नव्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा सकाळी ९ ते ४ पर्यंत भरणार

0
6017

मुंबई,दि.१०ः येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे.तर विदर्भातील जिल्ह्यांमधील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा या सुरुवातीला सकाळ-सत्रामध्ये भरवल्या जातील आणि त्यानंतर या शाळा नियमित भरतील.  यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी नऊ वाजे सुरु होतील आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.

राज्यातील शाळा आता सकाळी नऊ ते सायंकाळी चार पर्यंत राहतील.शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून सकाळी नऊ वाजेपासून ते 9:25 पर्यंत परिपाठ राहील. 9:25 पासून ते 11:25 पर्यंत सुरुवातीचे तीन लेक्चर्स होतील. 11:25 ते 11:35 पर्यंत दहा मिनिटांची लहान सुट्टी राहील. 11: 35 ते 12:50 पर्यंत दोन तासिका होतील.12:50 ते दीड वाजेपर्यंत मोठी सुट्टी राहील. दीड वाजेपासून ते तीन वाजून 55 मिनिटांपर्यंत उर्वरित तासिका घेतल्या जाणार आहेत आणि शेवटचा पाच मिनिटात वंदे मातरम होईल आणि शाळा सुटणार आहे. सदरचे वेळापत्रक येत्या शैक्षणिक वर्षांपासून अमलात आणले जाईल अशी माहिती समोर येत आहे.