षा अधिक वारकऱ्यांपर्यंत &#8216;चरणसेवा&#8217; पोहोचविता आली, याचा आनंद आहे. या उपक्रमाच्या यशामागे लोकसहभाग हीच सर्वात मोठी ताकद ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला विविध आरोग्य संस्था, दानशूर व्यक्ती, डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि हजारो स्वयंसेवकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे हे सेवाकार्य यशस्वी झाले.<br />
रामेश्वर नाईक<br />
कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/233023/">चरणसेवा&#8217;ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव</title>
		<link>https://www.berartimes.com/maharashtra/233019/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 23 Jul 2026 12:44:52 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=233019</guid>

					<description><![CDATA[<p>गोंदिया , दि. २3 जुलै २०२६: नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार, ऊर्जा कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल  मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांचा बुधवारी (दि. २२) विशेष गौरव करण्यात आला. नवी दिल्ली येथे आयोजित ‘टाइम्स नेटवर्क सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्ह’ (Times Network Sustainability Conclave) ‘भारत २०३५: [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/233019/">ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>गोंदिया</strong> , दि. २3 जुलै २०२६: नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार, ऊर्जा कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल  मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांचा बुधवारी (दि. २२) विशेष गौरव करण्यात आला.</p>
<p>नवी दिल्ली येथे आयोजित ‘टाइम्स नेटवर्क सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्ह’ (Times Network Sustainability Conclave) ‘भारत २०३५: एक आत्मनिर्भर राष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित या कॉन्क्लेव्हमध्ये २०३५ पर्यंत भारत हरित बांधिलकी आणि शाश्वत ऊर्जेच्या बळावर आत्मनिर्भर कसा बनू शकतो यावर विचारमंथन करण्यात आले. या परिषेदत ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांची विशेष मुलाखत घेण्यात आली.</p>
<p>महाराष्ट्राला स्वच्छ आणि हरित ऊर्जेकडे नेण्यासाठी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना व प्रकल्प राबवले जात आहेत. हरित ऊर्जा परिवर्तनातून सर्वांना स्वस्त व शाश्वत वीजपुरवठ्यासह वीज क्षेत्रातील आमुलाग्र सुधारणांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वेग दिला आहे. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी ऊर्जा परिवर्तनासाठी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. तर या आराखड्याच्या अंमलबजावणीला मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सक्रीय वेग दिला आहे.</p>
<p>महाराष्ट्राच्या वीज नियोजनात २०३० पर्यंत आणखी ४५ हजार मेगावॉट विजेची क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३८ हजार मेगावॉट वीज ही हरित स्रोतांकडून मिळवून एकूण ऊर्जेतील नवीकरणीय ऊर्जेचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्याचे ध्येय आहे. त्यास अनुसरून महावितरणने स्वस्त व शाश्वत वीजपुरवठ्यासाठी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देत आतापर्यंत केलेल्या एकूण वीज खरेदीच्या दीर्घकालीन करारांमध्ये तब्बल ६५ टक्के हरित ऊर्जेचा समावेश केला आहे.</p>
<p>यासोबतच सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांतून १६ हजार मेगावॉट क्षमतेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या ५ हजार ५०० मेगावॉटपेक्षा अधिक क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले असून त्याद्वारे राज्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीज पुरवठा मिळत आहे. तसेच ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’तून १० लाखांपेक्षा अधिक &#8216;ऑफ-ग्रिड&#8217; सौर कृषी पंप कार्यान्वित करण्यात आले आहे. तर छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे राज्यातील ९ लाखांहून अधिक कुटुंबांच्या वीजवापराचे बिल शून्य किंवा जवळपास मोफत झाले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/233019/">ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>आमदार डॉ. फुके यांच्या अभ्यासगटाच्या शिफारसी मंत्र्यांकडे सादर</title>
		<link>https://www.berartimes.com/maharashtra/232935/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 21 Jul 2026 13:21:02 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232935</guid>

					<description><![CDATA[<p>छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : ७२ तासांत देयके तसेच विविध सुविधांचा समावेश नागपूर : धान खरेदीचे व्यवस्थापन तसेच किमान आधार किंमत अर्थात हमीभाव ठरविण्याबाबत अभ्यासासाठी नुकताच आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेतील समितीने छत्तीसगढ राज्यात दौरा केला. डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेतील समितीने छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील धान खरेदी व्यवस्थेतील फरक, सुधारणा व ७२ [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232935/">आमदार डॉ. फुके यांच्या अभ्यासगटाच्या शिफारसी मंत्र्यांकडे सादर</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : ७२ तासांत देयके तसेच विविध सुविधांचा समावेश</strong></p>
<p><strong>नागपूर :</strong> धान खरेदीचे व्यवस्थापन तसेच किमान आधार किंमत अर्थात हमीभाव ठरविण्याबाबत अभ्यासासाठी नुकताच आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेतील समितीने छत्तीसगढ राज्यात दौरा केला. डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेतील समितीने छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील धान खरेदी व्यवस्थेतील फरक, सुधारणा व ७२ तासांत विविध देयके यासारख्या शेतकरी हितासाठी अहवाल तयार केला. हा अहवाल आमदार डॉ. परिणय फुके यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना सादर केला.</p>
