बंडखोरांना मोठे करुन मी पापाची फळे भोगत आहे; मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय- उद्धव ठाकरे

0
87

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून मला मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता. मला बहुमत चाचणीचा खेळ खेळायचा नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिला अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालांचा निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश महाविकास आघाडीला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी रात्री साडे नऊ वाजता संवाद साधला.

आमचेच लोक आमच्यावर नाराज

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ज्यांनी आपल्याला मोठे केले असे लोक सत्ता आल्यावर आमच्यावरच नाराज होत आहेत. ज्यांना सगळे दिले ते नाराज झाले; मात्र ज्यांना काही दिले नाही ते सगळे आजही सोबत आहेत. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यामुळे न्यायदेवतेचा निकाल आपन मान्य केला आहे. काँग्रेसवाले बाहेरून पाठींबा द्यायला तयार आहेत, मात्र मी त्यांना तसे सांगितले नाही असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.

नामांतर करून हिंदुत्व सोडले असे वाटत असेल तर आम्ही काय करावे. असे म्हणत तुम्ही सगळे माझ्यासोबत समतोर येऊन बोलायला हवे, आम्ही तुम्हाला आपले मानले होते. चीन बॉर्डरवरील संरक्षण काढून घेत मुंबईत आणण्यात येईल, याच शिवसैनिकांना तुमचा गुलाल उधळला आहे. तुम्ही त्यांचा रक्त वाहणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. उद्या तुम्ही या आणि शपथविधी करून घ्या आमचे शिवसैनिकमध्ये येणार नाही. माझा माणूस माझया विरोधात उभ्या राहिल्याचा लाज वाटते आहे. बहुमताचा खेळ मला खेळाचा नाही. तुम्हाला मोठे केले हे माझे पाप आहे. माझ्या पापाची फळ मला भोगावी लागत आहेत, असे म्हणत बंडखोरांना इशारा दिला आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे.

उद्या एकाही शिवसैनिकांनी यांच्या अध्येमध्ये येऊ नका. कारण उद्या लोकशाहीचा नवा पाळणा हलतोय. मीही त्यांना सांगतोय, कुणीही तुमच्या मार्गात येणार नाही. या आणि घ्या शपथ. उद्या फ्लोअर टेस्ट आहे. कशालाही डोकी मोजत बसायची, डोक वापरण्यासाठी डोक्यांचा वापर व्हावा.

माझ्या विरोधात कोण आहे किती आहेत यात मला अजिबात रस नाही. मला खेळ खेळायचे नाहीत. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, ज्यांना शिवसेनेनं जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवण्याचं पुण्य त्यांनाच लाभू द्या. कारण मला पदाचा लालसा नव्हती.

न्यायालयाचा निर्णय मान्य करतो

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अनेक आव्हाने आली आपण ती पार केली, न्यायदेवतेचा आज निकाल आला. त्यांचा निकाल मान्य करायलाच हवा. त्यांनी सुद्धा तातडीने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालाचे आदेशाचे पालन करण्याचे सांगितले. राज्यपालाने लोकशाहीचा मान राखला. तातडीने चोवीस तासांच्या आत फ्लोअर टेस्ट करायला लावली. पण दिड पाऊने दोन वर्षे बारा आमदारांची यादी लटकवून ठेवली अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पुर्ण केले

मुख्यमंत्री जनतेला संबोधताना म्हणाले की, आता पुढची वाटचाल तुमच्या साथीने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाला निधी देत कामाची सुरुवात केली. माझे आयुष्य सार्थकी लागले आहे. कारण शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले आहे.

ज्यांचा विरोध होता त्यांनी साथ दिली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, उस्मानाबादचे नाव धाराशीव केले आहे. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार्यांचे आभार मानतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठरावाला विरोध दिला नाही. मात्र पवार गांधी यांनी मोठे सहकार्य केले. ज्यांचा विरोध त्यांनीच यासाठी साथ दिली असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.