माझे कुटुंब माझी जबाबदारी :गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली जनजागृती

0
31

सातारा दि. 4 : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई  यांनी  पाटण मतदारसंघातील प्रमुख गावांमध्ये जाऊन सामाजिक अंतर पाळत स्पीकरवरुन या अभियानाची जनजागृती  केली.

मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी “माझे कुटुंब  माझी जबाबदारी” ही संकल्पना राज्यातील जनतेच्या समोर ठेवली आहे. मुख्यमंत्री यांच्या या संकल्पनेची जनजागृती गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी सामाजिक  अंतर पाळत स्पीकरवरून  ग्रामीण भागातील नागरिक,महिला व युवक-युवतींना या मोहिमेचे महत्त्व पटवून दिले. कोरोना संसर्गापासून आपणच आपला बचाव केला पाहिजे याकरिता ही मोहीम खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांतील प्रत्येकाने सतत मास्क वापरा, बाहेरुन घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा, घरातून बाहेर गेल्यानंतर सामाजिक अंतर पाळा असे आवाहन  करीत अनेक गावांत जनजागृती केली.