30.9 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 12

छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास डोळे दिपवणाऱ्या संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

0
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात
प्रधानमंत्री यांच्या हस्ते होईल उद्घाटन
नवी दिल्ली, दि.7: छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास डोळे दिपवणाऱ्या संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर उभा करण्यात येत आहे. या संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून या संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती समितीचे महासचिव कर्नल मोहन काक्तीकर (सेवानिवृत्त), मिलिंद पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गार्डियन मीडिया आणि इंटरटेनमेंट चे संचालक संजय दाबके हे ही उपस्थित होते. श्री दाबके यांच्या माध्यमातून अत्याधुनिक अद्यावत असे संग्रहालय मूर्त रूपात उभे राहत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समिती ही दिल्लीतील इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह या ठिकाणी आहे. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या ठिकाणी जागतिक दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक संग्रहालय राजधानी दिल्लीत असावे असा मानस समितीचा होता. त्याप्रमाणे वर्ष 2020 पासून यावर काम सुरू आहे. अशी माहिती, श्री काक्तीकर यांनी यावेळी दिली.
उत्तर भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संग्रहालय उभारण्यात येत असल्याची माहिती श्री काक्तीकर यांनी यावेळी दिली.
हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने तयार करण्यात आलेले आहे. पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यात हे संग्रहालय असणार आहे.
या संग्रहालयातील वस्तू या ऐतिहासिक दस्ताऐवजांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या आहेत. संग्राहालय पाहताना महाराजाच्या काळात आपण आहोत असा आभास निर्माण करण्यात आलेला आहे. संग्रहालयातील काही भागांमध्ये 13 डी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहे.
यासह डार्क राईडच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना पाहता येईल. हे देशातील एक अभूतपूर्व असे संग्रहालय असणार आहे.
0000

भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’, ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक…पाकला घरात घुसून ठोकले

0

नवी दिल्ली: भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करताना मंगळवारी रात्री दीड वाजता ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. तीनही सैन्य दलांचे हे एकत्रित ऑपरेशन होते. भारताच्या पराक्रमी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमधील ५ ठिकाणांना लक्ष्य केले होते.

भारताच्या स्ट्र्राईकनंतर पाकिस्तानचे उत्तर

भारताच्या एअरस्ट्राईकवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे विधान समोर आले आहे. शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की पाकिस्तानच्या जमिनीवर पाच ठिकाणी हल्ले करण्यात आले. पंतप्रधान शरीफ म्हणाले, पाकिस्तानला या कृत्याचे शक्तीशाली उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि याचे उत्तर दिले जात आहे .

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव सुरू झाला होता. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निर्दोष लोकांचा बळी गेला होता. यानंतर भारताने सिंधु जल संधीला स्थगिती दिली होती. पाकिस्तानचे पाणी भारताने रोखले होते. तसेच अनेक वेळ भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी पहलगाम हल्ल्याला उत्तर दिले जाईल अशी शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कारवाईसाठी लष्कराला फ्री हँड दिला होता.

भारताच्या गुप्तचर विभागाने सर्व टार्गेटची ओळख केली होती. यानंतर संपूर्ण प्लानिंगसह लष्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि आंतरराष्टीय सीमेपासून किती दूर आहेत ही ठिकाणे…

बहावलपूर – आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी दूर स्थित आहे. येथे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते. हा तळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केला आहे.

मुरीदके – हे दहशतवादी ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमेपासून ३० किमी अंतरावर आहे. येथे लष्कर ए तौयबाचे शिबीर होते. याचा संबंध २६/११ मुंबई हल्ल्याशी होता

गुलपूर – हे दहशतवादी ठिकाण locपासून ३५ किमी अंतरावर आहे.

लष्कर कँप सवाई – हे दहशतवादी ठिकाणी पीओके तंगधार सेक्टरच्या आत ३० किमी आहे.

बिलाल कँप – जैश ए मोहम्मदचे लाँच पॅड. हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमापार पाठवण्यासाठी वापरले जात होते.

कोटली – एलओसीपासून १५ किमी दूर स्थित लष्कराचे हे शिवीर. या ठिकाणी ५० हून अधिक दहशतवाद्यांची क्षमता होती.

लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकार काढणार दरमहा ३००० कोटींचे कर्ज!

0

१.३२ लाख कोटींच्या कर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव!

मुंबई:-राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या (जीएसडीपी) तीन टक्के कर्ज राज्य सरकारला घेता येते. त्यानुसार कर्ज नेमके कशासाठी पाहिजे, या बाबींची जुळवाजुळव करून राज्य सरकाने कर्ज घेण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक कामकाज विभागाकडे (डिपार्टमेंट ऑफ एक्सटर्नल अफेयर्स) प्रस्ताव पाठविला आहे.