<p>अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पकालीन चर्चेदरम्यान आमदार डॉ. परिणय फुके यांनी छत्तीसगड राज्यात धान विक्रीचे पैसे ७२ तासांत शेतकऱ्यांना मिळत असून संबंधित पोर्टलचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेत राज्य सरकारने किमान आधारभूत किंमत अध्ययन समिती स्थापन केली. आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, आमदार राजू कारेमोरे, सभापती शशिकांत दिवे, संचालक जितेंद्र कुमार शुक्ला, सहाय्यक संचालक योगेंद्र श्रीवास तसेच संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या आमदार डॉ. फुके यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारच्या किमान आधारभूत किंमत अध्ययन समितीने छत्तीसगडच्या धान खरेदी व्यवस्थेचा अभ्यासासाठी छत्तीसगड दौरा केला. शेतकरी हिताच्या विविध बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेतला. दौऱ्यात छत्तीसगडचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री दयालदास बघेल यांनी समितीला त्यांच्या सरकारमार्फत धानाचे हमीभाव, व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. छत्तीसगडमध्ये धान खरेदी प्रक्रियेदरम्यान बारदाना व्यवस्थापन, नवीन व जुन्या बारदान्यांचा हिशोब, धान खरेदी केंद्रांची कार्यपद्धती, शेतकऱ्यांना ४८ तासांत मोबदला देण्याची व्यवस्था तसेच निधी उपलब्धतेसाठी करण्यात येणारे बँकिंग नियोजन याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. यावेळी डॉ. परिणय फुके यांनी छत्तीसगड शासनाच्या धान खरेदी व्यवस्थेतील विविध पैलूंचा बारकाईने अभ्यास केला. त्या आधारावर त्यांनी अहवाल तयार केला. शेतकऱ्यांना वेळेत मोबदला मिळावा, खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये यासाठी विकसित करण्यात आलेल्या आसीसी प्रणालीची माहितीही समितीने जाणून घेतली होती. त्याचीही शिफारस करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही प्रणाली प्रभावीपणे राबविण्याच्या शक्यताही अहवालात नमुद करण्यात आली आहे. दौऱ्यादरम्यान झालेल्या सर्व बैठका, चर्चा आणि निरीक्षणांचा सविस्तर अहवाल समितीमार्फत तयार करण्यात आला असून छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील धान खरेदी व्यवस्थेतील फरक, सुधारणा व शेतकरी हिताच्या उपाययोजनांबाबत अहवाल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना आमदार डॉ. परिणय फुके यांनी सादर केला.</p>
<p>कोट्स</p>
<p><strong>शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला, पारदर्शक खरेदी व्यवस्था आणि अधिक हमीभाव प्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी हा अभ्यास दौरा महत्त्वपूर्ण ठरला. त्या आधारावरील अहवाल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आला. शेतकरी हितासाठी लवकरात लवकर शिफारसी लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. </strong><br />
<strong>&#8211; डॉ. परिणय फुके, आमदार व अध्यक्ष, राज्य सरकार किमान आधारभूत किंमत अध्ययन समिती.</strong></p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232935/">आमदार डॉ. फुके यांच्या अभ्यासगटाच्या शिफारसी मंत्र्यांकडे सादर</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</title>
		<link>https://www.berartimes.com/maharashtra/232893/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 20 Jul 2026 10:37:37 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232893</guid>

					<description><![CDATA[<p>• गंगाखेड, अमरावती व काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी • ११५ कोटींच्या विकासकामांना मिळणार गती आराखड्यातील कामे दर्जेदार व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई, दि. २० : संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232893/">संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div class="xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a">
<div dir="auto"><strong>• गंगाखेड, अमरावती व काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी</strong></div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>• ११५ कोटींच्या विकासकामांना मिळणार गती</strong></div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>आराखड्यातील कामे दर्जेदार व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश</strong></div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>मुंबई, दि. २० :</strong> संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१.७५ कोटी या तीन तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण ११५ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आराखड्यातील सर्व कामे उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेवून दर्जेदार पद्धतीने व टप्प्याटप्प्याने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">सहयाद्री अतिथी गृह येथे विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार चरण सिंग ठाकूर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच तीर्थक्षेत्रात नव्याने करण्यात येणाऱ्यां कामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळेल.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>*परभणी येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ रूपये कोटींचा विकास आराखडा*</strong></div>
<div dir="auto">परभणी येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ रूपये कोटी विकास आराखड्यामध्ये श्री संत जनाबाई जन्मस्थळ परिसरात सांस्कृतिक सभागृह, गोदावरी घाट विकास, दर्शन मंडप, उद्यान व सुशोभीकरण, पाथवे, मंदिर ते घाट सिमेंट काँक्रीट रस्ता, गोरक्षण इमारत, संरक्षक भिंती, जलनिस्सारण व्यवस्था, विद्युत सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सौरऊर्जा, सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, लँडस्केपिंग आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यामुळे वारकरी, भाविक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून गंगाखेड हे संत जनाबाईंच्या आध्यात्मिक वारशाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>*अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी*</strong></div>
<div dir="auto">अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी रूपयांच्या कामांमध्ये श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्र कल्चरल व्हॅल्यू एज्युकेशन सेंटरचे उर्वरित बांधकाम, श्री संत गाडगे महाराज स्मृति भवन परिसरामध्ये शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर तळमजल्याचे बांधकाम करणे, यात्री निवासाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, कीर्तनासाठी सभागृह, समाधीचा जीर्णोद्धार व सौंदर्यीकरण, ध्यान केंद्रासाठी इमारत, कुंताबाई समाधीचे सौंदर्यीकरण, अंतर्गत रस्ते,पार्किंग, बगीचे,फर्निचर व इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>*चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी ४१.७५ कोटींची कामे*</strong></div>
