अवैध दारू विक्री जोमात,तर पोलीस प्रशासन कोमात

0
86

गावक-यांचे आरोप, पोलीस प्रशासनाच्या सहयोगाने दारू विक्री करणा-या व्यवसायीकांना प्रोत्साहन

आसोली/गोंदिया- गेल्या अनेक दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये क्राइम ची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.क्राइम ची संख्या मध्ये इतके वाढ झाले आहे की,कोणीही कुणाचा मर्डर करीत आहेत.हे इतके सर्व फ़क्त नशापान करण्यामुळे इतके प्रसंग घडत आहेत.जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु आहेत.गोंदिया या जिल्ह्यामध्ये दररोज क्राइम ची संख्या वाढलेली आहे.वाद निर्माण झाला की कधीही जीवाची हानि होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. असे अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये घडत आहेत.तसेच अवैध व्यवसायीकांचे व्यवसाय जोमात चालित आहेत.ही माहिती आसोली येथील नागरिकांनी दिली आहे.तसेच या सोबत गावक-यांनी पोलीस प्रशासनावर आरोप लावले आहे की,पोलीस प्रशासनाच्या सहयोगाने दारु व्यवसाय विक्री करणा-या व्यवसायीकांना प्रोत्साहन मिळत आहे.एकीकड़े संपूर्ण जगामध्ये कोरोना या महामारी ने थैमान घातले असून यात अनेकांचे रोजगार,व्यवसाय गमावले आहेत.

लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून अवैध दारु व्यवसायी त्यांना आता रस्त्यावर आणल्या शिवाय राहणार नाही असे स्पष्ट होत आहे.आसोली येथील नागरिकांणी अनेकदा पोलीस प्रशासन यांना याची माहिती दिली असता त्यांनी आजपर्यंत कोणत्याही अवैध व्यवसायीवर कार्यवाही केली नाही आहे.त्यासाठी गावक-यांनी आरोप लावले आहे की,इतक्या तक्रार दिली असता आतापर्यंत पोलीस प्रशासनाणी चुप्पी का घेतली आहे.पोलीस प्रशासन का कार्यवाही करत नाही आहे.असे गावातील नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहे.खुल्यावर सरेआम दारु चे अवैध व्यवसाय सुरु आहेत.त्यामुळे गावामध्ये असंतोष ची भावना निर्माण झाली आहे.अवैध दारु विक्री करणे हे नियमात आहे का कारण त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येत नाही त्यासाठी त्यांनी प्रशासनवर आरोप लावले आहे.आसोली येथे अनेक दिवसापासून व्यवसाय चालत असून रस्त्यावर दारू पिउन लोक वाद करीत आहेत.गावातील लहान मुले तसेच तरुण युवामध्ये याचा गंभीर परिणाम होत आहे.त्यांचे भविष्य त्यामुळे पाण्यात उडी मारत आहेत.त्यांचे भविष्याचे काय होणार ? असे काही जागरुक नागरिकांणी वार्ताहार यांच्या समोर आपले शब्द व्यक्त केले आहे.

तरी या साठी गावक-यांनी मागणी केली आहे की अवैध व्यवसाय करणा-या सर्व व्यवसायीकांवर योग्य कार्यवाही करण्यात यांवी.जेणेकरून गावात संतोष कायम ठेवण्यात मदत होइल.गावात वाद-विवाद निर्माण होणार नाही.अशी मागणी गावातील नागरिकांणी केली आहे.