37.5 C
Gondiā
Saturday, April 27, 2024
Home Blog

खासगी बस दरीत कोसळली… २८ प्रवासी जखमी

0

बुलढाणा : इंदुरहून अकोल्याकडे जाणारी खासगी प्रवासी बस दरीत कोसळली. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते बुऱ्हाणपूर दरम्यानच्या करोली घाटात घडली. अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यप्रदेशमध्ये उपचार सुरू आहेत. इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सची बस अकोल्याकडे जात होती. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत १०० फूट खाली कोसळली.दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झाले. मात्र घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातात २८ जण प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर दर्यापूर व बुऱ्हाणपूर (मध्यप्रदेश ) येथे उपचार सुरू आहेत.

गोठणपार हत्याकांडातील चारही आरोपी अल्पवयीन मुलांची बाल सुुधारगृहात रवानगी

0

सामूहिक अत्याचार करून केली बालिकेची हत्या

गोंदिया,दि.२७ः- जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गोठणपार येथे लग्न समारंभात आलेल्या 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्यानंतर हत्या केल्याप्रकरणी देवरी तालुक्यातीलच चिल्हाटी गावातील ४ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेत नागपूर येथील बाल सुधारगृहात रवानगी केल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांनी पत्रपरिषदेत दिली.कुठलेही सबळ पुरावे नसल्याने आरोपींचा शोध घेतांना अडचणी निर्माण झालेल्या होत्या,अशा परिस्थितीत पोलिसांनी मोठ्या शिताफीने या घटनेचा तपास करून आश्रमशाळेतील इयत्ता १२ वीत असलेल्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

१९ एप्रिलला पीडित मुलगी आपल्या बहिणी सोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोठणपार गावात लग्न समारंभात आली होती.पीडित मुलीच्या मित्राने तिला आपल्या दुचाकीवर बसवून वडेकसा जंगलात घेऊन गेला. तिथे असलेल्या 4 मित्रांनी पीडितेवर जंगलात सामूहिक अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करीत हत्या करीत पळ काढला.२० एप्रिलला सकाळी पीडितेच्या शोध घेतला असता गावकऱ्यांना पीडित मुलीचा मृतदेह जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्याना आढळला.पोलिसांना याची माहिती देण्यात आली.सदर घटनास्थळी मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात अडचण निर्माण होत असल्याने पोलिसांनी ६ विविध पथके तयार करून या संदर्भात तपास केला असता पीडितेच्या मोबाईल वरून काही मुलांशी चॅटींग समजून आल्याने आणि हत्येचा वेळ सारखा असल्याने पोलिसानी तपास चक्रे फिरवीत 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चौकशी केली.त्यातील 2 मुलांनी गुन्हा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कलम 302, 376, 363, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या चारही विधिसंघर्ष बालकांची रवानगी नागपुर येथील बाल सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती दिली.

इंडोनेशिया निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने साधला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद

0

मुंबई, दि.२७ : इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली.  यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात लोकसभा २०२४ ची निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे, नियोजनबद्धरित्या पार पाडत आहे. राज्यातील एकूण मतदार, मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा, मतदार जनजागृती आदींची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भेटी दरम्यान शिष्टमंडळाला  दिली.

यावेळी इंडोनेशिया निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त इधाहम होलिक, सचिव बेनार्ड डेर, मा वन सृष्टोनो, उपमुख्य निवडणूक अधिकारी सुर्यदी, अधिकारी रोबि लिओ अगुस, मोह सकिर रंदिया, सायकीर, सरहा गोकसी, कौन्सिल जनरल तोल्ह उबादी, विजय तावडे, व्हिसा अधिकारी मोहमद  अख्यार, राजेश पाड्या, राज्याच्या निवडणूक विभागाचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यावेळी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी यावेळी  भारत निवडणूक आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांचे अधिकार व चालणारे कामकाज याविषयी देखील माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्रपणे घेण्यात येतात.  राज्याची लोकसंख्या, लोकसभा मतदार संघ, एकूण मतदान केंद्र, राज्यातील मतदानाचे टप्पे, टप्पा निहाय सुरू असलेली  निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र, बॅलेट युनिट ,कायदा व सुव्यवस्था, राजकीय पक्ष आणि आचारसंहिता, मतदान वाढवण्यासाठी राबवण्यात आलेले उपक्रम, राज्यात उभारलेले चेक पोस्ट, आधुनिक तंत्रज्ञानचा निवडणूक प्रक्रियेतील उपयोग  करून विविध ॲप आणि पोर्टल आयोगाने विकसित केलेले आहेत याबाबत सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.

