
*धान उत्पादक शेतकरी बोनसाच्या प्रतिक्षेत*
लाखनी:-लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लाखनी तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपीटी मुळे धान पिकांचे मोठे नुकसान झाले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेला बोनस तात्काळ देण्यात यावा. यासाठी लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष योगराज झलके यांच्या नेतृत्वाखाली आज तहसिल कार्यालय लाखनी येथे तहसिलदार यांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात आला.
मागील काही दिवसांपासून लाखनी तालुक्यात विजांच्या कडकडाट सह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
लाखनी तालुक्यामध्ये सिंचन सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते, काही शेतकऱ्यांनी धान पिकाची कापणी, मळणी केली, तर काही शेतकऱ्यांचे धान पीक कापून कळपा शेतातच आहेत, बहुतांश शेतकऱ्यांचे धानाचे पीक अजूनही शेतातच उभे आहेत. अशातच मागील तीन दिवसापासून संपूर्ण तालुक्यामध्ये ठिक ठिकाणी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने शेतात पाणी साचले, कापलेला धान्याचा कळपा पाण्यावर तरंगू लागल्या, तर उभे असलेले धान पीक वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातच पडल्याने पाण्याखाली आले. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदील झाला, संकटात सापडला आहे. तर या शेतकऱ्यांना शासनाने झालेला नुकसानाची तात्काळ सर्वे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच शासनाने जाहीर केलेला बोनस अजून पर्यंत मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेला बोनस तात्काळ देण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी यांच्यासह जिल्हा महासचिव राजूभाऊ निर्वाण, सभापती पं. स. लाखनी अश्विनी मोहतुरे (कान्हेकर), सभापती खरेदी विक्री समिती महादेव गायधनी, उपसभापती खरेदी विक्री समिती नरेंद्र झलके, लाखनी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन निर्वाण, खरेदी विक्री समिती संचालक ईश्वरदत्त गिऱ्हेपुंजे, खरेदी विक्री समिती संचालक सचिन बागडे, नगरसेवक विपुल कांबळे, टेकराम (अनिल) बोरकर, भोजराम तलमले, माधवराव भोयर, जीवन बावनकुळे, योगेश गायधने, दुर्गेश चोले, विजय वाघाये, धनपाल बोपचे, शिवदास गायधने, तुळशीदास बांते, राजेश क्षीरसागर, समीर मस्के, ईश्वर कामथे, मुशीराम राघोर्ते, रवींद्र खोब्रागडे, रवींद्र रामटेके आदी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.