39.6 C
Gondiā
Sunday, May 11, 2025
Home Blog

चंद्रपूरात वैनगंगा नदीत ३ भावी डॉक्टर बुडाले;मित्रांसोबत सुट्टी घालवणे पडले महागात;शोध सुरू

0

चंद्रपूर;-चंद्रपूर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या मित्रांसोबत वैनगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी आलेले एमबीबीएसचे तीन विद्यार्थी पाण्यात बुडाले आहेत.यात गोपाळ गणेश साखरे(रा.चिखली,जि.बुलढाणा),पार्थ बाळासाहेब जाधव(शिर्डी,जि.अहिल्यानगर) व स्वप्नील उध्दवसिंग शिरे(जि.छत्रपतीसंंभाजीनगर)यांचा समावेश आहे. या घटनेबद्दल कळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला. हे विद्यार्थी गडचिरोली येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होते. पोहण्यासाठी आलेल्या या तिघांवर काळाने घाला घातला असल्याचे बोल उमटत आहेत.

मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील व्याहाड खुर्द येथील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गडचिरोली येथील ८ एमबीबीएसचे विद्यार्थी गेले होते,त्यापैकी ३ विद्यार्थीना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि पोलिसांसह नागरिकही घटनास्थळी दाखल झाले. सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचलेले असून पाण्यात बुडालेल्या तिघांचा शोध हा घेतला जातोय. आज शनिवारची सुट्टी असल्याने आठ मित्र वैनगंगा नदीत पोहण्यासाठी आले होते.

मात्र, यादरम्यान तिघेजण पाण्यात अचानक बुडाले. दरम्यान पाच जणांना पाण्यातून बाहेर पडण्यास यश मिळाले. मात्र, तिघेजण बुडाले. अनेक प्रयत्न करूनही तिघेही शोधकार्यदरम्यान सापडले नाही. शेवटी रात्र झाल्याने ही शोधमोहिम प्रशासनाकडून थांबवण्यात आली.आज परत शोधमोहिम ही सुरू केली गेली आहे. या घटनेने तिघांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

निवृत्तीच्या ३ महिने आधीच पाकिस्तानशी लढताना वीरमरण;सुभेदार मेजर शहीद,दोन मुलं पोरकी

0

नवी दिल्ली:-भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या ३ दिवसांपासून दोन्ही देशांकडून हल्ले सुरु आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर आणि एअर स्ट्राइक केल्याने पाकिस्तान बिथरला आहे.दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये मिसाईल आणि ड्रोनसहित ‘एलओसी’वरून गोळीबार होत आहे. पाकिस्तानने केलेल्या या गोळीबारात राजौरी भागात तैनात असलेले सुभेदार मेजर पवन कुमार शहीद झाले. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सकाळी राजौरीमध्ये गोळीबार केला. या गोळीबारानंतर सुभेदार मेजर आणि त्यांच्या टीमने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

पाकिस्तानच्या गोळीबारात सुभेदार मेजर जखमी झाले. गोळीबारात जखमी झालेल्या सुभेदार मेजर पवन कुमार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, पवन कुमार यांनी रुग्णालयात उपचारादम्यान जीव सोडला. सुभेदार मेजर पवन कुमार यांच्या मृत्यूची वार्ता त्यांना कुटुंबीयांना देण्यात आली आहे. डीसी कांगडा हेमराज बैरवा यांनी स्वत: सुभेदार मेजर यांच्या घरी जाऊन वार्ता कळवली. सुभेदार मेजर पवन कुमार यांचं पार्थिव यांच्या गावी आज पोहोचणार आहे.

वडील सैन्यात होते हवालदार

कांगडा जिल्ह्यातील शाहपूर नगर पंचायतच्या वार्ड नंबर ४ च्या नगरसेवक शुभम यांनी सांगितलं की, ‘४९ वर्षीय पवन कुमार यांच्या शहीद होण्याची वार्ता कळाली. पवन कुमार हे २५ पंजाब रेजिमेंट होते. ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्याआधी देशासाठी शहीद झाले. पवन कुमार यांच्या पश्चात कुटुंबात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. पवन यांचे वडील गरज सिंह सैन्य दलात हवालदार होते.

पवन कुमार यांच्या शहीद होण्याची वार्ता कळताच त्यांच्या घरी शोककळा पसरली. त्यांच्या शहीद होण्याची वार्ता कळताच त्यांच्या घरी लोकांची येजा सुरु झाली आहे.पवन कुमार यांच्या शहीद होण्याच्या बातमीने त्यांच्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पवन कुमार यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झालं आहे. पवन कुमार यांच्या आईचं नाव किशो देवी आहे. तर २३ वर्षीय मुलाचं नाव अभिषेक आहे. तर मुलीचं नाव अनामिका आहे.