त्यात राज्यातील सिंचन योजना, उत्तन ते विरार कोस्टल रोड अशा बाबींचा समावेश आहे. केंद्राकडून मेअखेर त्यास परवानगी मिळेल. त्यानंतर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून कोणत्या महिन्यात किंवा आठवड्याला सरकार किती कर्ज घेणार, याचे वार्षिक कॅलेंडर निश्चित होईल. त्यानुसार राज्य सरकार कर्ज घेऊन वैयक्तिक योजनांचा खर्च भागविणार असून अन्य रक्कम महत्त्वपूर्ण योजनांसाठी विशेषत: सिंचन योजनांसाठी दिली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कोरोनानंतर राज्य सरकारने चार लाख १३ हजार १५६ कोटींचे कर्ज घेतल्याची नोंद सरकारच्या अर्थसंकल्पात आहे. २०१५-१६ ते २०२५-२६ या दहा वर्षांत सरकारच्या डोक्यावर सहा लाख कोटींचे कर्ज वाढले आहे. त्यापोटी सरकारला दरमहा ६१ हजार कोटींपर्यंत व्याज द्यावे लागत असल्याचीही नोंद अर्थसंकल्पाच्या पिंक बूकमध्ये आहे.

शासनाच्या सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना लाभ वितरीत करण्यात आला. त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्यानंतर आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर २०२५-२६ या आर्थिक वर्षात एक लाख ३२ हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. त्यातील साधारणत: तीन हजार कोटी रुपये दरमहा लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनिय सूत्रांनी दिली.

एकूण कर्जाची सद्य:स्थिती

⭕⭕वर्ष – एकूण कर्ज

२०२३-२४ – ७,१८,५०७ कोटी

२०२४-२५. – ८,३९,२७५ कोटी

२०२५-२६ – ९,३२,२४२ कोटी

(स्थानिक निवडणुकांमुळे दरमहा मिळणार लाभ)

दिशा समितीच्या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सर्वंकष आढावा

0
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
· खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सूचना
·
लातूर, दि. ०६: केंद्र शासनाच्या निधीतून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शैक्षणिक, कृषी विषयक व दळणवळण यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना खासदार डॉ. शिवाजी काळगे व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक खासदार डॉ. काळगे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार श्री. राजेनिंबाळकर सहअध्यक्षतेखाली झाली. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव, समितीच्या अशासकीय सदस्य जयश्री उटगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात आयुष हॉस्पिटल सुरु करण्यासाठी, तसेच आणखी एक केंद्रीय विद्यालय सुरु करण्याबाबत दिशा समितीच्या शिफारसीसह विहित मार्गाने प्रस्ताव सादर करावा. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण, मध्यान्ह भोजन उपलब्ध होण्यासाठी वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, असे खासदार डॉ. काळगे म्हणाले. तसेच जिल्ह्यात केंद्रीय निधीतून सुरु असलेल्या सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होतील, याची खबरदारी घ्यावी. सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना द्यावा, सिंचन सुविधांचे बळकटकरण करावे, असे त्यांनी सांगितले.
लातूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत २.० अभियानातून करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करावे. तसेच भूमिगत गटार योजनेचे काम दर्जेदार होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे खासदार डॉ. काळगे म्हणाले.
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध होतील, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. तसेच बियाणे खरेदी करताना कोणकोणत्या बाबी तपासाव्यात, काय काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. फळबाग लागवड हा शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारा पर्याय आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करावेत. गावोगावी होणाऱ्या शेती शाळांमध्ये याबाबत माहिती द्यावी, असे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेची शाळा ही ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा स्त्रोत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेत चमकत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगल्या शैक्षणिक सुविधा, गणवेश, मध्यान्ह भोजन उपलब्ध करून द्यावे. हे काम स्थानिक स्तरावर महिला बचतगटांच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री. राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
गतवर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपनीकडून विमा दावे मंजूर करताना दुजाभाव करण्यात आला आहे. याबाबत अनेक तक्रारी असून या तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर केला जावा. जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करून ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्या. शासनाच्या निधीचा योग्य वापर होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे, असे त्यांनी सांगितले.
लातूर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने नुकतीच धरण ते जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली आहे. त्यानुसार आवश्यक बाबींवर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन केली आहे. तसेच जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या.
प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. शोषखड्डा भरा अभियानाच्या माहिती पुस्तिकेचे यावेळी उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ अभियानाचा शुभेच्छा संदेश उपस्थित लोकप्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

0

२७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी, १३ जूनपासून नियमीत वर्गांना सुरुवात

मुंबई, ०६ मे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे.

बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम ( मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी ( डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :

· अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन/ऑफलाईन) – ८ मे ते २३ मे, २०२५ (दुपारी १.०० वाजेपर्यंत)

· प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – ८ मे ते २३ मे, २०२५ (दुपारी १.०० वाजेपर्यंत)

· ऑनलाईन एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – ८ मे ते २३ मे, २०२५ (१.०० वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.

