
“ द्या तंबाखू व ई-सिगारेटला नकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार“ तंबाखु शपथने जिल्हा
परिषद गुंजगुंजली
गोंदिया-३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तंबाखू या व्यसनाचा घातक परिणाम मानव शरीराच्या डोक्याचा केसांपासून ते पायापर्यंत सर्वच अवयवावर होतो.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा,फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयरोग,यकृताचा आजार,मोतीबिंदू,फुफ्फुसाचे विकार असे विविध आजार जडत असल्याची माहीती या दिनाच्या अनुशगांने जनमानसात तंबाखु बाबतची जाणीव होण्याच्या दृष्टिने दि. 31 मे रोजी जनजागृती करण्यात येत असल्याची माहीती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे यांनी याप्रसंगी दिली.
३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस निमीत्ताने स्व.वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात तंबाखू मुक्त दिनाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदियाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे होते.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे,जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ.कांतीलाल पटले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिलीप खोटेले,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल, जिल्हा आय.ई.सी.अधिकारी प्रशांत खरात यावेळी उपस्थित होते.
तंबाखू ही जीवघेणी आहे.त्यामुळे तंबाखूचा वापर करू नये.तंबाखू खाणाऱ्यांना दंडासह सहा महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे.तंबाखुमुक्तीची केवळ शपथ घेवूनच चालणार नाही, तर प्रत्यक्षात प्रत्येक व्यकतीने व्यक्तीश: पुढे येवुन ह्या व्यसनाला सोडण्यासाठी सहभागी होण्याची गरज असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांनी याप्रसंगी व्यकत केली.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब आहे.त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शालेय शिक्षक व पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.पालकांनी आपल्या मुलांसमोर स्वतः व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ज्येष्ठांचे अनुकरण लहान मुले करत असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी यांनी याप्रसंगी दिली.
तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, ह्रुदयरोग,मधुमेह, मुख कर्करोग यासारखे अनेक दुर्धर आजार होतात.जागतिक आरोग्य संघटनेच्या 2004 च्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी आठ ते नऊ लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे होतो हे प्रमाण कमी करणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी याप्रसंगी दिली.
देशात दोन प्रकारे तंबाखूचे सेवन करण्यात येते, धूरसहीत प्रकार ज्यामध्ये बिडी, सिगारेट, हुक्का अदी व दुसरा प्रकार धूररहीत ज्यामध्ये गुटखा, पान, नस तपकीर, खैनी आदी आहे. मित्रांची संगत व दबाव, चित्रपट किंवा इतर माध्यमातून करण्यात येणाऱ्या जाहिराती. तसेच तंबाखू उत्पादन कंपन्यांकडून विविध पद्धतीने करण्यात येणारे प्रसार, आनंद मिळविण्याच्या उद्देशाने, कंटाळा व कामाचा ताण कमी करण्यासाठी, मानसिक तणाव कमी करण्यासाठी ही व्यसनाची कारणे असू शकत असल्याची माहीती जिल्हा मौखिक तज्ञ डॉ. अनिल आटे यांनी याप्रसंगी दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी केले.तर डॉ. अनिल आटे यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली.यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाचे एकूण दीडशे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थ जसे जर्दा, खर्रा,बिडी, सिगारेट व हुक्का इत्यादी सेवन करण्याचे प्रमाण लोकांमध्ये वाढत चालेले आहे.त्यामुळे दिवसेंदिवस लोकांमध्ये उच्च रक्तदाब,मधुमेह,कर्करोग, ह्रुदयरोग,पक्षघात,अर्धांगवायू यासारखे आजार बळावु लागलेले आहे.डोक्यांच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तंबाखूचे दुष्परिणाम दिसून येतात.त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प जिल्ह्यातील सर्व संस्था, शाळा, शासकीय कार्यालय,ग्रामपंचायत यांनी तंबाखूमुक्त गाव,नगर व परिसर यांनी तंबाखु मुक्तीची संकल्प करुन चळवळ निर्माण करण्याची गरजेचे झाले आहे.प्रत्येक व्यक्तीने प्रथम स्व:तापासुन तंबाखुसारखे व्यसन सोडणे आवश्यक आहे.
– डॉ.तानाजी लोखंडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया