24.7 C
Gondiā
Saturday, September 30, 2023
Home Blog

डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनीताई प्रकाश, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील , शौर्य चक्र विजेते कमांडो मधुसुधनसुर्वे यांच्या उपस्थिती एनजीएफचे राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार

0

एनजीएफच्या ८ व्या राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार-२०२३’ सोहळ्यासाठी सन्माननीय डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी ताई प्रकाश आमटे यांसह आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील , शौर्य चक्र विजेते कमांडो मधुसुधन सुर्वे विशेष पाहुणे

मुंबई, : शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांकरिता त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी गेल्या एका तपाहून अधिक काळ सातत्याने कार्यरत असलेली ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’ (एनजीएफ) ही मुंबईतील प्रख्यात संस्था असून या संस्थेचा ८-वा राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार – २०२३ सोहळा” शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी, संध्याकाळी ५:३० वा., पु.ल. देशपांडे सभागृह, टिळक मंदिर, विले पार्ले (पूर्व ), मुंबई येथे संपन्न होणार आहे.

या खास सोहळ्यासाठी जंगलात वास्तव्य करणाऱ्या ‘माडिया गोंड’ आदिवासी जमातीतील लोकांना भूक, रोगराई, अंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे, बाबांचे स्वप्न हेमलकशात प्रत्यक्षात उतरवणारे ‘मॅगसेसे’ पारितोषिक विजेते डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉ. मंदाकिनी ताई आमटे, तसेच देशासाठी युद्धभूमीवर अलौकिक शौर्य गाजविणारे शौर्य चक्र विजेते कमांडो मधुसुधन सुर्वे आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून परिचित असलेले युवा आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, एस बी आय जनरल इन्शुरन्सचे डेप्युटी मॅनेजिंग डिरेक्टर आनंद पेजावर, पत्रकार, व्यवसाय प्रमुख आणि एडिटर झी 24 तास – मीश्री निलेश खरे या मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत यंदाचा ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’चा ८ वा राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार-२०२३’ सोहळा रंगणार असल्याचे एनजीएफच्या संस्थापिका – अध्यक्षा सौ नूतन विनायक गुळगुळे यांनी जाहीर केले आहे.

या सोहळ्यासाठी विविध भाषा – परंपरा आणि संस्कृती असलेल्या आपल्या देशातील अनेक राज्यांतून दिव्यांग स्पर्धकांच्या भरघोस प्रवेशिका प्राप्त होतात, अलौकिक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांगांना पुरस्कार देऊन त्यांचे मनोबळ वाढविण्याचे काम करणारी ही देशातील पहिली संस्था आहे. ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’ ‘करोना–१९’मुळे पालकत्व गमावलेल्या ग्रामीण भागातील ‘दिव्यांग’ बालकांकरिता विरार, अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरु लवकरच सुरु करणार आहे. असा प्रकल्प राबविणारी भारतातील ही एकमेव संस्था ठरणार आहे. सध्या या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्यात आले असून २०२४ च्या सुरुवातीला ४० मुले व ४० मुली आपल्या एकल पालकांसोबत येथे दाखल होणार आहेत.

शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या परंतु काहीतरी अद्वितीय कर्तृत्व सिद्ध  करून आपल्या कौशल्यांचा उत्तम वापर करून आपल्या व्यवसायात/जीवनात एखादी सर्वसाधारण व्यक्ती विचार करू शकणार नाही, असे काहीतरी अलौकिक कार्य सिद्ध केलेले व्यक्तींचा गुणगौरव करणारा हा सोहळा आहे. वैयक्तिक श्रेणीतील नऊ पुरस्कारां सोबतच ‘माय लेक पुरस्कार’, ‘कौटुंबिक पुरस्कार'(एकाच कुटुंबातील दोन /तीन सभासद दिव्यांग), तसेच ‘संस्था पुरस्कार'( सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था), ‘जीवन गौरव पुरस्कार’ (६५ वर्षे व अधिक), आणि मरणोत्तर पुरस्कार असे पुरस्कार देण्यात येणार आहे. शाल, रोख रक्कम,  आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवमूर्तींचा सन्मान केला जातो.

