Home Featured News बंधार्याचे देयके हवे 15 टक्के कमीशन द्या

बंधार्याचे देयके हवे 15 टक्के कमीशन द्या

0

गोंदिया -जिल्हा परिषदेचा कुठलाही विभाग असो तो विवादीत नसावा असे शक्यच नाही.वित्त व बांधकाम विभाग तर आधीपासूनच कमीशन करीता बदनाम झालेले आहेत.त्यांच्यासोबतली लघुपाटबंधारे विभाग आणि समाजकल्याण विभागाचाही समावेश आहे.आता तर 15 टक्के कमीशनची रक्कम जोपयर्ंत हातात देणार नाही,तोपयर्ंत तुमच्या कामाचे देयकेच मंजुर करणार नसल्याचे बंधारे बांधकाम करणार्या कंत्राटदारांना सांगून लघुपाटबंधारे उपविभाग अजुर्नी मोरगावच्या अभियंत्याने धमालच उडवून दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातंगर्त येत असलेल्या अजुर्नी मोरगाव उपविभागातील अभियंता एस.एन.राऊत यांनी अजुर्नी मोरगाव तालुक्यातीलच केशोरी गोठणगाव परिसरात मे महिन्यात तयार करण्यात आलेल्या बंधारा बांधकामाचे देयके काढण्यासाठी 15 टक्के कमीशन मागितल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे पोचली आहे.सविस्तर असे की,केशोरी येथील एका कंत्राटदाराने मे महिन्यात बंधारा बांधकाम केले.बंधार्याचे थोडे काम शिल्लक होते.त्यावेळी अभियंता राऊत यांनी काम झाले आहे पुर्ण बिल काढून देतो असे कंत्राटदाराला सांगितले.त्यानुसार सदर कंत्राटदार 5 टक्के दरांने 50 हजार रुपये त्या कामाचे राऊत यांच्याकडे घेऊन गेला.तेव्हा मात्र कंत्राटदाराने दाेन चार महिन्याने तुमचे काम अधर्वट आहे पुणर् झालेले नाही,ते पुर्ण करा तसेच 15 टक्के कमीशनची रक्कम म्हणजे दीड लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.जोपर्य़त ती रक्कम मिळणार नाही,तोपयर्ंत देयके सुध्दा मिळणार नसल्याचे सांगितले.जेव्हा मे महिन्यातच काम थोडे शिल्लक होते त्यावेळी राऊत यांनी काम झाल्याचे का सांगितले नंतर दोन चार महिन्यानीच काम शिल्लक असल्याचे का आठवले या कालावधीत ते गप्प कशासाठी होते आदी प्रश्न उपस्थित झाले असून राऊत यांच्या माध्यमातून लघुपाटबंधारे विभागात कमीशनच्या रुपात कशा काळाबाजार सुरु आहे हे उघडकीस आले असून या कमीशनच्या टक्केवारीत वरिष्ठ अधिकारी सहभागी नसतील असे म्हणने सुध्दा शंकेचे झाले आहे.
कारण राज्यातील एकमेव गोंदिया जिल्हा परिषद अशी आहे की यात इमानदार अधिकारी सर्वाधिक आहेत.अशा परिस्थितीत या जिल्हा परिषदेतील अधिकारी कमर्चारी कमीशन कसे मागू शकतात.लोक मरण पावले तरी हे डोंगा खरेदीत भ्रष्टाचार होईल या भितीने खरेदी करत नाही,उलट लोक मेले तरी चालतील अशा भूमिकेच्या जिल्हा परिषदेला काही कंत्राटदार मात्र कमीशनखोरीचे रुप देऊन बदनाम करतात की काय अशी स्थिती निमार्ण झाली आहे.
काम न करता कसे बिले काढणार-अभियंता राऊत
जेवढे काम झालेले आहे तेवढे रनिगं बिल डिव्हीजनला सादर केले आहे,काम अधर्वट आहे.मी कुठल्याही कमीशनची मागणी केलेली नाही.उलट काम पुर्ण करा मी बिल काढून देतो असे सांगितल्यावर सदर कंत्राटदार राजकीय दबाव आणत असल्याची माहिती अभियंता एस.एन.राऊत यांनी दिली.

Exit mobile version