<div dir="auto">चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी ४१.७५ कोटींच्या कामांमध्ये काटोल येथील भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर विकास आराखड्यात बहुउद्देशीय सभागृह, आधुनिक सार्वजनिक प्रसाधनगृह, भव्य प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, वाहनतळ, बगीचा, कमानी पूल, पाथवे आणि इतर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या विकासामुळे महानुभाव पंथाच्या या ऐतिहासिक तीर्थक्षेत्रात भाविकांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा निर्माण होणार असून धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ के. एच. गोविंदराज, पोलीस महासंचालक सदानंद दाते, नागपूर, परभणी व अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.</div>
</div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232893/">संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>१७० वर्षांचा समृद्ध, गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाचा स्थापना दिन</title>
		<link>https://www.berartimes.com/maharashtra/232836/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 18 Jul 2026 13:12:33 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[शैक्षणिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232836</guid>

					<description><![CDATA[<p>युडीआरएफ, प्रशासकीय गुणवत्ता अभियान पुरस्कारांसह वर्धापन दिन व्याख्यानमालेचे आयोजन कृत्रिम बुद्घिमत्तेच्या युगात शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमाला नवी गती विद्यापीठांनी उद्योगाभिमुख, तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा स्वीकार करावा मुंबई, दि. १८ जुलै: कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ नवीन तंत्रज्ञान नसून ते मानवाच्या भविष्याला दिशा देणारी क्रांतिकारी शक्ती आहे. शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धेमत्तेमुळे आमूलाग्र बदल [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232836/">१७० वर्षांचा समृद्ध, गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाचा स्थापना दिन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>युडीआरएफ, प्रशासकीय गुणवत्ता अभियान पुरस्कारांसह वर्धापन दिन व्याख्यानमालेचे आयोजन</strong></p>
<p><strong>कृत्रिम बुद्घिमत्तेच्या युगात शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमाला नवी गती</strong></p>
<p><strong>विद्यापीठांनी उद्योगाभिमुख, तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा स्वीकार करावा</strong></p>
<p><strong>मुंबई, दि. १८ जुलै:</strong> कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ नवीन तंत्रज्ञान नसून ते मानवाच्या भविष्याला दिशा देणारी क्रांतिकारी शक्ती आहे. शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धेमत्तेमुळे आमूलाग्र बदल घडणार असून या बदलांचा स्वीकार करून त्याचा सकारात्मक उपयोग करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या १७० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित स्थापना दिन व्याख्यानमालेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. स्थापना दिन व्याख्यानमालेचे १२ वे पुष्प गुंफताना ते म्हणाले, एआयमुळे अत्यंत सक्षम आणि बुद्धिमान यंत्रांची निर्मिती होत असून अनेक बाबतीत त्यांची कार्यक्षमता मानवी क्षमतेच्या जवळ पोहोचली आहे. शिक्षण क्षेत्रात एआयमुळे अध्यापन आणि अध्ययनाच्या पारंपरिक पद्धतीत मोठे बदल घडतील, असे सांगत त्यांनी एआय साधनांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन केले. तसेच परीक्षापद्धती, अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करून विद्यार्थ्यांचे संकल्पनात्मक ज्ञान अधिक भक्कम करण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. संशोधन क्षेत्रात एआय, मशीन लर्निंग आणि उच्च कार्यक्षम संगणकीय साधनांचा वापर वाढविणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी शैक्षणिक संस्थांना आवश्यक संगणकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.</p>
<p>मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने विद्यापीठांनी उद्योग क्षेत्राशी अधिक दृढ सहकार्य निर्माण करावे, असे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. उद्योग–शैक्षणिक संस्था सहकार्याच्या माध्यमातून संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्यविकासाला चालना मिळेल तसेच विद्यापीठ आर्थिकदृष्ट्याही अधिक सक्षम आणि स्वावलंबी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एआयला धोका म्हणून नव्हे तर विकासाचा सहकारी म्हणून स्वीकारून शिक्षण, संशोधन आणि समाजहितासाठी एआयचा प्रभावी वापर केल्यास भारत ज्ञान, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</p>
<p>याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संचालक प्रा. मनोजकुमार तिवारी यांनी उच्च शिक्षण संस्थानी उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन मार्गक्रमन करण्याचे आवाहन केले. तर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी मुंबई विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी शुभेच्छा दिल्या.</p>
<p>आपल्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी उच्च शिक्षण संस्थांनी ज्ञाननिर्मितीची केंद्रे, नवोपक्रमाची प्रयोगशाळा आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणास्थाने बनणे आवश्यक असल्याचे सांगितले. आगामी दशकांत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर-फिजिकल प्रणाली, प्रगत संगणन व सेमीकंडक्टर्स, क्वांटम तंत्रज्ञान, प्रगत संप्रेषण, जैवतंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, ऊर्जा कार्यक्षमता तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ड्रोन, स्मार्ट वाहतूक, प्रगत मटेरिअल्स व नॅनोतंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारखी क्षेत्रे निर्णायक ठरणार आहेत. त्या दृष्टिने मुंबई विद्यापीठाने वाटचाल सुरु केली आहे. नजीकच्या काळात एमटेक इन बॅटरी टेक्नॉलॉजी हा भारतातील पहिला अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सुरु केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. बीएआरसीच्या माध्यमातूनही नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे. आयआयटी मद्रास येथील रिसर्च पार्क आणि मुंबई विद्यापीठातील इन्क्युबेशनच्या सहकार्यातून संशोधनाला मोठी गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.</p>