काॅम्प्यूटर लॅबचे उद्घाटन करताना अभियंता लिचडे

0

जे. एम. हायस्कूल येथे काॅम्प्यूटर लॅबचे उद्घाटन
गोंदिया ः सिव्हील लाइन, गोंदिया येथील जे. एम. हायस्कूल येथे नुकतीच काॅम्प्यूटर लॅबची स्थापना करण्यात आली. या लॅबचे उद्घाटन अभियंता पराग लिचडे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एन. अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पटले, नागपुरे, राखडे, शिक्षिका लांजेवार उपस्थित होते.
पराग लिचडे हे जे. एम. हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. ते ब्रिलिआे टेक्नालाॅजी या कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. कंपनीअंतर्गत असलेल्या ब्रिलिआे ब्रिंगींग स्माइल्समार्फत कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी ज्या शासकीय अनुदानित शाळेत शिकले, त्या शाळेला संगणक भेट देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार, पराग लिचडे यांनी जे.एम. हायस्कूल येथे संगणकाची गरज आेळखून या शाळेचे नाव कंपनीकडे दिले होते. त्यानुसार, शाळेला दहा संगणक भेट देण्यात आले. तथापि, या काॅम्प्यूटर लॅबचे उद्घाटन माजी विद्यार्थी असलेले अभियंता पराग लिचडे यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकीय ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. ही गरज आेळखून पराग लिचडे या विद्यार्थ्याने कार्यरत असलेल्या कंपनीमार्फत शाळेला संगणक भेट दिले. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी त्यांच्यावर काैतुकाची थाप दिली. संचालन नीरज नागपुरे यांनी केले. आभार मुख्याध्यापक अग्रवाल यांनी मानले.

२००० हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली

0

आरबीआयने आता ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबई :-दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवली आहे.उद्या रविवारपासून २००० रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे.आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी ७ दिवसांची मुदत मिळाली आहे.

२००० हजारांच्या नोटा जमा करण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर होती,परंतू ती आता एक आठवड्याने वाढविण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० हजारांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली होती. मिळालेल्या आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत चलनातून परत मिळालेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.३२ लाख कोटी आहे. परिणामी, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी व्यवसायाच्या समाप्तीपर्यंत दोन हजारांच्या सुमारे २४ हजार कोटींच्या नोटा अजूनही चलनात होत्या. चलनात असलेल्या ९३ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचे सांगितले जात आहे.

आरबीआयने आता ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी उरलेल्या २४ हजार कोटी रुपयांपैकी किती नोटा परत येतात हा एक प्रश्नच आहे. शेवटचा आकडा ७ ऑक्टोबरनंतर समोर येण्याची शक्यता आहे. यानंतर उरलेल्या हजारो करोडोंच्या नोटांचा काय झाले हा देखील मोठा प्रश्न यंत्रणांसमोर राहणार आहे.

जिल्ह्यातील 868 गावांमध्ये होणार श्रमदानातून स्वच्छता

0

सर्व अधिकारी कर्मचार्यांसह नागरीकांनी सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल पाटील यांचे आवाहन

