
हिवताप, डेंग्यु आजाराला लोकांनीच दिले निमत्रंण
किटकशास्त्रीय सर्वेक्षणामध्ये घरात, पाणीसाठे,कुंड्यांमध्ये आढळल्या डासांच्या अळ्या
गोंदिया,दि.२६ःजिल्ह्यातील जवळपास 1116 गावांपैकी 22 गावांतील लोकांनी किटकजन्य आजार हिवताप व डेग्यूचा धोका वाढविला आहे.कारण, या गावांमधील घरांमध्ये, पाणीसाठे,कुंड्यांमध्ये किटकजन्य आजार हिवताप,चिकुनगुनिया, डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. हिवताप,डेंग्यू, चिकुनगुनिया या रोगांबाबत केलेल्या किटकसर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात हिवताप,डेंग्यू, चिकुनगुनियाबाधित रुग्ण आढळल्यानंतर हिवताप विभाग आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका यांचे सह आरोग्य सहाय्यक यांचे मार्फत संबंधित परिसरात किटकशास्त्रीय सर्वेक्षणासह पाणीसाठ्यांची तपासणी केली जात आहे.यामध्ये डास अळी प्रतिबंधक टेमिफॉस औषध टाकले जात आहे.काही पाणीसाठे नष्ट केले आहेत. जिल्हा आरोग्य विभागामार्फत एक लाख 46 हजार 766 घरांचे सर्वेक्षण केले असुन 3 लाख 76 हजार 167 पाण्याचे साठे तपासले आहेत .त्यापैकी 4 हजार 195 पाणीसाठे दूषित आढळले आहेत.जिल्ह्यातील 22 गावांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या आहेत.ग्रामीण व शहरीभागासह जिल्ह्यात हिवताप व डेंग्यू रुग्ण जरी वाढत असले तरी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर काम करित आहे.खबरदारी म्हणून परिसरात किटकशास्त्रीय सर्वेक्षणासह पाणीसाठ्यांची तपासणी केली जात आहे.यामध्ये जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत 3 हजार ३८८ ठिकाणी गप्पी मासे सोड मोहिमे सोबत किटकनाशक फवारणी केल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली आहे. पावसाळा अद्यापही सुरु आहे.या कालावधीमध्येही किटकजन्य आजार हिवताप,डेंग्यूंच्या डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते.त्यासाठी घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.तसे झाल्यास किटकजन्य आजांरावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविला येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील सर्वेक्षणाची स्थिती
प्राथमिक आरोग्य केंद्र – 45
सर्वेक्षण केलेली घरे – 1 लाख 46 हजार 766
तपासलेले पाणीसाठे – 3 लाख 76 हजार 167
डास अळी दुषित घरे – 3 हजार 58
दूषित पाणीसाठे- 4 हजार 195
डेंग्यू, चिकुनगुनियाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून दूषित पाणीसाठे तसेच रक्त नमुन्यांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. डास अळ्यांच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठ्यांमध्ये टेमीफॉस औषध तर वाहती न करण्यात आलेल्या ठिकांणामध्ये गप्पी मासे टाकण्यात येत आहे.
डासांच्या आजारापासून असे राहा दूर
* आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा.
* घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा.
* पाण्याचे टँक तथा बैरेल स्वच्छ ठेवा, टँक उघडे ठेवू नका.
* सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात; खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
* झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका; त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा.
* घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे.
* घरासमोर झाडे लावल्यानंतर नागरिकांनी त्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये. डासांच्या बहुतेक अळ्या त्याच ठिकाणी आढळतात. आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत, परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी उघडे ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी केले आहे.
डासांची वाढ रोखणेसाठी खालील सोप्या उपाययोजना कराव्यात –
1) घरातील सर्व पाणी साठवलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत.
2) जे सिमेंटचे कंटेनर रिकामे करता येत नाहीत अशामध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या
अळीनाशकांचा वापर करावा.
3) गावांमध्ये आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा.
4) वेंट पाइपला जाळ्या बसवावेत.
5) गावातील निरुपद्रवी निरुपयोगी असणाऱ्या टायरचे एकत्रित संकलन करून त्याचा नायनाट
केल्यास 25 टक्के रुग्ण संख्येत घट होऊ शकते.
6) गटारी वाहती करावीत.
7) घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
8) रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा .
9) दिवसा पूर्ण अंग झाकले जाईल असे कपड्यांमध्ये राहावे.
10) संध्याकाळी घरामध्ये धूर करावा.
जनतेसाठी आवाहन –
- ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे.
- कोणताही ताप अंगावर काढू नये.
- या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.
- घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका.
- कोणत्याही परिस्थीतीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण करू नका.
-डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी