प्राथमिक आरोग्य केंद्र अनुक्रमे कोरंभीटोला,चोपा व बिजेपार
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अनुक्रमे जमाकुडो,लाखेगाव व हिरडामाली
आमगाव ग्रामीण रुग्णालय प्रथम
गोंदिया,दि.22: महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने माता व बालकांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट काम करणाèया संस्था व व्यक्तिकरिता डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजना २०१७-१८ या वर्षाकरिता आयोजित करण्यात आली होती. या योजनेत जिलह्यातील तिरोडा उपजिल्हा रुग्णालय व आमगाव ग्रामीण रुग्णालयासह एकोडी, इंदोरा बुज., चोपा, पांढरी, कोरंभीटोला, मुल्ला व बिजेपार हे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आसोली, लाखेगाव, हिरडामाली, परसोडी, निमगाव, सेरपार व जमाकुडो या उपकेंद्रांनी सहभाग नोंदविला होता.
त्यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्रांला प्रथम क्रमांक तर गोरेगाव तालुक्यातील आरोग्य केंद्र चोपा द्वितीय व सालेकसा तालुक्यातील बिजेपार केंद्राला तृतीय क्रमांक मिळाला.त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्रथम क्रमांक सालेकसा तालुक्यातील जमाकुडो,द्वितीय क्रमांक तिरोडा तालुक्यातील लाखेगाव व तृतीय क्रमांक गोरेगाव तालुक्यातील हिरडामालीला देण्यात आले.तर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय गटामध्ये आमगाव ग्रामीण रुग्णालयाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक देण्यात आले आहे.
सोबतच आरोग्य संस्थांनी या सर्व कामाची नोंद असलेले रजिस्टरची पाहणी केली. रुग्णालयमधील जैविक कचèयाची विल्हेवाट व रुग्णवाहिकेची स्थिती, रात्रीच्यावेळी रुग्णांना देण्यात येणाèया सेवांसह औषध प्रयोगशाळा, आरोग्य शिबिर आणि आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणात नागरिकांचा सहभाग कसा होता. या सर्व गोष्टीची पाहणी समितीने केली. त्यानंतर पहिल्या तीन आरोग्य केंद्र व उपकेंद्राची गुणानुक्रमे निवड केली.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्र हे शेवटच्या टोकावर असलेले आणि आरोग्य केंद्रातील लगतच्या सहा गावात कुठलेचे खासगी डॉक्टर नसल्याने परिसरातील जनतेचा या आरोग्य केंद्रावरच विश्वास दिसून आला.
त्याचप्रमाणे देवरी तालुक्यातील जमाकुडो प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे पूर्णत: आदिवासी भागातील जनतेसाठी असून बारा टोल्यांची ४ हजार ४२ लोकसंख्या या आरोग्य उपकेंद्रांतर्गत येत आहे. हे आरोग्य उपकेंद्र आदिवासी भागातील जनतेला उपचारासाठी महत्वाचे ठरले असून रात्री-बेरात्रीला मिळत असलेल्या सेवेमुळे हिवतापासारख्या रोगावरही नियंत्रण आणण्यात यश आले आहे.