
आमगाव–आमगाव नगर परिषद स्थापनेपासून सहा वर्षे लोटून शासन प्रशासनाने नागरिक सुविधा विकासाकडे पाठ फिरवल्याने नागरिकांना विकासासाठी वंचित व्हावे लागले आहे. त्यामुळे नगरात नागरिकांना मुलभूत सुविधा उपब्ध करून देऊन आतातरी न्याय द्यावे अशी मागणीचे निवेदन प्रशासक मार्फत राज्य शासनाला आमगाव नगर परिषद संघर्ष समितीच्या वतीन देण्यात आला आहे.
शासनाने राज्यातील अनेक तालुका ठिकाण नगर पंचायत तर काही ठिकाणी नगर परिषद ची स्थापना करून विकासाला गती मिळवून दिली. यात आमगाव नगर परिषदेचाही समावेश आहे. तालुका स्थळांना नगर पंचायत व नगर परिषदेचा दर्जा मिळताच विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, आमगाव नगर परिषदेची स्थापना होवूनही तिढा सुटलेला नाही. त्यामुळे विकास खुंटला आहे. आमगाव नगर परिषदेत शासनाने आठ गावांना समायोजित करण्यात आले. परंतु, राजकारण्यांच्या श्रेय लाटण्याच्या नादात आमगाव नगर परिषदेला घेवून पेच निर्माण झाला. स्वार्थीपणामुळे काही व्यक्तींनी नगर परिषद नको म्हणून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे तर राज्य शासनाने विकासाच्या दृष्टीने नगर परिषद व्हावी, यासाठी न्यायालयात बाजू मांडली आहे. शासन व काही राजकारणी व्यक्तीमुळे सलग सहा वषार्पासून नगर परिषदेला घेवून तिढा निर्माण झाल्याने विकास कामांचे मार्ग बंद पडले आहे.
सामान्य माणसाला विकास योजना पासून वंचीत व्हावे लागले आहे, यात नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे हनन होत आहे. त्यांना शासन योजनांचे लाभ द्यावे यासाठी नागरिकांच्या पुढाकाराने संघर्ष समिती स्थापन करून आठ गावांमध्ये नागरिकांच्या पुढाकाराने हक्कासाठी संघर्ष पुकारला आहे. आमगाव नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना विकास कामे द्यावी, यासाठी शासनाने दखल घ्यावी म्हणून नगर परिषद संघर्ष समितीने प्रशासक मार्फत शासनाला निवेदन सादर केले आहे.
निवेदनात न्यायालयात दाखल याचिकेचा निर्णय तात्काळ घेण्यात यावे, घरकुल योजना, निवासी पट्टे, शौचालय योजना, राज्य रोजगार हमीचे कामे, वाढीव पाणी पुरवठा, रस्ते नाल्याची बांधकाम दुरुस्ती, नाग्रोथान, विशेष निधी, दलित वस्ती योजना, स्वच्छता याकरिता प्रस्ताव निधी व मंजुरी देण्यात यावी. त्याचप्रमाणे शासन योजनेतील मंजूर कामे तात्काळ कायार्रंभ आदेश देण्यात यावे, आठ कोटी मंजूर निधीचे कामे तात्काळ सुरू करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रशासक दयाराम भोयर यांना सादर करण्यात आले.
यावेळी संघर्ष समितीचे यशवंत मानकर, रवी क्षीरसागर, प्रा.सुभाष आकरे, उत्तम नंदेश्वर, संभूप्रसाद अग्रीका, अजय खेताण, राजकुमार फुंडे, राजकुमार श्यामकुवर, भोला गुप्ता, पिंटू अग्रवाल, कमलबापू बहेकार, गजानन भांडारकर, रमण डेकाटे, संतोष श्रीखंडे, प्रभादेवी उपराडे, डॉ.सुनंदा नागपुरे, जयश्री पुंडकर व नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.