
पोस्टरच्या माध्यमातुन एमबीबीएस व नर्सिंगच्या 40 विद्यार्थ्यानी केली जनजागृती
गोंदिया: नेत्रदानाबरोबरच इतर अवयवही दान करा आणि दुसऱ्यांना जीवनदान द्या असा संदेश देवुन जनमानसात आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
मानवी अवयव प्रत्यारोपण संदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्या वतीने जनजागृती केली जात आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत दि.10 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान अंगदान जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्याची माहीती अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांनी याप्रसंगी दिली आहे.सदर कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत विविध उपक्रम पोस्टर, रांगोळी, निबंध, कविता, पथनाट्य, प्रभातफेरी तुन अवयव दान विषयी जनजागृती करण्यात येणार असुन. प्रत्येक उपक्रमातील विजेत्या विविध स्पर्धेकांना गौरविण्यात येणार असल्याची माहीती दिली आहे.
दि.11 जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस व नर्सिंगच्या एकुण 40 विद्यार्थ्यानी पोस्टर स्पर्धेत भाग घेवुन अवयव दानाविषयी विविध पोष्टर बनविण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे व त्यांचे सोबत प्राध्यापक डॉ.अमित जोगदंडे,डॉ.पवन मेश्राम,डॉ.अभय अंबिलकर यांनी पोष्टर स्पर्धेचे पर्यवेक्षण केले.सदर उपक्रम यशस्वीतेसाठी डॉ.अंनत चांदेकर,डॉ.लक्षदीप पारेकर,डॉ.श्री राठोड,डॉ.अक्षय गव्हाणे,डॉ.राजेश कटरे,आकाश सुरोशे,रुत्वीक उन्हाले, सुशिल चौधरी, अनिकेत सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.
जन्माला आलेल्या मानवाला मृत्यू हा अटळ आहे.धकाधकीच्या युगात मानवाला विविध आजार जडत आहेत.शरीरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसऱ्या अवयवाशिवाय पर्याय नसतो.दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे.मृत्यूनंतर साधारणतः 48 तास मानवी अवयव जिवंत राहू शकतात.या 48 तासात नेत्र,मूत्रपिंड,यकृत,फुफुस व विविध अवयय मृतक मनुष्याच्या शरीरातून काढण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. हेच अवयव गरजू व्यक्तींना जीवनदायी ठरतात.मृत्यूनंतर ही शरीरातील अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात.याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जनजागृती केली जात आहे.तरी नागरिकांनी आपले शरिराचे विविध अवयव मातीमोल न करता दुसर्या मानवाला दान करुन मोलाचे कार्य करावे.
-डॉ.कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय