महिला मुख्याधिकार्‍यांची लेखपालास मारहाण

0
95

चंद्रपूर-बरेचदा शासकीय कार्यालयात कर्मचारी व जनता किंवा लोकप्रतिनिधी यांच्यात वाद, शिवीगाळप्रसंगी मारहाण झाल्याच्या बातम्या कानावर येत असतात. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील राज्याच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यात मात्र नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी तसेच लेखापाल यांचा वाद विकोपाला गेला असून, महिला मुख्याधिकार्‍यांनी लेखापालाच्या कक्षात जाऊन शिवीगाळ करत लेखापालाला चक्क मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जिवती नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी कविता गायकवाड यांनी वेतन व भत्ते रोखल्याचा लेखापालावर आरोप करून त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. त्याचप्रमाणे लेखापालाचा खासगी मोबाईल व लॅपटॉप फोडल्याची लेखी तक्रार लेखापाल सागर कुर्‍हाडे यांनी जिवती पोलिसात केली असल्याने खळबळ माजली आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (१0 जानेवारी) मुख्याधिकारी कविता गायकवाड या अचानक सागर कुर्‍हाडे यांच्या कक्षात गेल्या व त्यांनी तू माझा पगार कसा अडवला, तुझी लायकी आहे का? अशा शब्दात वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या महिला मुख्याधिकारी गायकवाड यांनी कुर्‍हाडे यांच्या टेबलवर ठेवलेला त्यांचा खासगी लॅपटॉप उचलून जोरात आदळला. त्याचप्रमाणे त्यांचा मोबाईलसुद्धा फोडला. एवढय़ानेच समाधान न झाल्याने मुख्याधिकार्‍यांनी टेबलवर ठेवलेल्या नस्ती, पेपरवेट, कॅल्क्युलेटर आदी वस्तुसुद्धा फेकून मारल्या, असा सागर कुर्‍हाडे यांचा आरोप आहे.
सागर कुर्‍हाडे यांच्या म्हणण्यानुसार मुख्याधिकारी गायकवाड यांचे वेतन नियमितपणे दिल्या जात असून, नोव्हेंबर २0२१ च्या वेतनाचा धनादेश त्यांनी स्वत:च्याच अधिकारात रोखुन धरला. कुर्‍हाडे यांनी जारी केलेल्या धनादेशाचा क्रमांक व अदा केल्याची तारीखसुद्धा सांगितली आहे. त्याचप्रमाणे मुख्याधिकारी नियमबाह्य पद्धतीने देयके अदा करण्यास दबाव टाकत असल्याचे त्यांचे म्हणणे असून, आपण वेळोवेळी सहकार्य करूनसुद्धा आपल्यावर महिला मुख्याधिकार्‍यांनी शारीरिक हल्ला केला असून, आपल्या खासगी वस्तूंची नासधूस केल्यामुळे आपल्याला त्याची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात मुख्याधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मारहाणीचा व्हिडिओ अर्धवट असून, सुरुवातीला काय घडले याचा व्हिडिओ नाही, असे सांगितले. मात्र, कर्मचार्‍यांशी वाद झाल्यास नियमाप्रमाणे तक्रार करून कारवाई करणे अपेक्षित असताना महिला मुख्याधिकारी कर्मचार्‍यांना मारहाण करतात, हे अनाकलनीय आहे. अखेर तीन महिन्यांनंतर राजुरा आगारातून पहिली बस निघाली.