
गोंदिया,दि.०७ः राज्यसरकारने लागू केलेला पहिलापासूनचा हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्याने मराठी भाषेचा विजय मनसेचा व शिवसेना (उबाठा)चा कार्यकर्त्यांनी मनोहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर एकत्र येत मिठाई वाटून आनंदोस्तव साजरा केला.इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले.
एकीकडे नुकतंच मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देण्यात आला, आणि त्या पाठोपाठ काही प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या हिंदी ची सक्ती करणे म्हणजे भाषेचे महत्व कमी करण्याच्या प्रयत्न सरकारचा चालला होता. याचा प्रखर विरोध करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, तसा पाठपुरावा सरकारकडे करण्यात आला.यावेळी मोर्चा काढण्याचे ठरविल्यानंतर अनेक राजकीय पक्ष संघटनांनी याला पाठिंबा देत मोर्चात सहभागी होण्याची तयारी दाखवली.सरकारने याच मोर्चाचा धसका घेत हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि शिवसेना उबाठा तर्फे मराठी जनतेचे अभिनंदन करण्यात आले. मराठीचा विजय झाल्याचा जल्लोष मनसे तर्फे मनोहर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, गोंदिया शहर अध्यक्ष सुरेश (नानु) चौधरी, शिवसेना(उबाठा) शहर प्रमुख राजेश कनोजिया, मनसेचे माजी शहर संघठक क्षितिज वैद्य, शहर उपाध्यक्ष सुमित कावळे, शहर उपाध्यक्ष डिलेश उईके, शहर सचिव माधव बनकर, शाखा अध्यक्ष कार्तिक राऊत, विशाल ढेबे व तसेच शिवसेनेचे युवासेना उपजिल्हाधिकारी विक्की बोमचरे, शहराधिकारी शुभम सहारे, संघटक मुकेश दहीकर, अशोक लंजे, संतोष सहारे प्रामुख्याने मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.