
नागपूर,दि.29ः- राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रखडलेल्या परीक्षा, रखडलेल्या नियुक्त्या,मेगाभारती, पोलीस भरती,व सरळसेवा भरती लवकरात लवकर घेण्याच्या मागणीला घेऊन स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमेश कोरराम यांच्या नेतृत्वात आज मंगळवारला नागपूरच्या सविंधान चौकात आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.त्या निवेदनात MPSC राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या 6 असायला पाहिजे परंतु मागील 3 वर्षांपासून दोनच सदस्य MPSC चा डोलारा सांभाळत आहेत. येत्या 10 दिवसात संपुर्ण सदस्य भरले जावे. MPSC आणि महाआईटी च्या रखडलेल्या सर्व परीक्षा लवकर घ्याव्यात व अंतिम निकाल लावावे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या 3600 विद्यार्थ्यांच्या मुलाखती लवकरात लवकर घ्यावे.रखडलेल्या 413 अधिकाऱ्यांना नियुक्त्या द्यावे.राज्य सरकारच्या वर्ग 3 व 4 च्या सर्व परीक्षा खाजगी कंपनीकडून न घेता, MPSC मार्फतच घ्याव्यात.तसेच कंत्राटी पद्धत रद्द करून पूर्णवेळ नोकऱ्या द्यावे.मागील 3 वर्षांपासून पोलीस भरती झालीच नाही. येत्या 10 दिवसात पोलीस भरतीची अधिसूचना जारी करावी.येत्या 10 दिवसात सरळसेवा व मेगाभारती साठी अधिसूचना जारी करावी.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याचे दोन वर्षे फुकट गेले त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा संपू शकते त्यासाठी वयोमर्यादेत 2 वर्षाची वाढ करावी व लवकर यासंबंधीचा शासन आदेश काढावे.’महाआईटी’ या सरकारी कंपनी वर SIT लावावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावे या मागण्यासह इतर मागण्यांचा समावेश होता.सदर गण्या मान्य न झाल्यास येत्या 10 दिवसात महाराष्ट्रभर हजारो विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.आंदोलनात नितेश कराळे,मुकुंद अडेवार, दीनानाथ वाघमारे ,पंकज सावरबांधे, सुरज गाजजलवार ,बाबू राठोड, रणदिवे सर,रितेश बावनकर,वैभव बावनकर,प्रतीक बावनकर, आणि विद्यार्थी वर्ग या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.