30.3 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog

जळगावच्या अमळनेरमध्ये मालगाडी रेल्वे रूळावरून घसरली

0

जळगाव:-जळगावच्या अमळनेरमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. अमळनेर स्थानकाजवळ एक मालगाडी रेल्वे रुळावरुन खाली घसरली. हा अपघात इतका मोठा होता की, जवळपास मालगाडीचे पाच ते सहा डब्बे रेल्वे रुळावर अस्ताव्यस्त झालेले बघायला मिळाले. विशेष म्हणजे घटना घडली तिथे बाजूलाच अमळनेरमधील प्रसिद्ध प्रताप महाविद्यालय आहे. ही घटना घडली तेव्हा समोरुन दुसरी रेल्वे गाडी आली असती तर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण या अपघातात आजूबाजूच्या रेल्वे रुळाचंदेखील नुकसान झालं आहे.

भुसावळहून नंदूरबारच्या दिशेला मालगाडी निघाली होती. या दरम्यान अमळनेर स्थानकाजवळ मालगाडीचे पाच ते सहा डब्बे रेल्वे रुळावरुन खाली घसरले. या अपघातामुळे सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती आहे. या अपघातात सुदैवाने लोको पायलट आणि गार्ड सुरक्षितपणे बचावले आहेत. संबंधित घटना ही आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना अमळनेर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर घडली. यामुळे तातडीने घटनास्थळी अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेनंतर तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याची सखोल माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या अपघाताचे फोटो देखील समोर आले आहेत.

या फोटोंमध्ये मालगाडीचे डब्बे अस्ताव्यवस्थ झालेले बघायला मिळाले आहेत. त्यामुळे अपघात किती मोठा होता याचा प्रत्यय येतो. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातानंतर वाहतूक सुरळीत होण्यास बराच विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवासी रेल्वेला देखील याचा फटका बसणार आहे. सुरत-भुसावळ महामार्गाने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या मार्गाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्या प्रचंड गर्दीने भरलेल्या असतात. जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील लाखो नागरीक सुरत येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे दररोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. पण आता अपघातामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. दरम्यान, दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या 52व्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ

0

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

नवी दिल्ली, दि.१५ : राष्ट्रपति भवनात आयोजित एका विशेष समारोहात न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या 52व्या मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून दि.१४ ला सकाळी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या समारोहाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनगड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग,कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना, सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कायदा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. निवृत्त मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाल 13 मे 2025 रोजी संपल्यानंतर न्यायमूर्ति गवई यांनी हे पद त्यांच्याकडून स्वीकारले.

न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. ते प्रसिद्ध राजकारणी, आंबेडकरवादी नेते, माजी खासदार आणि विविध राज्यांचे राज्यपाल राहिलेले रा.सु. गवई यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या कुटुंबाला डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या विचारांचा समृद्ध वारसा आहे आणि ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. न्यायमूर्ति गवई यांनी 1985 मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.ए. एल.एल.बी. पूर्ण करून आपल्या कायदेशीर कारकीर्दीला सुरुवात केली. 1987 मध्ये त्यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली, प्रामुख्याने नागपूर खंडपीठात. 1992-93 मध्ये त्यांनी सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त लोक अभियोजक म्हणून कार्य केले. 2003 मध्ये त्यांची बॉम्बे उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2005 पासून ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. 24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.

न्यायमूर्ति गवई यांची सरन्यायाधीशपदासाठी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठेतेनुसार झाली आहे, सरन्यायाधीस संजीव खन्ना यांच्यानंतर दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 29 एप्रिल 2025 रोजी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती. न्यायमूर्ति गवई यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाल सुमारे सहा महिन्यांचा असेल. ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होतील.

सर्वोच्च न्यायालयात असताना, न्यायमूर्ति गवई यांनी अनेक ऐतिहासिक खटल्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डिसेंबर 2023 मध्ये, त्यांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या 2019 च्या अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वसंमतीने मान्यता दिली. 2016 च्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला बरकरार ठेवणाऱ्या खंडपीठातही त्यांचा समावेश होता. राजकीय निधीसाठीच्या इलेक्टोरल बाँड योजनेला असंवैधानिक ठरवणाऱ्या खंडपीठाचा ते भाग होते. 2024 मध्ये, अवैध बांधकामांविरुद्ध बुलडोजर कारवाईवर देशव्यापी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणाऱ्या खंडपीठात त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. पंजाब राज्य बनाम दविंदर सिंग (2024) खटल्यात, त्यांनी SC/ST साठी क्रीमी लेयर सिद्धांत लागू करण्याची वकिली केली, ज्यामुळे वास्तविक समानता सुनिश्चित होईल. न्यायमूर्ति गवई यांनी 700 हून अधिक खंडपीठांमध्ये सहभाग घेतला आहे आणि सुमारे 300 निर्णयांचे लेखन केले आहे. ज्यामध्ये संवैधानिक, प्रशासकीय, नागरी, फौजदारी आणि पर्यावरणीय कायद्यांचा समावेश आहे.

पंचशील विद्यालयाचा एसएससी परीक्षेत घवघवीत यश*विद्यालयाचा निकाल ९८.१८ टक्के

0

*अर्जुनी मोरगाव:*  पंचशील विद्यालयाने यंदाच्या फेब्रुवारी/मार्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ.१० वी) परीक्षेत घवघवीत यश मिळवत शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शाळेचा एकूण निकाल ९८.१८ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक १३ मे रोजी दुपारी ठीक १ वाजता महाराष्ट्र परीक्षा बोर्डाकडून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला.