0000

दुर्ग-छपरा एवं दुर्ग-पटना समर स्पेशल ट्रेन का विस्तार गोंदिया तक

0

गोंदिया,दि.२७ एप्रेल- दुर्ग-छपरा एवं दुर्ग-पटना समर स्पेशल ट्रेन का विस्तार गोंदिया तक होने से ‘‘दक्षिण पूर्व मध्य रेलवे के गोंदिया, डोंगरगढ़ एवं राजनांदगाँव के यात्री भी लाभान्वित होंगे‘‘.रेलवे द्वारा ग्रीष्म ऋतु में यात्रियों की सुविधा के लिए दुर्ग-छपरा एवं दुर्ग-पटना के मध्य गाड़ियों में होने वाली भीड़ को ध्यान में रखते हुए दो समर स्पेशल ट्रेन दुर्ग-छपरा-दुर्ग एवं दुर्ग-पाटन–दुर्ग के मध्य चलाई जा रही है । नागपुर मण्डल में रेल यात्रियों की मांग को ध्यान में रखते हुये इन दोनों समर स्पेशल गाड़ियों को गोंदिया तक विस्तार किया गया है ।

08795 गोंदिया-छपरा समर स्पेशल गोंदिया से दिनांक 06, 13 एवं 20 मई, 2024 (सोमवार) तथा 08796 छपरा-गोंदिया समर स्पेशल छपरा से दिनांक 07, 14 एवं 21 मई, 2024 (मंगलवार) को छुटेगी । इस गाड़ी की गोंदिया एवं दुर्ग के बीच की समय समय-सारणी
निम्नानुसार है –
08795 गोंदिया-छपरा समर स्पेशल स्टेशन 08796 छपरा-गोंदिया समर स्पेशल
पहुँच                छुट                पहुँच      छुट
—– (सोमवार) 20.00 गोंदिया    22.30 — बुधवार

20.56          20.58 डोंगरगढ़         20.21    20.23

21.20         21.22 राजनांदगाँव    19.56     19.58
22.15         22.20   दुर्ग           13.30    19.35

*********

यह गाड़ी गोंदिया से दिनांक 10, 17 एवं 24 मई 2024 (शुक्रवार) को 08793 नं के साथ पटना के लिए रवाना होगी | इसी प्रकार पटना से दिनांक 11, 18 एवं 25 मई 2024 (रविवार) को 08794 नं के साथ गोंदिया के लिए रवाना होगी |

। इस गाड़ी की गोंदिया एवं दुर्ग के बीच की समय समय-सारणी निम्नानुसार है –
08793 गोंदिया-पटना समर स्पेशल स्टेशन 08794 पटना-गोंदिया समर स्पेशल
पहुँच छुट पहुँच छुट
—– (शुक्रवार) 11.20 गोंदिया 16.00 — रविवार

12.16 12.18 डोंगरगढ़ 14.41 14.43

12.40 12.42 राजनांदगाँव 14.19 14.21
13.20 13.25 दुर्ग 13.55 14.00
दोनों गाड़ियों की समय-सारणी दुर्ग एवं पटना तथा दुर्ग–छपरा के बीच यथावत रहेगी ।

‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या जाळ्यात अडकली ‘ कोल्हापूरात अन्न-औषध’ची महिला अधिकारी

0
कोल्हापूर,दि.२७- एका हॉटेलवर कारवाई टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडील अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती धनाजी देशमुख यांना शुक्रवारी (दि.२६) लाचप्रकरणी पकडण्यात आले. यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.कीर्ती धनाजी देशमुख या सध्या कोल्हापूर येथील विश्व रेसिडेन्सी, ताराबाई पार्क येथे राहतात. त्या मूळच्या समर्थनगर, (मोहोळ, जि. सोलापूर) गावाच्या आहेत.

कीर्ती देशमुख यांच्यावरील कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, त्यांनी हॉटेलच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटीवरून कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी २५ हजार रुपये लाच घेतल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या कारवाईने अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.पोलिसांनी पंचांसमक्ष देशमुख हिच्या घराची झडती घेतली. त्यात ८० तोळे सोने, रोख साडेतीन लाख रुपये व साडेतीन ते चार जप्त केलेले दागिने. लाख रुपये किमतीचा हिऱ्यांचा हार जप्त करण्यात आला.

कारवाईबाबत विभागाने दिलेली माहिती अशी : यातील फिर्यादीचे किणी (ता. हातकणंगले) येथे हॉटेल आहे. कीर्ती देशमुख हिने १५ मार्च २०२४ ला या हॉटेलची तपासणी करत अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्रुटींबाबत कारवाई न करण्यासाठी देशमुखने फिर्यादीकडे एक लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती ७० हजार ठरले. त्यातील पहिला हप्ता २५ हजार घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले.

कीर्ती देशमुख यांनी धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकात पेसै स्वीकारले. तेथून त्या त्यांच्या वाहनाने घराजवळ गेल्या. तेथील पार्किंगमध्ये वाहन लावत असतानाच लाचलुचपत विभागाने त्यांना ताब्यात घेतले. विभागाला पैशाबाबत मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री करून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले.

या प्रकरणी तिच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कीर्ती देशमुख यांची सात महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पथकाने कारवाईनंतर त्यांच्या मूळ गावी त्यांच्या घराचीही झडती घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे घर बंद होते. त्यांची आई अलीकडेच कोल्हापुरात राहण्यास आल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक बंबरगेकर, भंडारे, सुधीर पाटील, पूनम पाटील यांनी भाग घेतला.

राज्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव;नाशिकच्या मालेगावात दोघांचा मृत्यू;आरोग्य यंत्रणा सतर्क

0

नाशिक:- गेल्या दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लूचा धोका पुन्हा समोर येण्याची भीती आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला आहे. मालेगावातील स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोघा रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन मालेगाव महापालिकेकडून करण आले आहे.

