विकास कामात नागरिकांची भागीदारी वाढली-जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर

0
62
  • *राष्ट्रीय पंचायत राज दिवस उत्साहात*
    गोंदिया ता 25:- स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटी करण झाल्यामुळे विकास कामात नागरिकांची भागीदारी वाढली आणि ग्रामीण महिला भगिनींना न्याय मिळाला असा ठाम विश्वास गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी ( ता 24) व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या स्व वसंतराव नाईक सभागृहात आयोजित राष्ट्रीय पंचायत राज दिवस कार्यक्रमात श्री भेंडारकर अध्यक्ष पदावरून बोलत होते.मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम., उपाध्यक्ष सुरेश हर्षे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ तानाजी लोखंडे, अर्थ व बांधकाम सभापती डॉ लक्ष्मण भगत, समाजकल्याण सभापती रजनीताई कुंभरे, जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई कतलाम, हनुमंत वट्टी, डॉ भूमेश्वर पटले,उपस्थित होते. पुढे बोलताना श्री भेंडारकर म्हणाले की, सण 1992 ला 73 वी घटना दुरुस्ती होऊन 24 एप्रिल 1993 ला पंचायतराज संस्थांना संवैधानिक दर्जा मिळाला.त्यांनी ग्रामपंचायत डव्वा ला क्लायमेट ऍकशन स्पेसिअल अवार्ड हा भारतातून प्रथम पुरस्कार मिळाल्याने त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
    याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. म्हणाले की,पंचायतराज व्यवस्थेमुळे गाव पातळीवार लोकशाही नांदते. ग्रामीनाना अधिकार मिळाले असून त्यांची जबाबदारी वाढली ते आपल्या मतानुसार आपल्या गावाला पुढे नेऊ शकतात. राष्ट्रीय पंचायत राज दिवस हा आमचा स्वाभिमानाचा दिवस असून पंचायत राज व्यवस्थेमध्य महाराष्ट्र राज्य पुढे आहे असे ते म्हणाले. त्यांनी ग्रामपंचायत डव्वा ला शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी उपाध्यक्ष हर्षे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ लोखंडे यांनीही विचार मांडले.
    दरम्यान सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये आणि गटविकास अधिकारी रविकांत सानप यांचा डव्वा ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाल्या बद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा कार्यक्रम जिल्हा परिषद गोंदियाच्या पंचायत विभागाने आयोजित केला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक
    उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक यांनी केले तर संचालन करून ग्रामपंचायत अधिकारी पृथ्वीराज कोल्हटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
    कनिष्ठ प्रशासन अधिकारी गुणवंत ठाकूर, पंकज पटेल, दिलीप चौधरी, सुनील चव्हाण, कविता राठोड, ज्ञानेश्वर कानडे,श्याम समरीत, राजेश्वरी गौतम, नरेश लांजेवार, प्रकाश तिरेले, रोहित बन्सोड, जगमोहन दास, दिनेश काळसरपे, रुपलता डोंगरे यांनी अथक परिश्रम घेतले.