<p>कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्र. कुलगुरु प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी मुंबई विद्यापीठाने सुरु केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने अवलंबलेल्या युडीआरएफ (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क) पुरस्कार आणि प्रशासकीय गुणवत्ता अभियान व प्रशासकीय गुणवत्ता पुरस्काराचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी आभार मानले.</p>
<p><strong>युडीआरएफ (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क) पुरस्कार</strong></p>
<p>युडीआरएफ अंतर्गत एकूण ७ वर्गवारीतून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये विज्ञान वर्गवारीतून प्रथम पारितोषिक नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी या विभागास सर्वाधिक १५ लाख रुपयांचे अनुदान प्रदान करण्यात आले. द्वितीय पारितोषिक रसायनशास्त्र (स्वायत्त) या विभागास ७ लाखांचे अनुदान देण्यात आले. व्यवस्थापन, उपपरिसरे, आदर्श महाविद्यालये आणि संस्था या वर्गवारीत प्रथम पारितोषिक जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेस १० लाखांचे अनुदान देऊन गौरविण्यात आले, तर द्वितीय पारितोषिकसाठी गरवारे व्यवसाय व विकास संस्था यास ५ लाखांचे अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले. तिसऱ्या वर्गवारीतील आंतरविद्याशाखीय अभ्यासशाखेअंतर्गत भूगोल विभागास प्रथम पारितोषिकासाठी रुपये १० लाखांचे अनुदान आणि शारीरिक शिक्षण विभागास द्वितीय पारितोषिकासाठी ५ लाखांचे अनुदान देऊन गौरविण्यात आले. अध्ययन व अभ्यास केंद्रे वर्गवारीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रास प्रथम क्रमांकासाठी ५ लाखांचे अनुदान आणि युरोपीय अभ्यास केंद्रास द्वितीय क्रमांकासाठी २ लाखांचे अनुदान देण्यात आले. मानव्यविज्ञान, वाणिज्य व समाजशास्त्रे या वर्गावारीतून प्रथम क्रमांक म्हणून मुंबई स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी या विभागास १० लाखांचे अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले, तर द्वितीय क्रमांक म्हणून नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागास ५ लाखांचे अनुदान देण्यात आले. भारतीय व परदेशी भाषा विभाग वर्गवारीतून प्रथम क्रमांक जर्मन भाषा विभागास १० लाखांचे अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय पारितोषिकासाठी हिंदी विभागास ५ लाखांच्या अनुदानाने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे सर्वसाधारण वर्गवारीतून प्रथम क्रमांक नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी विभागास सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल १० लाखांच्या अनुदानाने सन्मानित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्टतेसाठी द्वितीय पारितोषिकाने रसायनशास्त्र विभागास ५ लाखांचे अनुदान देऊन गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन मार्गक्रमण केलेल्या या विभागांना पारितोषिक स्वरुपातील अनुदान संशोधन कार्ये आणि विकासासाठी वापरता येणार आहे.</p>
<p><strong>प्रशासकीय गुणवत्ता अभियान व प्रशासकीय गुणवत्ता पुरस्काराचे मानकरीः</strong></p>
<p>या पुरस्कारांमध्ये निकाल कक्ष व अवैध साधन चौकशी कक्ष, मानव संसाधन विकास कक्ष, विद्यार्थी विकास विभाग, मादाम कामा मुलींचे वसतिगृह आणि नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी या प्रशासकीय विभागांना रुपये १ लाखाचे अनुदान देऊन सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार या विभागांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.</p>
<p><strong>गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्काराचे मानकरीः</strong></p>
<p>स्थापना दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपकुलसचिव निळकंठ तळवडेकर, सहाय्यक कुलसचिव चेतन कमलल्लू, सिस्टिम ऑपरेशन ऑफिसर प्रविण म्हात्रे, उपलेखापाल प्रकाश राऊळ, मुख्य लिपिक गणेश माने, सहायक लेखापाल तेजस कदम, कनिष्ठ ग्रंथालय सहायक सुचिता प्रविण सावे, वरिष्ठ लिपिक भागवत भोसले, भावना ठाकूर, वरिष्ठ लिपिक, मंजिरी चव्हाण, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक योगेश राऊत, दप्तरी अरविंद शिरगांवकर, गणेश लाखण, शिपाई संदिप घाग आणि नंदा बडेला यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले. दिपाली ठाकूर, मुख्य लिपिक आणि अर्जुन रांबाडे, पहारेकरी यांना लक्ष्मीबाई देशमुख पुरस्काराने गौरविण्यात आले.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232836/">१७० वर्षांचा समृद्ध, गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाचा स्थापना दिन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>मुलांमधील असंसर्गिक रोगांच्या उपचारांसाठी एम्स नागपूर एक आदर्श प्रारूप विकसित करतेय:डॉ. प्रशांत जोशी</title>
		<link>https://www.berartimes.com/maharashtra/232690/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Jul 2026 14:42:53 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232690</guid>

					<description><![CDATA[<p>नागपूर/गोंदिया,दि.१५ः&#8211; पश्चिम भारतातील मोठ्या भागातील मुले असंसर्गिक रोगांची (NCDs) शिकार होत आहेत, परंतु त्यांना अनेकदा दर्जेदार उपचार मिळत नाहीत. परिणामी, नागपूर येथील &#8216;ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस&#8217; (एम्स) बाधित मुलांसाठी उपचारांचे असे एक प्रारूप विकसित करत आहे, ज्याची अंमलबजावणी देशभरात केली जाऊ शकेल असे विचार एम्स नागपूरचे सीईओ डॉ. प्रशांत जोशी यांनी व्यक्त केले.ते [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232690/">मुलांमधील असंसर्गिक रोगांच्या उपचारांसाठी एम्स नागपूर एक आदर्श प्रारूप विकसित करतेय:डॉ. प्रशांत जोशी</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>नागपूर/गोंदिया,दि.१५ः</strong>&#8211; पश्चिम भारतातील मोठ्या भागातील मुले असंसर्गिक रोगांची (NCDs) शिकार होत आहेत, परंतु त्यांना अनेकदा दर्जेदार उपचार मिळत नाहीत. परिणामी, नागपूर येथील &#8216;ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस&#8217; (एम्स) बाधित मुलांसाठी उपचारांचे असे एक प्रारूप विकसित करत आहे, ज्याची अंमलबजावणी देशभरात केली जाऊ शकेल असे विचार एम्स नागपूरचे सीईओ डॉ. प्रशांत जोशी यांनी व्यक्त केले.ते एम्स नागपूर, युनिसेफ (UNICEF) इंडिया आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पश्चिम विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सींग महाविद्यालय सभागृहात आयोजित (दि.१४ जुर्ले) कार्यशाळेत तज्ज्ञांनी मुलांमधील असंसर्गिक रोगांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन कसे करावे यांबाबत मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.</p>