गोंदिया, ता. 30 : वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छता राखणे, हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. स्वच्छतेची लोक चळवळ निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशात ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘स्वच्छांजली’ याउपक्रमांर्तगत उद्या (ता. १ ) संपूर्ण जिल्ह्यातील ८६८ गावांमध्ये श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकारी कर्मचार्यांसह नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. दरम्यान संपूर्ण देशात १ ऑक्टोबर रोजी एक तास श्रमदानातून स्वच्छता करण्याचे माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांनी आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 868 गावांमध्ये श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नरेश भांडारकर यांनी कळविले आहे. दरम्यान जिल्हास्तरावर गोंदिया पंचायत समिती अंतर्गत कारंजा या ठिकाणी सकाळी आठ वाजता श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विषय समितीचे सर्व सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख कर्मचारी अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. आपले गाव स्वच्छ सुंदर व आरोग्य संपन्न व्हावे, यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या गावातील सर्व सार्वजनिक ठिकाण, बस स्थानक, चावडी, शासकीय कार्यालय, शाळा, अंगणवाडी, जलस्रोतांच्या ठिकाणात स्वच्छता मोहीम राबवून उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केली आहे.

२ ऑक्टोबरला शपथ
स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये महात्मा गांधी यांना अभिवादन करून स्वच्छतेची शपथ घेण्यात येणार आहे याठिकाणी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे

न्यू फ्रेंड्स गणेश उत्सव मंडल गणेश प्रतिमा विसर्जनकी भव्य शोभायात्रा व आकर्षक आतिशबाजी सोमवार 2 अक्टूबर को

0

गोंदिया। न्यू फ्रेंड्स गणेश उत्सव मंडल द्वारा गणेश प्रतिमा का भव्य विसर्जन शोभायात्रा व आतिशबाजी का आयोजन सोमवार 2 अक्टूबर को आयोजित किया गया है, आतिशबाजी के कार्यक्रम का उद्घाटन प्रफुल्ल गोपाल दास अग्रवाल द्वारा किया जाएगा।

गौरतलब है की न्यू फ्रेंड्स गणेश उत्सव मंडल गौशाला वार्ड द्वारा प्रतिवर्ष अनुसार गणेशजी की प्रतिमा विसर्जन का कार्यक्रम भव्य शोभा यात्रा के साथ आकर्षक आतिशबाजी कर किया जाता है।इस वर्ष यह आयोजन सोमवार 2 अक्टूबर को को किया जाएगा जिसमें गणेश उत्सव मंडल गौशाला वार्ड से शाम 5 :00 बजे भव्य शोभायात्रा निकाली जाएंगी तथा शाम 6:45 पर गुरुनानक गेट के समीप काशी की आतिशबाजी का रंगारंग कार्यक्रम आयोजित किया गया है।

विशेष यह है कि आकर्षक आतिशबाजी वह विभिन्न कलात्मक झांकियां के माध्यम से श्रीगणेश जी प्रतिमा के विसर्जन शोभा यात्रा के लिए न्यू फ्रेंड्स गणेश उत्सव मंडल गौशाला वार्ड प्रसिद्ध है।इस वर्ष झांकियां में प्रमुख रूप से श्रीराम जन्मोत्सव ,श्री कृष्ण की बाल लीला तथा भागीरथ की तपस्या द्वारा गंगा को स्वर्ग से धरती परअवतरण की स्वचालित झांकियां प्रमुख रहेगी।इसके साथ ही विभिन्न वाद्य यंत्र, छत्तीसगढ़ के धुमाल व डीजे के साथ-साथ राजनांदगांव की शहनाई व शेर डांस आकर्षण का प्रमुख केंद्र होंगे।

दो स्थानों पर होगी आतिशबाजी

न्यू फ्रेंड्स गणेश उत्सव मंडल द्वारा आयोजित शोभायात्रा के दौरान इस वर्ष दो स्थानों पर आतिशबाजी का कार्यक्रम आयोजित किया गया है।जिसमें प्रथम मुख्य रूप से गुरुनानक गेट से प्रभात टॉकीज वह अग्रसेन गेट से गांधी प्रतिमा तक का समावेश है।