· पहिली मेरीट लिस्ट – २७ मे, २०२५ (सकाळी ११.०० वाजता)

· ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – २८ मे ते ३० मे, २०२५ (दुपारी.३.०० वाजेपर्यंत)

· द्वितीय मेरीट लिस्ट – ३१ मे, २०२५ (संध्याकाळी ७.०० वाजता)

· ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – २ जून ते ४ जून, २०२५ (दुपारी.३.०० वाजे पर्यंत)

· तृतीय मेरीट लिस्ट – ५ जून, २०२५ (सकाळी ११.०० वाजता)

· ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे –६ जून ते १० जून, २०२५ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)

· कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन- १३ जून २०२५

पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले आहे.

आपत्ती व्यवस्थापनात सर्व विभागांनी सज्ज राहावे- अप्पर जिल्हाधिकारी घुगे 

0
वाशिम, दि.६ मे  : आगामी मान्सून हंगामात संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्ण सज्ज रहावे, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडाव्यात आणि प्रत्येक विभागाने तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन पथके तयार ठेवावीत, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी आज दि.६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.
      जिल्ह्यात नद्यांच्या पुरामुळे धोक्यात येणाऱ्या गावांची ओळख पटवून त्या ठिकाणी आरोग्य, बचाव आणि अत्यावश्यक सेवा यांची पथके २४ तास सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महापुराच्या संभाव्य प्रभावाखाली येणाऱ्या गावांबाबत सविस्तर चर्चा झाली.
महावितरण विभागास वीज अटकाव यंत्रे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून मालेगाव तालुक्यातील मौजे डव्हा संस्थान येथे वीज अटकाव यंत्राची दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले.
      आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत नवीन शोध व बचाव साहित्याचे वाटप सर्व तालुक्यांना करण्यात येणार असून, ३० प्रकारचे साहित्य तसेच १० पोर्टेबल लाईट इन्व्हर्टर व इतर उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. “आपला मित्र” प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राप्त साहित्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
      यावेळी मध्यम प्रकल्पांच्या जलाशय पातळीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील एकबुर्जी धरणात १०.७८%, मालेगाव तालुक्यातील सोनल धरणात १२.७१% आणि कारंजा तालुक्यातील अडाण धरणात ४४.३९% पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. वाशिम तालुक्यात पाणी पातळी कमी असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाणी चा वापर करावा असेही यावेळी सांगण्यात आले.
       पावसाळ्यात रोगप्रसार रोखण्यासाठी नालेसफाई, धोकादायक इमारतींची तपासणी, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन साहित्य सज्जता, नियंत्रण कक्ष स्थापन व झाडे तोडण्याचे निर्देश नगरपरिषद व नगरपंचायत यांना देण्यात आले. अतिवृष्टीसह धरणांवर बिनतारी संदेश यंत्रणा व सूचनाफलक लावणे, प्रकल्पांचे सर्वेक्षण आणि दुरुस्ती, पर्जन्यमान स्टोनची तपासणी याबाबत संबंधित विभागांना सूचित करण्यात आले.
आरोग्य यंत्रणेला रुग्णवाहिका सज्ज ठेवणे, औषध साठा राखणे, आरोग्य पथके तैनात ठेवणे तसेच जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले. विद्युत वितरण कंपनीला २४ तास नियंत्रण कक्ष चालू ठेवण्याबरोबरच वाकलेले पोल, झाडांच्या फांद्या कापणे आणि दुरुस्ती पथके सज्ज ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
      सार्वजनिक बांधकाम विभागास रस्त्यांची तपासणी करून प्रमाणपत्र सादर करण्याचे आणि धोकादायक झाडे हटवण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व तहसीलदारांना शोध आणि बचाव पथके तयार ठेवण्याबरोबरच संभाव्य बाधित व्यक्तींची माहिती अद्यावत ठेवण्याचे, तात्पुरते निवारे निश्चित करण्याचे व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले.
     या बैठकीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीचे सादरीकरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.

