थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी रहिवाशांना आधार नोंदणी करण्याचे आवाहन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
10

मुंबईदि. 20 : सामाजिक न्याय विभागासह इतरविभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी रहिवाशांनी आधार नोंदणी करावीअसे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

समाजातील डावललेल्या घटकांना सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही त्यांनी नमूद केले. आधार सक्षमीकरण आणि रहिवाशांच्या कल्याणासाठी डीबीटी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालयमुंबई व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समन्वयाने “महाराष्ट्र राज्यासाठी आधार वापर सुलभआधारच्या वापराला चालना देण्यासाठी नवीन/अद्ययावत उपक्रम” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज सह्याद्री अतिथीगृहयेथे करण्यात आले होते.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ गर्ग, (DDG UIDAI RO) मुंबई सुमनेश जोशी, Jt Secy DBT मिशन केंद्र सरकारसौरभ तिवारीअमोद कुमार, (DDG UIDAI) (मुख्यालय)अन्न  आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारेकौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्माविधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेंद्र डी. सावंतनोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकरसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव प्रवीण के. पुरीशालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझीपोक्राचे प्रकल्प संचालक परिमल सिंग यांच्यासह कार्यशाळेला राज्य शासनकेंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ गर्ग यांनी गेल्या दशकात आधारने केलेल्या प्रगतीबद्दल विवेचन केले. त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले कीआधार प्रमाणीकरण ऑनलाइन प्रमाणीकरणाद्वारे एखाद्याची ओळख सिद्ध करण्यासाठी त्वरित यंत्रणा प्रदान करते. (UIDAI) रहिवाशांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवेल यावरही त्यांनी भर दिला. एस. असीम गुप्ता, (मुख्य सचिव आयटीमहाराष्ट्र सरकार ) यांनी नोडल विभाग DIT द्वारे आधार वापर वाढवण्यासाठीकलम 7 आणि कलम 4,4,b,(ii) अंतर्गत योजनांच्या अंमलबजावणीसाठी घेतलेली पावले आणि उपक्रम याची माहिती दिली. त्यांनी DIT भविष्यातील फोकस क्षेत्रे आणि योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व विभागांकडून आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण समर्थन यावर प्रकाश टाकला.श्री. सुमनेश जोशी, (DDG UIDAI RO मुंबई,) यांनी यावेळी बोलताना आधार हा भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा गाभा कसा बनला आहे हे स्पष्ट केले. ते म्हणाले कीआधारने विशिष्टताप्रमाणीकरणआर्थिक माहिती आणि ई-केवायसी या मूळ वैशिष्ट्यांसह सरकारी अधिकाऱ्यांना विविध सबसिडीफायदे आणि सेवांच्या वितरणासाठी थेट रहिवाशांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे. कार्यशाळेच्या विविध सत्रांमध्ये आधारची वैशिष्ट्येआधार नोंदणी आणि घेतलेले पुढाकारआधारच्या वापरावरील प्रमुख विकासडेटा गोपनीयता आणि माहिती सुरक्षायावर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारसाठी थेट लाभ हस्तांतरण DBT आणि त्याची अंमलबजावणी प्रक्रिया. UIDAI च्याअधिकाऱ्यांनी DBT चे महत्त्व आणि राज्य एकत्रित निधीतून वितरित केलेल्या योजना आणि लाभांसाठी कलम – 7 राजपत्रित अधिसूचना जारी करणे यावरप्रकाश टाकला. सुशासन अंतर्गत अधिसूचना जारी करण्यासाठी कलम 4(4)(b)(ii) शी संबंधित चर्चाही झाली.