
या नेत्रदान दिनी निश्चय करु
गोंदिया,दि.१२- जागतिक दृष्टि दिनावर संबंध जगभरात दि.10 जून हा दिवस साजरा केला जातो. शासकीय सेवेत असून नेत्रसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून अनेक अंध व्यक्तींच्या जीवन प्रकाशमय करणारे उस्मानाबाद जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉक्टर भालचंद्र लक्ष्मणराव 10 जून 1924 रोजी उदयास आले व 10 जून 1979 रोजी दीपस्तंभाची जोत हृदयविकारासारख्या आजाराने मावळली.काळोखातून प्रकाशात अंधांना स्थलांतरित करणारे दृष्टिहीन व्यक्तीच्या अंधाकारमय आयुष्यात दृष्टीचा प्रकाश देणारे महान डॉक्टर भालचंद्र रामचंद्र लक्ष्मणराव यांचे स्मृती प्रित्यर्थ व जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो.
जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार,नेत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चंद्रकिशोर पारधी,नीतिका पोयाम, डॉ.बी.डी.जैस्वाल,प्रवीण धुवाधापारे यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.
अवयवदान,रक्तदान व नेत्रदान याचे विशेष महत्त्व वैज्ञानिक दृष्ट्या काळाची गरज आहे. महाराष्ट्रात सुमारे नऊ लाखापेक्षा जास्त गरजू अंध व्यक्ती आहेत ज्यांना नेत्रदानामुळे पुनर्दृष्टी प्राप्त होऊ शकते. ज्या अंध लोकांना बुडबडांच्या विकारांमध्ये अंधत्व आलेले आहे त्यांना नेत्रदानाचा फार मोठा उपयोग आहे. यालाच कॉर्नियल ब्लाइंड असे म्हणतात.नेत्रदानंतर केवळ डोळ्यांच्या बुडबुड्यांचे प्रत्यारोपण केले जाते. लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वच लोक नेत्रदान करू शकतात.ज्यांना चष्मा आहे मोतीबिंदू ऑपरेशन झालेले आहे असे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात. रेबीज,कावीळ,कॅन्सर,धनुर्वात किंवा एड्स या रोगामुळे झाला असेल तर ते व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.सध्या संकल्प पत्रावर सही करून जवळच्या नेत्रपेढीला देऊन नेत्रदानाचा संकल्प करू शकतो. नेत्रदान हे मृत्यूनंतर सहा तासाच्या हात करावे लागते.दान करू इच्छिणाऱ्या मृत व्यक्तीस दवाखान्यात नेण्याची गरज नाही मृत्यूनंतर जवळच्या नेत्र पिढीला फोन करणे.नाहीतर तज्ञ घरी येऊन मृत व्यक्तीच्या दोन्ही नेत्र पटल म्हणजे कॉर्निया काढून घेतात व मृतव्यक्तीच्या रक्ताचा नमुना पण घेऊन जातात नंतर ते दोन्ही नेत्र पटल दोन्ही वेगवेगळ्या कॉर्निया ब्लाइंड असलेल्या व्यक्तीच्या रोपण करतात.नेत्र दानाने आपला चेहरा विद्रूप होत नाही फक्त मृत व्यक्तीच्या खोलीतील पंखा बंद ठेवणे हे महत्त्वाचे आहे.
अंधत्व येण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मोतीबिंदू.मोतीबिंदूमुळे आलेले अंधत्व शंभर टक्के शस्त्रक्रियेने परत मिळवता येते.काचबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्व योग्य वेळी उपचार व शस्त्रक्रिया केल्यास पुढे होणारे दृष्टीचा अर्थनास टाळता येतो. परंतु काच बिंदूमुळे जेवढे दृष्टी कमी झाली ती वापस मिळवता येत नाही.चष्म्याचा दृष्टी दोष असल्यास योग्य नंबरचा चष्मा वापरून नजरेचा उपयोग घेता येतो. रेटिना किंवा मागच्या पडद्यावर बिघाड होऊ दृष्टीवर परिणाम झाल्यास विशेष नेत्रदानाच्या प्रयत्नाने योग्य वेळी उपचार करून अंधत्वास घालता येतो.परंतु बुडबुड्याच्या बिघाडामुळे अपारदर्शकामुळे असलेले अंधत्व दूर करण्यासाठी फक्त नेत्रदानाचे बुडबुडे रोपणाचे शक्य आहे म्हणून नेत्रदान हे श्रेष्ठदान ठरले आहे.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट साधून लोकांना नेत्राची काळजी कशी घ्यावी नाहीतर जनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध ठिकाणी शाळा, महाविद्यालय संस्थांमध्ये नेत्रदान जागृती बाबत कार्यक्रम घेणे.विविध ठिकाणी नेत्र तपासणी करून मोतीया बिंदुसारखे रुग्ण शोधून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.