<p>डाॅ.जोशी पुढे म्हणाले की,मुलांमधील असंसर्गिक रोगांचा कालावधी (incubation period) मोठा असतो आणि त्यांची सुरुवात अनेकदा बालपणातच होते; त्यामुळे या रोगांचे वेळीच निदान, निरंतर काळजी आणि एक सक्षम सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे. देशभरात अनुकरण करता येण्याजोगी आरोग्य-देखभाल प्रारूपे विकसित करण्यासाठी एम्स नागपूर कटिबद्ध आहे.कार्यशाळेदरम्यान, माध्यम प्रतिनिधींना बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते, याची प्रत्यक्ष माहिती एनसीडीएस केंंद्र व संबधित आजाराशी लढत असलेल्या रुग्ण व नातेवाईंकाशी भेट करुन देत देण्यात आली. तसेच आरोग्यविषयक वृत्तांकन अधिक प्रभावी करण्यासाठीच्या सर्वोत्तम पद्धतींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.</p>
<p>तज्ज्ञांनी नमूद केले की, पश्चिम आणि मध्य भारतातील आदिवासी व ग्रामीण भागांत तपासणी आणि विशेष वैद्यकीय सेवांच्या मर्यादित सुविधांमुळे मुलांमधील असंसर्गिक रोगांची प्रकरणे अनेकदा उशिरा समोर येतात. दुसरीकडे, शहरी भागांत बैठी जीवनशैली, स्क्रीनचा अतिवापर आणि आहारातील बदलांमुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण, आदिवासी किंवा शहरी अशा कोणत्याही भागात, आजाराची स्थिती गंभीर होईपर्यंत अनेकदा या रोगांचे निदान होत नाही.</p>
<p>याप्रसंगी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पश्चिम विभाग) महासंचालक स्मिता वत्स शर्मा म्हणाल्या, &#8220;सार्वजनिक आरोग्याविषयीच्या बातम्यांमुळे जनजागृती होते आणि लोक कृतीशील होतात. पुराव्यांवर आधारित माहिती देणे आणि मुलांसमोरील आरोग्यविषयक नवीन आव्हाने नागरिकांना समजण्यास मदत करतील अशा बातम्या देणे ही पत्रकारांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे.&#8221;</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232690/">मुलांमधील असंसर्गिक रोगांच्या उपचारांसाठी एम्स नागपूर एक आदर्श प्रारूप विकसित करतेय:डॉ. प्रशांत जोशी</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘भारत टेक्स’मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन</title>
		<link>https://www.berartimes.com/national/232677/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Jul 2026 12:55:19 +0000</pubDate>
				<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232677</guid>

					<description><![CDATA[<p>उद्योगस्नेही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन नवी दिल्ली, दि. १५ :नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’ मध्ये मंगळवारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा महाराष्ट्राचा भागीदार राज्य (पार्टनर स्टेट) म्हणून या प्रतिष्ठित प्रदर्शनात सहभाग असून, राज्याच्या वस्त्रोद्योग [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/232677/">वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘भारत टेक्स’मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div class="xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a">
<div dir="auto"><strong>उद्योगस्नेही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन</strong></div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>नवी दिल्ली, दि. १५</strong> :नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’ मध्ये मंगळवारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा महाराष्ट्राचा भागीदार राज्य (पार्टनर स्टेट) म्हणून या प्रतिष्ठित प्रदर्शनात सहभाग असून, राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता, परंपरा आणि आधुनिकतेचा संगमाचे दर्शन या दालनातून होत आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती अंशू सिन्हा, महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त श्वेता सिंघल, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, उपसचिव श्रीकृष्ण पवार, रेशीम विभागाचे उपसचिव तुषार पवार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे दालन हे राज्याच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे आहे. पारंपरिक तंतूपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा संपूर्ण प्रवास या दालनातून प्रभावीपणे साकारण्यात आला असून, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग धोरण हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही धोरणांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">श्री. सावकारे पुढे म्हणाले की, २०१७ ते २०२३ या वस्त्रोद्योग धोरणाला उद्योजकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य सरकारने २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी अधिक व्यापक आणि आकर्षक धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत विविध झोननुसार भांडवली अनुदान, वीज दरावरील सवलती, यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक सहाय्य, कर सवलती आणि इतर अनेक प्रोत्साहनपर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा वेग वाढला असून नवीन उद्योग उभारण्यासाठी राज्य सर्वार्थाने अनुकूल ठरत आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">याच कार्यक्रमात वस्त्रोद्योग क्षेत्राला आधुनिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘टेक्सटाइल डॅडी’ या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. उत्पादक, पुरवठादार, खरेदीदार आणि उद्योगाशी संबंधित विविध घटकांना एकाच डिजिटल मंचावर जोडून व्यवसाय सुलभ करणे, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि उद्योगांना नवीन संधी निर्माण करून देणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">उद्घाटनानंतर