बारावीत पी. डी. राहांगडाले कनिष्ठ महाविद्यालय यशाची परंपरा कायम

0

गोरेगाव,दि.०६ः स्थानिक पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या इ. १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा निकाल 95% लागला असून, कला शाखा 90 % तर विज्ञान शाखेचा 100 % आहे. अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
यावर्षी विज्ञान आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यामध्ये “विज्ञान शाखेतून अपूर्व मोरेश्वर क्षीरसागर 67.83% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, रोहिणी यादोरावं पटले 66.67% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला,आणि उज्वल राधेश्याम कटरे 64.33% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कला शाखेत अंजली जितेंद्र मोहबे 80.83% गुण मिळवत प्रथम क्रमांक, तुलसी राजकुमार रोकडे 77.67% गुण मिळवत द्वितीय क्रमांक आणि पल्लवी चेतनदास कोहळे 76.00%गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या यशामागे महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षकवृंद आणि पालकांचे योगदान महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांच्या परिश्रमांना यश मिळाले आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ.टी.पी.येडे,सचिव एड.टी.बी.कटरे,संचालक यु.टी.बिसेन महाविद्यालयाचे प्राचार्य सी.डी.मोरघडे,पर्यवेक्षक ए.एच.कटरे तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पी. डी. राहांगडाले कनिष्ठ महाविद्यालयाने याआधीच्या वर्षी देखील उल्लेखनीय निकाल देत सातत्याने गुणवत्तेचा उच्च स्तर राखला आहे.

अॅड. प्रवीणकुमार श्यामकुवर यांची नोटरीपदी नियुक्ती

0

गोंदिया ः येथील अॅड. प्रवीणकुमार श्रावण श्यामकुवर यांची भारत सरकारतर्फे नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. श्यामकुवर हे जिल्हा व सत्र न्यायालयात अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

फुंडे सायन्स कॉलेजचे विश्वेष फुंडे अव्वल

0

गोंदिया,दि.०६ः लावन्या बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित फुंडे सायन्स कॉलेज फुलचुर, गोंदिया 12वी च्या परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला. वि‌द्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजची ग्रामीण भागात असलेली प्रतिष्ठा यावर्षीही कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर यांच्या फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 188 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्थान पटकावले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विश्वेष गजेंद्र फुंडे यांनी प्रथम, मानसी संजीव हत्तीमारे यांनी द्वितीय, तर समीक्षा राजेंद्र चव्हाण आणि पूर्वा राजेंद्र खवासे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला. एकूण विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 89 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि 55 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवून महाविद्यालयाचे नाव उंचावले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे संचालक गजेंद्र फुंडे, सौ. मंजुषा फुंडे,नितीन फुंडे, प्राचार्या सौ. शुभांगिनी भंडारकर, प्रा. कंचन शर्मा, प्रा. पूजा तुरकर, प्रा. जयेश कुंभलवार, प्रा. शुभम अवस्थी, प्रा. अश्विन खोब्रागडे, प्रा. प्रकाश पाथोडे, प्रा. रवींद्र मस्करे, प्रा. दुर्गेश बिसेन, प्रा. तेजस भोयर, प्रा. शुभम घोसे आणि विनोद मत्ते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, वि‌द्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील आणि शिक्षकांना दिले.

एमआयडीसीतील व्यापार्यांच्या महावितरण मुख्य अभियंता रंगांरीनी एैकल्या समस्या

0

गोंदिया,दि.०६:येथील एमआयडीसी मुंडीपार येथील राईस मिल व्यापारी वर्गाच्यावतीने आज,महावितरणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या सोबत संवाद साधत आपल्या समस्या मुख्य अभियंता पुढे मांडल्या.त्यांत मुंडीपार येथील HT,LT Connection चा व्यापारी वर्गाना होत असलेल्या विजेच्या समस्या मांडल्या व तात्काळ निवारण करण्याची मागणी केली.

शुभलक्ष्मी राइस मिल चे मालक व राइस मिल असोसिएशनचे चे अध्यक्ष, हुकुमचंद अग्रवाल व व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी, यांनी मुख्य अभियंता यांच्याशी बोलताना या वेळी आपल्या विविध समस्या जसे औद्योगिक फिडर वर येणार्‍या समस्या विस्तार पूर्वक मांडल्या.

त्यानुसार, मुंडीपार येथे फिडर ट्रीप होत असल्यामुळे बर्‍याच वेळी वीज पुरवठा खंडित होतो. परिणामी, त्याचा फटका स्थानीय उद्योग, विशेष करून राईस मिल, व्यापारी यांना होतो.बर्‍याच वेळी, ट्रीपींगची समस्या होते, व अर्धा तास ते पाउण तास या वेळे दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊन, त्याचा फटका, व परीणाम, उद्योजक, व राईस मिल व्यापारी वर्गाला होतो. तसेच लघु व्यापारी वर्गाला सुद्धा याचा फटका होत असतो.

यावर मुख्य अभियंता, श्री. रंगारी यांनी वारनवार ट्रिपिंग च्या समस्येवर तोडगा काहडत, 33 KV फिडर चे लोड कमी करण्याचे आश्वासन दिले. तसेच, या एम आय डी सी फिडर चे तान दुसरी कडे वळवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.या वेळी, गोंदिया डिविजन चे कार्यकारी अभियंता आनंद जैन व उपकार्यकारी अभियंता,गजानन देव्हारे व एस.के चव्हाण, सहाय्यक अभियंता अन्य अभियंते, व व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.