अवघ्या चार दिवसांत शहबाज शरीफ यांनी गुडघे टेकले

0

नवी दिल्ली:- पाकिस्तान काही केला सुधारणारा देश नाही हे पुन्हा एकदा त्यानं स्वता: सिद्ध करून दाखवलं आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्ताननं युद्धबंदीचे उल्लंघन केले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने विक्रम मिस्री यांनी पत्रकर परिषद घेत लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले. त्यामुळे शस्त्रसंधी उल्लंघनानंतर हालचालींना वेग आला आहे आणि आता भारत मोठा निर्णय घेईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तान सैन्याने पंतप्रधानांच्या विरोधात बंड केलं असल्याचेही बोलले जात आहे. मात्र पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेला फोन करून भारतासोबत युद्धबंदीची मागणी केली. तथापि, युद्धबंदीच्या काही तासांनंतरच पाकिस्तानी सैन्याने पुन्हा त्याचे उल्लंघन केलं हे ही तितकेच खरं आहे. या मुद्द्यावर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानला या उल्लंघनांना तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे, परिस्थितीला गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळण्याचे आवाहन केले. किंबहुना 4 दिवसांनी का होईना, युद्धबंदीची घोषणा करण्यापूर्वीच भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते.

गेल्या 4 दिवसांत भारतीय हवाई दलाने लाहोरमध्ये असलेली पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. याशिवाय, त्यांच्या तीन हवाई तळांवर हल्ला करून त्यांचे मनोबल खचले. त्यांची रडार यंत्रणा ही नष्ट झाली आहे. हे घडताना पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माफी मागण्यास सुरुवात केली आणि युद्धबंदीचे आवाहन केलंय. भारताने लक्ष्य केलेल्या चार पाकिस्तानी एअरबेसमध्ये मुरीद चकवाल एअरबेस, नूर खान एअरबेस (रावळपिंडी), रहीम यार खान एअरबेस आणि रफीकी एअरबेस (शोरकोट, पंजाब) यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानचे हवाई हल्ले निष्फळ केले, ज्यामुळे पाकिस्तान खूप घाबरला.

भारत-पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टद्वारे केली होती. त्यांनी लिहिले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. किंबहुना, भारताने युद्धबंदीसाठी स्वतःच्या अटी देखील ठेवल्या, ज्या अमेरिकेने मान्य केल्या. दरम्यान, यापूर्वी भारताने स्पष्टपणे सांगितले होते की जर सीमेवर कोणताही हल्ला झाला तर तो युद्धाचा गुन्हा मानला जाईल. भारताचा हल्ला पाहून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेला फोन करून युद्धबंदीची मागणी केली, त्यानंतर मार्को रोबियो यांनी भारताला फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली आणि युद्धबंदीवर संमती मागितली.

अवकाळीचे सावट कायम;पुढचे ५ दिवस महत्वाचे;वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार

0

मुंबई:-गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. राज्यावर अवकाळीचे सावट कायम आहे. पुन्हा राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पाऊस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे. याठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात वादळी पावसाचे वातावरण कायम आहे. गेल्या ३ दिवसांपासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा चटकाही कमी झालेला दिसत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. ३ दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील काही उन्हाळी पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले आहे. पुढील ४ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील ४ दिवस काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीत ९७ लाखांहून अधिक रकमेची वसुली; १०० प्रलंबित आणि २२ दाखलपूर्व खटले निकाली