मंत्री सावकारे यांनी महाराष्ट्र दालनातील विविध स्टॉल्सची पाहणी केली. या दालनात महाराष्ट्र हँडलूम कॉर्पोरेशन लिमिटेड, महाराष्ट्र पॉवरलूम कॉर्पोरेशन लिमिटेड, रेशीम संचालनालय, उद्योग विभाग आणि अमरावती येथील पीएम मित्र पार्क या पाच प्रमुख किऑस्कच्या माध्यमातून राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्राची विविधांगी ताकद सादर करण्यात आली आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">या दालनात पारंपरिक पैठणी, करवत काठी, हिमरू, खण साड्या, सोलापूरच्या जगप्रसिद्ध चादरी, बांबू टॉवेल्स, टेरी टॉवेल्स तसेच भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त कोल्हापुरी चपला यांसारख्या महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले असून, देश-विदेशातील खरेदीदार, निर्यातदार आणि उद्योग प्रतिनिधींकडून या उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">दरम्यान, १४ जुलै रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांच्या उपस्थितीत &#8216;भारत टेक्स २०२६&#8217;चे उद्घाटन झाले. १३० हून अधिक देशांतील सुमारे ६,००० आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि १.३ लाखांपेक्षा अधिक व्यावसायिक प्रतिनिधी या जागतिक प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.</div>
</div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/232677/">वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘भारत टेक्स’मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक</title>
		<link>https://www.berartimes.com/maharashtra/232582/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 12 Jul 2026 16:03:32 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232582</guid>

					<description><![CDATA[<p>ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार. पंढरपूर, दि १२ :- आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार ५०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232582/">आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div class="xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a">
<div dir="auto"><strong>ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार.</strong></div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>पंढरपूर, दि १२ :-</strong> आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार ५०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक,पंढरपूर येथे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर,पंढरपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती.प्रणिता भालके व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत.७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना &#8216;अमृत ज्येष्ठ नागरिक योजना&#8217; अंतर्गत मोफत प्रवास,तर महिलांना &#8216;महिला सन्मान योजना&#8217; अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी.तसेच पंढरपूरातील विविध बसस्थानकांवर थांबलेल्या बसेसची अंतर्गत व बाह्य स्वच्छता,निर्जंतुकीकरण करावे, आषाढी यात्रेसाठी विशेष बससेवा&#8221; असा दर्शनी फलक लावण्यात यावा, त्याचबरोबर चालक व वाहक यांच्या आरोग्याच्या वैद्यकीय तपासणीची बसस्थानक परिसरात व्यवस्था करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.परतीच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून मार्गनिहाय स्वतंत्र रांगा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रवाशांना बसेसमध्ये प्रवेश देण्यात यावा अशा सूचनाही परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी दिल्या.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने ५ हजार १४५ विशेष बसेस चालवून तब्बल २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती.यंदा त्याहून अधिक सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.</div>
</div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232582/">आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी</title>
		<link>https://www.berartimes.com/maharashtra/232560/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 12 Jul 2026 05:26:41 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232560</guid>

					<description><![CDATA[<p>बचावकार्याचा घेतला आढावा; बाधितांच्या नातेवाईकांशी साधला संवाद, प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना पुणे,दि.१२ः मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून बचाव कार्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232560/">उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div class="xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a">
<div dir="auto"><strong>बचावकार्याचा घेतला आढावा; बाधितांच्या नातेवाईकांशी साधला संवाद, प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना</strong></div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>पुणे,दि.१२ः</strong> मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून बचाव कार्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, महापौर रवी लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, &#8220;मोशी येथे घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि संवेदनशील आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही या दुर्घटनेच्या पहिल्या दिवसापासून मी संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून होते. तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर माध्यमांद्वारे मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहून बचावकार्याचा आढावा घेत होते.&#8221;</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">त्या पुढे म्हणाल्या, &#8220;कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, सततचा पाऊस आणि ढिगाऱ्याची गुंतागुंतीची रचना यामुळे बचावकार्यात काही अडथळे निर्माण झाले. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीने शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनास्थळावरून बाहेर काढण्यात येणारे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सन्मानपूर्वक दाखवावेत, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.