मालेगावात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे असून स्वाइन फ्लूचा धोका वाढत आहे. मालेगावमधील ६३ वर्षीय महिलेचा ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. त्या महिलेस स्वाइन फ्लू झाल्यानंतर तिच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु होते. दुसरीकडे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मालेगावमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. गेल्या २० दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.

सर्दी, खोकला, ताप व चालताना दम लागणे ही लक्षणे दिसत असल्यास तातडीने जवळचे महापालिका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा आपला दवाखाना येथे तपासणी करून घ्यावी. औषधोपचार सुरू करावेत. घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा सूचना महापालिका आरोग्य विभागाने केले आहेत. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री अहिरे यांनी पालिकेकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्याची माहिती दिली. स्वाइन फ्लू बरा होतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रात आणखी एका बँकेत घोटाळा, जैस्वाल बंंधूना अटक झाल्याने खळबळ

0

छत्रपती संभाजीनगर– सध्या RBI ऍक्शन मोडवर असल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मलकापूर अर्बन बँकेत आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे, यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे बँकेत जमा करीत 9 कोटींचे कर्ज उचलल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी गुन्हे शाखेने तत्काळ दोन आरोपींना अटक देखील केली आहे. अभिषेक जगदीश जैस्वाल आणि अमरिश जगदीश जैस्वाल अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी अभिषेक जैस्वाल हे भाजप पदाधिकारी आहेत. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींनी कर्ज काढल्यावर कोणालाही खबर लागू दिली नाही, मात्र ज्यावेळी कर्जाचा भरणा झाला नाही, त्यावेळी बँकेने जप्तीची नोटीस काढल्यावर बँकेने कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली असता हा घोटाळा असल्याचे लक्षात आले आहे.

दरम्यान, या घोटाळ्यामुळे निर्बंध घालण्यात आल्याने मलकापूर अर्बन बँकेचे हजारो खातेदार पैसा अडकल्याने टेन्शनमध्ये आले आहेत. तसेच या बँकेतील खातेदारांचे शेकडो कोटी बँकेमध्ये अडकल्याने खातेदारांना नेमकं काय करायच आहे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित पडला आहे.

या बँकेतून जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करत 9 कोटींचं कर्ज घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे भाजप पदाधिकारी अभिषेक जयस्वाल आणि अमरीश जयस्वाल या दोघांना अटक करण्यात आली आहे. अभिषेक जयस्वाल हा भाजपचा पदाधिकारी असून जिल्हा बँकेचे संचालक देखील आहेत. त्यामुळे या घोटाळ्या प्रकरणात वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये तत्कालीन बँक व्यवस्थापक आणि इतरांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून आढावा

0

मुंबई, दि. 27  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक–२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील ’३०-दक्षिण मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधू व ’३१-दक्षिण मुंबई’ लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. मुकेश जैन यांनी आज लोकसभा मतदारसंघांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ’३०-दक्षिण मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. या बैठकीला मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात आदी उपस्थित होते. या बैठकीत श्री. सिंधू यांनी निवडणूक खर्च विभागात नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेत माहिती जाणून घेतली.

’३१-दक्षिण मुंबई’ लोकसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, समन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता) उन्मेष महाजन, समन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानी, तक्रारी व्यवस्थापन निवारण आणि मतदार हेल्पलाईनचे समन्वय अधिकारी राजू थोटे आदि उपस्थित होते. या बैठकीत डॉ. जैन यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांना समूह भावनेने काम करण्याचे आवाहन केले. तसेच अधिकारी- कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कामकाजासाठी सज्ज केल्याबद्दल डॉ. जैन यांनी समाधान व्यक्त केले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षाची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून पाहणी

0

मुंबई, दि.27 : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रणासाठी स्थापित प्रसारमाध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधू, डॉ. मुकेश जैन यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव  यांनी माध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. श्री. यादव यांनी प्रसारमाध्यम कक्षाद्वारे समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून सी-व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. सिंधु व डॉ. जैन यांनी प्रसारमाध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक, मुद्रीत व समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती, पेड न्यूज तसेच सी-व्हिजील ॲपवर नियंत्रण कक्षास प्राप्त तक्रारीबाबत माहिती घेतली. उमेदवारांच्या वर्तमानपत्रातील तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि विशेषत: समाजमाध्यमांमधील जाहिरातींवर कटाक्षाने लक्ष ठेवा, अशा सूचना दोन्ही निरीक्षकांनी केल्या.

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

0

मुंबई, दि. 27 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये  मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

➡️ बुलढाणा –  ५८.४५ टक्के

➡️ अकोला – ५८.०९ टक्के

➡️ अमरावती – ६०.७४ टक्के

➡️ वर्धा – ६२.६५ टक्के

➡️ यवतमाळ – वाशिम – ५७.०० टक्के.

➡️ हिंगोली –  ६०.७९ टक्के

➡️ नांदेड –  ५९.५७ टक्के

➡️ परभणी – ६०.०९ टक्के