0
गडचिरोली दि.११ – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या आदेशानुसार व मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा व तालुका न्यायालयांत १० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत एकूण १० पॅनलच्या माध्यमातून प्रलंबित व दाखलपूर्व अशा एकूण १२२ प्रकरणांमध्ये तडजोड साधण्यात आली. या लोकअदालतीत एकूण ९७ लाख ५२ हजार ४९१ रुपये रकमेची वसुली करण्यात आली.
फौजदारी तडजोड प्रकरणे, धनादेश कायद्याखालील कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार अपघात दावा, कर्जवसुली, वीजबिल थकबाकी, ग्रामपंचायतींची घरपट्टी-पाणीपट्टी, ग्राहक न्यायालयातील तक्रारी आणि वाहन चालान अशा विविध स्वरूपातील प्रकरणांचा यात समावेश होता. किरकोळ गुन्ह्यांपैकी ५४ प्रकरणे गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्यात आली.
पॅनल क्रमांक २ मध्ये एक वैवाहिक प्रकरण आपसी समझोत्याने निकाली निघाले. पती-पत्नी एकत्र नांदायला तयार झाल्याने त्यांचा साडी-चोळी व शेला देऊन सत्कार करण्यात आला.
या लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी व सचिव न्या.आर. आर. पाटील यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. पॅनल क्रमांक १ चे कामकाज पी. आर. सित्रे यांनी, पॅनल क्रमांक २ चे एस. पी. सदाफळे यांनी आणि पॅनल क्रमांक ३ चे एस. बी. विजयकर यांनी पाहिले. किरकोळ गुन्ह्यांची सुनावणी व्ही. आर. मालोदे यांच्या न्यायालयात पार पडली.
पॅनल सदस्य म्हणून मनोहर हेपट, देवाजी बावने आणि अर्चना चुधरी यांनी सहभाग घेतला. गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष किशोर आखाडे, ज्येष्ठ अधिवक्ते, संपूर्ण अधिवक्ता वर्ग, न्यायालयीन कर्मचारी आणि विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी यांनी या लोकअदालतीसाठी महत्त्वाचे योगदान दिले.

मोहाडी ते चोपा रस्ता अर्धवट सोडून ठेकेदार पसार

0

गोरेगाव-. तालुक्यातील मोहाडी ते चोपा या तीन किमी रस्त्यावरून वाहनधारकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. रस्त्याचे अर्धवट काम करून सदर कंत्राटदाराने कामाकडे मागील दीड महिन्यांपासून पाठ फिरवून पसार झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणखी किती दिवस रस्त्याअभावी हाल सहन करावेत, हा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे.
मोहाडी ते चोपा नव्हे तर, गोरेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच भयावह होत चालली आहे. परंतु, ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी
मूग गिळून गप्प आहेत. परिणामी, परिसरातील मोहाडीपासून चोपापर्यंत गाव-खेड्यातील नागरिक, वाहनधारक, विद्यार्थी वर्गाला अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्याचा, रस्त्यावरील खड्डे, तसेच चढ उताराच्या रस्त्याचा नाहक त्रास सहन
करावा लागत आहे. परिसरातील मोहाडी ते चोपासह, मोहाडी, आकोटोला, कनारटोला, चोपा अर्धवट बांधकाम झालेल्या रस्त्यावरील पडलेल्या भेदक खड्यांमुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. मागील दीड महिन्यांपासून अर्धवट रस्त्याचे बांधकाम व गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे हे जशास तसे आहेत.
याकडे ना ठेकेदारांचे लक्ष आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुठल्या अधिकाऱ्याचे. याबाबत मागील एक महिन्यापासून मोहाडी ग्रामपंचायत सरपंचासह अनेक नागरिकांनी संबंधित
विभागाला वारंवार तक्रारी केल्या. थेट तालुक्याला जाणाऱ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यात गिट्टी, खड्डे, मुरुम, रस्त्याचा चढ-उतार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वाहनांचे वेळेपूर्वीच देखभाल दुरुस्तीचे काम करावे लागते. पर्यायी शारिरीक आरोग्यासोबतच अर्थिक तसेच मानसिकही नुकसान सहन करावे लागत आहे. अर्धवट रस्त्याचे त्वरीत काम पूर्ण करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्यासह ग्रामीण भागातील

65 लाखांचा मुद्देमाल चोरणारा अखेर अटकेत

0

गोंदिया- गोंदियातील एका मोठ्या व्यावसायिकाकडे असलेले 65 लाख रुपयांचे दागिने आणि इतर मुद्देमाल शिवनाथ एक्सप्रेसमधून महिनाभरापूर्वी चोरीला गेला होता. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी छडा लावत ओरिसा राज्यातून चोरट्यांना ताब्यात घेतले. संतोष साहू ऊर्फ आफ्रिदी (34, रा. राधिका गली राऊरकेला), अब्दुल मन्नान (55, रा. राऊरकेला) अशी चोरट्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दिनेश पटेल यांच्या पत्नी हिना पटेल (54, रा. गोंदिया) या 4 एप्रिल 2025 रोजी पतीसोबत गोंदियाहून रायपूरला शिवनाथ एक्सप्रेसमधून प्रवास करीत होत्या. राजनांदगाव आणि दुर्ग रेल्वे स्थानका दरम्यानच्या प्रवासादरम्यान, महिलेचा पर्स चोरीला गेला होता. त्यात दोन हिऱ्यांचे हार, चार हिऱ्याच्या अंगठ्या, एक कानातले दागिने आणि 45 हजार रोख रक्कम होती. तसेच एक मोबाईल देखील चोरीला गेला होता. या प्रकरणाची तक्रार रेल्वे पोलिसांत करण्यात आली होती. रेल्वेच्या पोलिस अधीक्षक श्वेता श्रीवास्तव सिन्हा यांनी रेल्वेचे पोलिस उपअधीक्षक एस.एन. अख्तर आणि सायबर सेलचे प्रभारी, जीआरपी भिलाई पोलिस स्टेशनचे प्रभारी यांना आरोपींना अटक करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या होत्या.