&#8221;</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, &#8220;या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवालानुसार जे कोणी जबाबदार आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच बाधित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी संबंधित कंपनी, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या तिन्ही स्तरांवरून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे.&#8221;</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">नातेवाईकांशी झालेल्या संवादाचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, &#8220;मी स्वतः बाधितांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांच्या भावना, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या आहेत. लवकरच राज्य शासन, महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंपनी यांच्या संयुक्त बैठकीत त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून त्यांना न्याय मिळेल, यासाठी आवश्यक त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल.&#8221;</div>
</div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232560/">उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली,२ लाखांपर्यंत कर्ज माफ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</title>
		<link>https://www.berartimes.com/maharashtra/232496/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 10 Jul 2026 15:24:23 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232496</guid>

					<description><![CDATA[<p> &#8216;पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने&#8216; तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ   कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम; गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण  मुंबई, दि. १० : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी &#8216;पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना&#8216; ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232496/">कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली,२ लाखांपर्यंत कर्ज माफ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span lang="EN-GB"> </span><b><span lang="EN-GB">&#8216;</span></b><b><span lang="MR">पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने</span></b><b><span lang="EN-GB">&#8216; </span></b><b><span lang="MR">तून ५६ लाख शेतकऱ्यांना </span></b><b></b><b><span lang="MR">३६ हजार ५८५ कोटींचा लाभ</span></b><b></b></p>
<p><span lang="EN-GB">  </span><b><span lang="MR">कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम</span></b><b><span lang="EN-GB">; </span></b><b><span lang="MR">गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ</span></b><b><span lang="EN-GB">, </span></b><b><span lang="MR">सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण</span></b><b></b></p>
<p><strong><span lang="EN-GB"> </span><span lang="MR">मुंबई</span><span lang="EN-GB">, </span></strong><span lang="MR"><strong>दि. १० :</strong> राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी </span><span lang="EN-GB">&#8216;</span><span lang="MR">पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना</span><span lang="EN-GB">&#8216; </span><span lang="MR">ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  योजनेमध्ये ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">अशा शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करुन वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे.</span></p>
<p><span lang="MR">त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रण</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">अमली पदार्थांविरोधातील कारवाई</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">पोलीस आधुनिकीकरण</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">जलसंपदा</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">कृषी आणि विविध विकासकामांबाबत शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहात दिली.</span></p>
<p><span lang="MR">      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">राष्ट्रीयीकृत</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">व्यापारी</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. पूर्वीच्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. मात्र</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">नव्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे.</span></p>
<p><span lang="MR"> महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा आणि २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली  आहे. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.</span></p>
<p><span lang="MR">कृषी क्षेत्रासाठी राज्य शासन दरवर्षी सुमारे ९५ हजार कोटी रुपयांचा खर्च करीत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च केले जातात. कापसाची १३६ लाख क्विंटल खरेदी करून १० हजार ८८३ कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. सोयाबीनचे ६ लाख टन उत्पादन ३ हजार १९८ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">तर कांदा खरेदीमुळे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत झाली आहे. ठिबक सिंचनासाठी प्रलंबित २१७ कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येतील</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">तसेच कृषी समृद्धी योजनेतील उर्वरित निधी पुरवणी मागण्यांतून उपलब्ध करून दिला जाईल</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">असे त्यांनी सांगितले.</span></p>
<p><span lang="MR">राज्यात कुठेही नियोजित भारनियमन नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">यंदा ३२ हजार मेगावॅटपर्यंतची वीज मागणी पूर्ण करण्यात आली आहे. ७६ टक्के कृषी फिडरवर दिवसा वीजपुरवठा सुरू असून उर्वरित भागातही काम सुरू आहे. स्मार्ट मीटरबाबत प्राप्त झालेल्या बहुतांश तक्रारी तपासणीत चुकीच्या आढळल्या असून वाढीव वीजबिलांचा संबंध स्मार्ट मीटरशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.</span></p>
