क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची 122 वी पुण्यतिथी घोट येथे साजरी
गडचिरोली:-दिं.9ः परकीय, राजकीय व्यवस्थेविरुद्ध आदिवासी समाजास संघटित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन पुकारून आदिवासी समाजासाठी लढा देणारे, क्रांतीसुर्य, जननायक, महानस्वातंत्र्य सेनानी, भगवान बिरसा मुंडा असल्याचे विचार खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केले.ते क्रांतीसुर्य शहीद क्रांतीवर बिरसा मुंडा यांच्या 122 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी बोलतांना खा.अशोक नेते यांनी प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांनी “जनजाती गौरव दिवस” जाहीर करून आदिवासींना न्याय दिला असेही म्हणाले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या पवित्र वचनाप्रमाणे आदिवासींना जीवनाची वाटचाल करावी. असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले.तसेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आदिवासी शहीदवीरांचे देशात 75 स्मारक व संग्रहालय होणार आहेत. 8 वर्षात आदिवासीच्या विकासासाठी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी बजेटच्याा माध्यमातून तीन लाख बेचाळिस हजार नववे ऐकोनचाळिस कोटी निधी दिला व भारतीय संविधान अनुच्छेदनुसार एक लाख दोनहजार कोटी रुपये आदिवासी विकासाकरिता दिला आहे.असे प्रतिपादन प्रकाशभाऊ गेडाम यांनी केले.
याप्रसंगी नामदेवराव सोनटक्के यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.यावेळी प्रकाश गेडाम प्रदेश महामंत्री भाजपा अनु.जनजाति मोर्चा,नामदेवराव सोनटक्के माजीजि.प.सदस्य,विलासजी उईके तालुकाध्यक्ष,आदिवासी आघाडी मोर्चा, स्वप्निलभाऊ वरघंटे भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य,.दिलीप चलाख तालुकाध्यक्ष,ऋषीजी कोडापे, रमेश कन्नाके,चंद्रकलाताई तसेच अनेक आदिवासी बांधव कार्यकर्ते उपस्थित होते.