न्यू फ्रेंड्स गणेश उत्सव मंडल द्वारा 10 दिनों तक श्री गणेश उत्सव का पर्व का भव्य आयोजन किया गया जिसमें विभिन्न सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमों के साथ महिला व बच्चों के लिए भी कार्यक्रम आयोजित किए गए थे, जिसमें गरबा मुख्य रूप से था साथ ही पंडाल परिसर में बच्चों के लिए झूले भी लगाए गए थे।न्यू फ्रेंड्स गणेश उत्सव मंडल द्वारा गणेश प्रतिमा विसर्जन के दौरान भव्य शोभायात्रा व आतिशबाजी में कार्यक्रम में अधिक से अधिक नागरिकों व श्रद्धालुओं के शामिल होने का आवाहन मंडल के संरक्षक राकेश ठाकुर, अध्यक्ष संदीप ठाकुर, सचिव सचिन ठाकुर, उपाध्यक्ष मिकी अग्रवाल, कोषाध्यक्ष चीकू ठाकुर सहसचिव नवीन जोशी व मंडल के सदस्यों द्वारा गया है।

जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्यावतीने शौर्य दिवस कार्यक्रम उत्साहात

0

गोंदिया,दि.30ः-28 सप्टेंबरच्या रात्री आपण गाढ झोपेत असतांना भारतीय सैन्यदलाने उरी सर्जिकल स्ट्राईक घडवून अतिरेक्यांचा खात्मा केला व पाकिस्तानला धडा शिकवला होता.तो  ” शौर्य दिवस ” (२९ सप्टेंबर) हा दिवस भारतवासियांसाठी अभिमानाचा दिवस आहे.भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत २९ सप्टेंबर हा दिवस “शौर्य दिन” म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.याचे औचित्य साधून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सदर कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी भूषविले.पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे,जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीर पिता, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, मातृभूमी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था गोंदिया व तिरोडा चे पदाधिकारी-सदस्य, जिल्ह्यातील माजी सैनिक व परिवार, मनोहर म्युनिसिपल विद्यालयातील शिक्षक वृंद-विध्यार्थी उपस्थित होते.

सदर वेळी आयोजित “शौर्य दिन” निमित्त वीरपत्नी व स्वातंत्र्य दिवसाच्या उपलक्षात आयोजित पथसंचालनात भाग घेणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे हस्ते करण्यात आले.मातृभूमी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे संचालक प्रभाकर पुस्तोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मातृभूमी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था पुणे, ही महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षित माजी सैनिकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य वेळी संरक्षण दलात अधिकारी पदांवर जाण्याचे शैक्षणिक मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने स्थापन केली आहे. याद्वारे ग्रामीण भागातील प्रतिभावान, गरजू व होतकरू मुलांना विशेष मार्गदर्शन केले जाते.त्यामध्ये UPSC-NDA, राष्ट्रिय मिलिटरी स्कूल, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, सैनिक स्कूल मध्ये निवड होण्याकरीता खूपच कमी दरात ऑनलाइन माध्यमाने ट्युशन क्लासेस उपलब्ध करून दिले जात आहे.

देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत.त्यांच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. जेव्हा जेव्हा देशावर कठीण प्रसंग आला, तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या जीवावर खेळून देशाला बाहेर काढले आहे आणि म्हणूनच माजी सैनिक अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्याकरिता प्रशासनाने समर्पित भावनेने समस्या सोडल्यास सैनिकांच्या ऋणातून उताई होण्याची संधी आपल्याला मिळेल असे  जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले.

सदर कार्यक्रम उत्कृष्टरीत्या पार पाडण्याकरिता जिल्हासैनिक कार्यालयाचे श्री. बावणथडे व श्री. बिसेन यांनी नियोजन केले. तसेच शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना व माजी सैनिक बहुउद्देशिय संस्था गोंदिया व तिरोडा यांनी या कार्यक्रमास पुरेपूर सहकार्य केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

0

मुंबई, दि. 30 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश  अण्णा महानवर यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश  महानवर यांची नियुक्ती केली.

डॉ. प्रकाश महानवर (जन्म : 01.06.1967) सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत आहेत.

डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा कार्यकाळ 5 मे 2023 रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.  त्यानंतर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती.

विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. सुरेशकुमार  (युजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

तर शासकीय कर्मचाऱ्यांचं जातीनिहाय सर्वेक्षण करणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

0

मुंबई:-राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासल्या जाणार आहेत. राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवांकडून हे सर्वेक्षण केल्या जाणार आहे.यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, मराठा, अशा सर्व समाज घटकांमधील किती कर्मचारी सरकारी सेवेत आहेत. याचे सर्वेक्षण केले जाणार आहे.अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कर्मचाऱ्यांचे शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी असल्याचा अहवाल काल बैठकीत सादर केला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरक्षणाच्या मागणीमुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. काल छगन भुजबळ म्हणाले,ओबीसी समाजाचे आरक्षण २७ टक्के आहे. मात्र शासकीय नोकऱ्यांध्ये ओबीसी समाजाचे प्रमाण ७ ते ८ टक्के आहे. याच मुद्यावर उपमुख्यंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली. अजित पवार यांना ही आकडेवाकरी मान्य नव्हती त्यामुळे महाराष्ट्रात शासकीय सेवेत कोणत्या जातीचे किती लोक आहेत, याचे सर्वेक्षण होणार आहे.या सर्वेक्षणामुळे कोणत्या प्रवर्गातील किती लोक शासकीय सेवेत आहेत याची आकडेवारी समोर येणार आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.

*अजित पवार ➖ छगन भुजबळ खडाजंगी*

*ओबीसी प्रश्नाच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी छगन भुजबळ यांचा मुद्दा खोडून काढला. सरकारी नोकरीत ओबीसींना न्याय मिळत नसल्याची भूमिका भुजबळांनी मांडली. मात्र ऐन बैठकीत अजित पवार यांनी आकडेवारी मागितली. याबाबत मंत्री मंडळाचा बैठकीत निर्णय घेणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. दरम्यान सराकरने आता कुठल्या समाजघटकातील किती शासकीय कर्मचारी याचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

गुलाब बिसेन यांचा फिपोली बालकवितासंग्रह प्रकाशित

0

तिरोडा –तालुक्यातील सितेपार येथील लेखक गुलाब बिसेन यांच्या “फिपोली” या प्रातिनिधिक पोवारी बालकविता संग्रहाचे प्रकाशन आनंदवन येथे करण्यात आले.

मराठी तसेच पोवारी बोलीचे बालसाहित्यिक गुलाब बिसेन यांनी संपादित केलेल्या पोवारी बोलीतील “फिपोली” या प्रातिनिधीक बालकविता संग्रहाचे प्रकाशन कवी रमेश बोपचे यांच्याहस्ते आनंदवन येथे करण्यात आले. या कविता संग्रहामध्ये पोवारी बोलीतील पंधरा कवींच्या निवडक पंचेचाळीस बालकवितांचा समावेश आहे. पोवारी बोली साहित्यातील हा अशाप्रकारचा पहिलाच बालकविता संग्रह आहे. या बालकविता संग्रहाची पाठराखण ऋषी बिसेन (IRS) संयुक्त आयुक्त (TDS) आयकर विभाग, नागपूर यांनी केली असून इंजि. गोवर्धन बिसेन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यावेळी कवी रमेश बोपचे, मायाबाई ठाकरे, महेंद्र रहांगडाले, गुलाब बिसेन, उपस्थित होते.

भरडाईसाठी दिलेले धान राईस मिल धारकांकडे उपलब्ध नसताना मागीतली मुदतवाढ

0

राज्य शासनाचा अजब कारभार, शासकीय धान्य अपहाराचे गुन्हे कधी?