<p align="center"><b><span lang="MR">गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात वाढ</span></b></p>
<p><span lang="MR">            कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">राष्ट्रीय गुन्हेगारी आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा प्रति एक लाख लोकसंख्येमागील गुन्हेगारी दराच्या बाबतीत देशात सातवा क्रमांक आहे. मे २०२५ ते मे २०२६ या कालावधीत दुखापत</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">जबरी चोरी</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांत घट झाली असून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गुन्हे सिद्धतेचा दर ४४.२ टक्क्यांवरून ५२.६ टक्क्यांपर्यंत वाढला असून तो ७० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.</span></p>
<p><span lang="MR">नवीन फौजदारी कायद्यांमुळे तपास प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाल्याचे सांगताना त्यांनी ई-साक्ष</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">फॉरेन्सिक तपास</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिटल पुरावा व्यवस्थापनाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असल्याचे सांगितले. गंभीर गुन्ह्यांतील दोषारोपपत्रे विहित मुदतीत दाखल करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असून फिर्यादींना मालमत्ता परत मिळण्याचे प्रमाणही वाढल्याचे त्यांनी नमूद केले.</span></p>
<p><span lang="MR">            महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">२०२१ ते २०२६ या कालावधीत बेपत्ता झालेल्या ९३ टक्के महिलांचा शोध घेण्यात यश आले आहे. </span><span lang="EN-GB">&#8216;</span><span lang="MR">ऑपरेशन मुस्कान</span><span lang="EN-GB">&#8216; </span><span lang="MR">अंतर्गत ४३ हजार ५९१ बेपत्ता बालकांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले आहे.</span></p>
<p><span lang="MR">सायबर गुन्ह्यांविरोधातील कारवाईबाबत मुख्यमंत्री फडणवीस फडणवीस म्हणाले</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत सायबर फसवणुकीतील ४३९ कोटी रुपये गोठविण्यात आले असून निधी गोठविण्याचे प्रमाण ११ टक्क्यांवरून २७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ५० हजार रुपयांपर्यंतच्या फसवणुकीतील रक्कम तातडीने परत करण्याची व्यवस्था करण्यात आली असून हजारो नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे. </span><span lang="EN-GB">&#8216;</span><span lang="MR">तपास सारथी</span><span lang="EN-GB">&#8216; </span><span lang="MR">ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तपास प्रणाली सीसीटीएनएसशी जोडण्यात आली असून तपास प्रक्रियेला गती मिळाली आहे. एपीके फाइल्स डाउनलोड करताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">असे आवाहनही त्यांनी केले.</span></p>
<p><span lang="MR">अमली पदार्थांविरोधातील कारवाईत आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटविरोधात कारवाई करुन मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या </span><span lang="EN-GB">&#8216;</span><span lang="MR">ब्रोमो-४ मिथाईल प्रोपिओ फेनॉल</span><span lang="EN-GB">&#8216; </span><span lang="MR">या रसायनाचा नियंत्रित पदार्थांच्या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे अवैध उत्पादनाला आळा बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. </span><span lang="EN-GB">&#8216;</span><span lang="MR">ड्रग फ्री मुंबई</span><span lang="EN-GB">&#8216; </span><span lang="MR">अभियानांतर्गत चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याचे धोरण स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.</span></p>
<p><span lang="MR">पोलीस आधुनिकीकरणासाठी केंद्र शासनाने ७३३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून अत्याधुनिक तंत्रज्ञान</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">ड्रोन</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">रडार</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">स्पीडबोट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यात येणार आहे. राज्यात ९ हजार ७६२ पोलीस निवासस्थानांची कामे सुरू असून मुंबईत ४० हजार नवीन पोलीस निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. तसेच ९३ अत्याधुनिक पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार असून ही  समिती ३ महिन्यांत अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.</span></p>
<p><span lang="MR">जलसंपदा व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">नाग नदी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जायकामार्फत २</span><span lang="EN-GB">,</span><span lang="MR">४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">सांडपाणी वाहिन्या आणि पंपिंग स्टेशन उभारले जात आहेत. नळगंगा</span><span lang="EN-GB">–</span><span lang="MR">वैनगंगा नदीजोड प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची अंतिम मान्यता मिळताच याच वर्षी काम सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.</span></p>
<p><span lang="MR">सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून आवश्यक ती कारवाई केली जाईल</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">असे स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">राज्यातील विकास</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">शेतकरी कल्याण</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका कायम राहील.</span></p>
<p><span lang="MR">अधिवेशनाच्या समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले</span><span lang="EN-GB">, &#8220;</span><span lang="MR">शेतकरी</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">वारकरी आणि कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. त्यांच्या श्रम</span><span lang="EN-GB">, </span><span lang="MR">श्रद्धा आणि त्यागातूनच महाराष्ट्राचा विकास घडतो. त्यांच्या आशीर्वादाने राज्याला नवाचार आणि नवा आकार देण्याचे काम शासन करेल.&#8221;</span></p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232496/">कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली,२ लाखांपर्यंत कर्ज माफ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>
