’जनता कर्फ्यू’ दरम्यान गृहमंत्र्यांनी साभांळली स्वयंपाकघराची सूत्रे

0
173

नागपूर,दि.23 : ‘कोरोना’विरोधात लढा देत असताना पुकारण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला जनतेसोबतच लोकप्रतिनिधींनीदेखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांच्यातील ‘मास्टरशेफ’चे दर्शन कुटुंबीयांना बºयाच कालावधीनंतर झाले. दिवसभर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेत असताना देशमुख यांनी निवांत क्षण काढले व चक्क स्वयंपाकघराची सूत्रे हाती घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे ‘जनता कर्फ्यू’त राज्याचे गृहमंत्री म्हणून ते व्यस्त असताना घरातील गृहमंत्र्यांना मात्र त्यांनी आराम दिला.सकाळापासूनच अनिल देशमुख हे निवासस्थानाहून राज्यातील ‘अपडेट्स’घेत होते व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करत होते. यादरम्यान त्यांना थोडी सवड मिळाली अन् लगेच त्यांनी आपला मोर्चा स्वयंपाकघराकडे वळविला. आवश्यक ते सर्व मसाले टाकून त्यांनी फुलकोबीची भाजी बनविली व काही वेळातच चवदार भाजीसह स्वयंपाक तयार केला. त्यांच्या पाककलेने त्यांच्या पत्नी आरती तसेच मुलगी डॉ.पायल व सून राहत यादेखील प्रभावित झाल्या. यापुढे १५ दिवस तुम्हीच स्वयंपाक करा, असे म्हणत आरती देशमुख यांनी गृहमंत्र्यांना प्रशस्तीपत्रदेखील दिले.विशेष म्हणजे यानंतर लागलीच देशमुख यांनी परत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.खासगी डॉक्टरांनीदेखील पुढाकार घ्यावा‘कोरोना’शी लढण्यासाठी प्रशासनाप्रमाणेच समाजानेदेखील पुढाकार घेतला आहे. सरकारी दवाखान्यांतील डॉक्टर्स अहोरात्र काम करतच आहेत. खाजगी दवाखाने व डॉक्टरांनीदेखील पुढाकार घेऊन सरकारी यंत्रणांना मदत करावी, असे आवाहन अनिल देशमुख यांनी केले.