गडचिरोली/विष्णू वैरागडे

पणन हंगाम २०२२-२३ करीता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंत घेतलेले धान गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल धारकांना फोर्टीफाईड सीएमआर तांदूळ भरडाईसाठी दिलेले धान परस्पर खुल्या बाजारात विकले असताना शासकीय धान्य अपहाराचे गुन्हे दाखल करण्याऐवजी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे यांनी केंद्र शासनाकडे धान नसलेल्या राईस मिल धारकांसाठी परत एक महिन्याची मुदतवाढ मागितल्याने मंत्रालयात देखील पाणी कुठे तरी मुरत असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
सन २०२२ -२३ या हंगामातील १७ लक्ष क्विंटल तांदूळ केंद्र शासनाला पुरवठा करणे गडचिरोली जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या वारंवार होत असलेल्या हस्तक्षेपामुळे अशक्य झाले असल्याची सबब पुढे करून गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल धारकांनी धान भरडाई करण्याचे काम थांबवले आहे. यासोबतच भारतीय खाद्य निगमचे गुणवत्ता तपासणी करणारे राईस मिल धारकांनी शासनाला पुरवठा केलेला तांदूळाची गुणवत्ता तपासणी करण्यास राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे धजावत नसल्याने नमुद करुन पुन्हा एक महिना धान भरडाई करून फोर्टीफाईड सीएमआर तांदूळ पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग उप सचिव यांच्या कडे मुदतवाढ प्रस्ताव दि २६ सप्टेंबर २०२३ ला सादर केला आहे.
खरं तर राईस मिल धारकांनी गडचिरोली जिल्ह्यातील टीडीसी व डीएम‌ओ कार्यालयाकडून धान वितरित केल्या नंतर दहा दिवसांत फोर्टीफाईड सीएमआर तांदूळ भरडाई करून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील राईस मिल धारकांनी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे. मागील वर्षी दिलेल्या धानाचा फोर्टीफाईड सीएमआर तांदूळ अद्यापही शासनाला जमा केलेला नाही .
८ ऑगस्ट २०२३ प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना राईस मिल धारकांना नियमबाह्य पद्धतीने धान वितरण करुन प्रती क्विंटल धान भरडाई करीता सर्वसाधारणपणे किमान ०.८ युनिट वीज खर्च होत असल्याचे खातरजमा न करता, बँक गॅरंटी पेक्षा अधिक धान वाटत केल्याचा ठपका ठेवून निलंबित केले आहे.मात्र, शासनाने मिल धारकांना अभय दिले आहे. प्रादेशिक व्यवस्थापकांनी या प्रकरणी आपले उखळ चांगलेच पांढरे केले असल्याने मिल धारकांवर शासकीय धान अपहाराचा गुन्हा दाखल करण्याऐवजी स्वतःचाच बळी दिला असल्याचे सांगितले जात आहे.
२१ नोव्हेंबर २०२२ च्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या परिपत्रकानुसार गिरणीधारक असल्याबाबत सबळ पुरावे घेण्याबाबत जिल्हा समन्वयक समितीच्या जबाबदाऱ्या असुन
फोर्टीफाईड सीएमआर तांदूळ भरडाईसाठी दिलेले अनेक अस्तीत्वातच नसुन बरेच राईस मिल बंद अवस्थेत आहेत. काही राईस मिल धारक फोर्टीफाईड सीएमआर तांदूळ भरडाई न करता खाण्यायोग्य नसलेला नित्कृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करण्यात येत असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वास्तविकत: सद्यस्थिती गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल धारकांकडे फोर्टीफाईड सीएमआर तांदूळ भरडाईसाठी टीडीसी व डीएम‌ओ कार्यालयाने दिलेला तोच धानच जाग्यावर उपलब्ध नसताना कुठला तांदूळ जमा करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे यांनी केंद्र शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला असा प्रश्न उपस्थित केला जात असुन महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग १७ लाख क्विंटल तांदळाची विल्हेवाट लावण्यासाठी मुदतवाढ मागितली जात असल्याचे बोलले जात आहे…..