गोंदिया,दि.1३~राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहत आहे़ पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही़ देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे़.आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते़.तेव्हा जनरल डायरने ते घडविले होते़.तर मध्यप्रदेशातील मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर गोळीबार करुन भाजप सरकारने देशात जनरल डायर अस्तित्वात असल्याचे सांगत देशाला संघाच्या सविंधानाची नव्हे तर डाॅ. बाबासाहेबांनी दिलेल्या सविंधानाची खरी गरज असल्याचे विचार जेएनयु माजी छात्रनेता मोहीत पांडे यांनी व्यक्त केले.
ते गोंदिया येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त पं.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने आज १३ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रंमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम होते.मंचावर जेएनयु विद्यार्थी नेता शेहला रशीद,यवतमाळचे रमेश जिवने,मिलिंद गणवीर,अनिल रामटेके,निलेश देशभ्रतार उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना मोहित पांडे म्हणाले की, ग्रामीण भागातील वंचित मुलांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी बाबासाहेबांनी जेएनयु सारख्या शैक्षणिक केंद्र असावे अशी त्यांची विचारधारा होते.पंरतु आज बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीलाच लगाम लावण्याचे काम सुरु झाले असून शिक्षणाची दारेच बंद करण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार करीत असल्याची टिका केली.जेएनयुमधील शिक्षणाच्या सुविधा बंद करुन गरीब सामान्य घरातील मुलांच्या उच्च शिक्षणाला लगाम लावण्याचे काम जोमात सुरु झाले आहे.तर दुसरीकडे मन की बात सांगून लोकांना दिशाभूल करणारे प्रधानसेवक मात्र त्यांच्या डोळ्यासमोर देशात होणार्या शेतकरी आत्महत्या विसरल्याचे म्हणाले.शैक्षणिक अत्याचारात रोहीतची हत्या करून आंतक निर्माण करण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारने केले आहे. अल्पसंख्याक,दलित व महिला हे एकत्र येऊ नये अशी विचारधारा असलेली संघटना नागपूरात आहे.ती म्हणजे आरएसएस होय.नाथुरामच्या समोरील राम हटवू शकले नाही पण बाबासाहेबांच्या नावात राम लावायला चालणारे हे लोक देशात शुद्र अतिशुद्राचे राजकारण करू लागले आहे.दंगा घडविणारे संभाजी भिडे सारखे मोकाट फिरत आहेत.आणि आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी समाजासाठी लढणारा भीम आर्मीचा प्रंमुख चंद्रशेखर कुठलाही गुन्हा नसताना तुरुगांत आहे.त्यामुळे आपला आवाज बुलंद करण्यासाठी मुक्या असलेल्या संसदेसमोर काही बोलून होणार नाही,तर त्यासाठी रस्त्यावर उतरुन लढाई लढावी लागणार असल्याचे पांडे म्हणाले.
याप्रसंगी बोलतांना मोहित पांडे म्हणाले की, ग्रामीण भागातील वंचित मुलांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी बाबासाहेबांनी जेएनयु सारख्या शैक्षणिक केंद्र असावे अशी त्यांची विचारधारा होते.पंरतु आज बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीलाच लगाम लावण्याचे काम सुरु झाले असून शिक्षणाची दारेच बंद करण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार करीत असल्याची टिका केली.जेएनयुमधील शिक्षणाच्या सुविधा बंद करुन गरीब सामान्य घरातील मुलांच्या उच्च शिक्षणाला लगाम लावण्याचे काम जोमात सुरु झाले आहे.तर दुसरीकडे मन की बात सांगून लोकांना दिशाभूल करणारे प्रधानसेवक मात्र त्यांच्या डोळ्यासमोर देशात होणार्या शेतकरी आत्महत्या विसरल्याचे म्हणाले.शैक्षणिक अत्याचारात रोहीतची हत्या करून आंतक निर्माण करण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारने केले आहे. अल्पसंख्याक,दलित व महिला हे एकत्र येऊ नये अशी विचारधारा असलेली संघटना नागपूरात आहे.ती म्हणजे आरएसएस होय.नाथुरामच्या समोरील राम हटवू शकले नाही पण बाबासाहेबांच्या नावात राम लावायला चालणारे हे लोक देशात शुद्र अतिशुद्राचे राजकारण करू लागले आहे.दंगा घडविणारे संभाजी भिडे सारखे मोकाट फिरत आहेत.आणि आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी समाजासाठी लढणारा भीम आर्मीचा प्रंमुख चंद्रशेखर कुठलाही गुन्हा नसताना तुरुगांत आहे.त्यामुळे आपला आवाज बुलंद करण्यासाठी मुक्या असलेल्या संसदेसमोर काही बोलून होणार नाही,तर त्यासाठी रस्त्यावर उतरुन लढाई लढावी लागणार असल्याचे पांडे म्हणाले.
देशात गेल्या ४ वर्षापासून नंगानाच सुरु आहे.ज्यांना आधीच प्रश्न तयार करून दिले जातात ते समाजाच्या हिताचे प्रश्न नरेंद्र मोदींना कसे विचारणार असे बोलत प्रसारमाध्यमावरही त्यांनी टिका केली.बहुजन समाजातील थोर महापुरुषांच्या मुर्तीपाडून विचारांना कुचलण्याचे प्रयत्न कितीही केले तरी विचार मरणार नाही.आंबेडकरविरोधी,दलित-बहुजन विरोधीना आम्ही कुठल्याही स्थितीत भाव देणार नसल्याचे विचार मोहित पांडे यांनी व्यक्त केले.यानंतर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस उपअधिक्षक रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. यशस्वीतेसाठी सयोंजक संजय भाष्कर,यशपाल डोंगरे,देवेंद्र रुसे,अमित भालेराव,दिपेंद्र वासनिक,निलेश देशभ्रतार,राहुल बनसोड,सुशील ठवरे,मिलींद गणवीर,सुर्यकांत डोंगरे,राजेश भोयर,बंसत गणवीर,लक्ष्मीकांत डहाट,दिपिका रुसे,लक्ष्मी राऊज,ज्योती डोंगरे,लक्ष्मीकांत डहाट,मामा बनसोड यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला मोठया संख्येने महिला पुरुष उपस्थित होते.
भाजपा सरकारवर