खासदार प्रफुल पटेल उद्या गोंदियाच्या दौऱ्यावर

0

गोंदिया,दि.१०ः राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल पटेल दिनांक ११ में २०२५ ला गोंदियाच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी ११.०० वाजता, बगीचा रामनगर, निवास स्थान गोंदिया येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता सोबत भेट व चर्चा, दुपारी १२.३० वाजता श्री बाळकृष्ण पटले यांचे निवास स्थान कुडवा येथे सांत्वना भेट, दुपारी १.०० वाजता जिंजर हॉटेल येथे सर्जन असोसिएशन कार्यक्रम मध्ये उपस्थिती, सायंकाळी ६.०० वाजता कॅनेरा बँक जवळ श्री महेश गोयल यांचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तरी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने केले आहे.

खासदार डाॅ.पडोळेनी युध्द परिस्थिती बघत राष्ट्रसेवेकरीता दिले एक महिन्याचे वेतन

0

गोंदिया,दि.१०ःसध्या भारत व पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युध्द परिस्थितीला बघून आपण व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्राशी संबधित असल्याने या काळात देशाच्या सिमेवर सैनदलाच्या आरोग्य शिबिरात सेवा देण्याची आपली ईच्छा असून या काळातील स्थिती बघता आपण आपले एक महिन्याचे खासदारकीचे वेतन राष्ट्रसेवेकरीता देत असल्याचे पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार डाॅ.प्रशांत यादवराव पडोळे यांनी आज(दि.१०)दिले आहे.सोबतच देशातील सर्व खासदार,लोकप्रतिनिधी यांना सुध्दा भारत पाकिस्तान युध्द वातावरणाच्या स्थितीत आपले एक महिन्याचे वेतन राष्ट्रसेवेकरीता सैनबलाचे मनोबल वाढविण्याकरीता द्यावे असे खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांनी म्हटले आहे.

बिरसी विमानतळ पुनर्वसनासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करा : आमदार विनोद अग्रवाल

0

गोंदिया,दि.१०ः पुनर्वसन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या समस्या व त्यांच्या उपाययोजना यांना प्राधान्य देत आमदार विनोद अग्रवाल यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे बैठक घेत मुंबई मंत्रालयात सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना पूर्वी प्रस्तावित पाच लाख रुपयांच्या ऐवजी आता दहा लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत परसवाडा–कामठा रस्ता त्याचप्रमाणे, भविष्यात प्रकल्पामुळे बाधित होऊ शकणाऱ्या रावणवाडी–कामठा रस्त्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याबाबतही चर्चा झाली.
या प्रकल्पामुळे भविष्यात पुनर्वसित होणाऱ्या कुटुंबांसाठी पूर्वीच जागा निश्चित करणे व त्यांना वेळेवर आणि योग्य भरपाई देण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले.पुनर्वसित क्षेत्रांमध्ये पक्के रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज, समाजमंदिर, शाळा इत्यादी मूलभूत सुविधा तातडीने निर्माण करण्याचे  निर्देश आमदार अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बिरसी व कामठा या भागातील असे सर्व मार्ग जे विमानतळाला थेट गावांशी जोडू शकतात, त्यांची ओळख करून त्यांचा विकास करण्याला प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाली. यामुळे ना केवळ प्रवास सोपा होईल, तर आर्थिक घडामोडींनाही चालना मिळेल. सर्व प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत आमदार विनोद अग्रवाल, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, बिरसी विमानतळाचे संचालक गिरीश वर्मा, तहसीलदार शमशेर पठाण, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, पंचायत समिती सभापती मुनेश राहंगडाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लभाने, बिरसीचे सरपंच उमेश पंडेले, शाखा अभियंता कट्यारमल, खातियाचे सरपंच ललित तावडे व तलाठी उपस्थित होते.