या परीक्षेत पंचशील विद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी प्राविण्य, १३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर २२ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली. सुजाता संतोष मंडले या विद्यार्थिनींनी शेकडा गुण ८९.८०, अनिकेत मच्छिंद्र उजवणे ८८.६०, देवयानी दिलीप किरसान ८८.२०, प्रिन्स रंजीत चवरे ८५.८०, देवेश गिरधारी हरदुले ८४.२० तर मयूर माणिक फुंडे या विद्यार्थ्यांनी शेकडा गुण ८४.०० घेतले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

ही कामगिरी शाळेच्या शैक्षणिक उंचीचे द्योतक आहे. संस्थेचे सचिव अशोक रामटेके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदानही त्यांनी गौरवले. शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी चिकाटी, नियमित अभ्यास व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन केले. त्यांच्या यशात पालकांचाही मोलाचा वाटा आहे.” विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संपूर्ण पंचशील विद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण असून भविष्यातही अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास परीक्षा प्रमुख एन पी समर्थ यांनी सर्वांच्या वतीने व्यक्त केले.

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी :केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

0

नवी दिल्ली, 15: छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र अतिशय प्रेरणादायी असून कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही असा बोध मिळतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र सदन येथे सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन, छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती व सांस्कृतिक महोत्सव दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सांयकाळी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली, यावेळी श्री जाधव बोलत होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन केंद्रीय राज्य मंत्री श्री जाधव, जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज शिवाजी जाधवराव, आचार्य श्रीजामोदेकर बाबा, सुदर्शन न्युज चॅनेलचे संचालक डॉ. सुरेश चव्हाण के, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, गायक व संगीतकार डॉ. राजेश सरकटे, शिव व्याख्याते प्रा. रविंद्र बनसोड यांच्यासह संघटेने मान्यवर मंचावर उपस्थित होते.

श्री जाधव पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांना फार थोडे आयुष्य लाभले मात्र, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा चालवीलाच नाही तर तो वाढविण्याचा प्रयत्नही केला. संभाजी महाराज यांच्याच प्रेरणे पुढील काळात मराठयांनी दिल्लीचे तख्त राखलेच नाहीतर ते चालविले सुद्धा, असे ही जाधव यावेळी म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराज यांचे अष्टपैलू असे व्यक्तीमत्व होते. ते जितके मोठे योध्दा होते, तितकेच त्यांना साहित्यातही रस होता. भाषाप्रेमीही होते. त्यांच्या या गुणांचे अनुसरन सर्वांनी केल्यास त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे श्री जाधव म्हणाले.

महाराष्ट्र सदनात सायंकाळी हितेश पटोळे यांनी तयार केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळाचे पूजन व अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमातही छत्रपती संभाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयाचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या मान्यवरांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रा. राजेश सरकटे यांचा ‘गर्जा महाराष्ट्र’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला, ज्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रा. डॉ. प्रभाकर जाधव यांच्या ‘मराठा दुरिझम’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. व्याख्याते प्रा. रवींद्र बनसोड यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर ओजस्वी व्याख्यान दिले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जयंती महोत्सव अध्यक्ष व छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. विलास पांगारकर, छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, भारत क्रांती मिशनचे मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील, सरचिटणीस परमेश्वर नलावडे, स्वागत अध्यक्ष इंजि. तानाजी हुस्सेकर, प्रा. श्री. राजेश सरकटे, विनोद सरकटे, अक्षय ताठे, सतीष जगताप आणि अमोल टकले यांनी केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी झाला.

सालेकसा तालुक्यातील अनेक शिवसैनिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

0

सालेकसा– राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे सालेकसा तालुका शिवसेना (शिंदे गट) अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर व विकासवादी धोरणांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी पक्षाचा दुपट्टा वापरून डॉ हिरालाल साठवणे, जिल्हा समन्वयक शिवसेना, श्री बाजीराव तरोणे ओबीसी आघाडी शिवसेना, श्री किसन रहांगडाले तालुका संयोजक शिवसेना, श्री सुरेश कुंभरे अध्यक्ष संघर्ष वाहन चालक, श्री झनकसिंग नागपुरे संघटक वाहतूक संघटना, श्री सोनू दसरीया विभाग प्रमुख शिवसेना यांचा अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या व सालेकसा तालुक्यात पक्ष संघटन मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, डॉ अजय उमाटे, बृजभूषण बैस, राजू एन जैन, नानू मुदलियार, केतन तुरकर, सोमेश रहांगडाले, पदमलाल चौरीवार, शैलेश वासनिक, रौनक ठाकूर सह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

ढाई वर्ष की मरयम नवाज मोतीवाला को इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स ने स्वर्ण पदक से नवाजा

0

चित्रा कापसे
तिरोडा–स्थानीय निवासी नवाज मोतीवाला और मुस्कान मोतीवाला की ढाई वर्ष की बेटी मरयम को इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स 2025 द्वारा अर्ली लर्निंग स्किल्स के मापदंडों पर आयबीआर अचीवर्स के रूप में गोल्ड मेडल दिया गया है।
इस प्रतियोगिता के लिए मरयम के पालकों द्वारा इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स को मरयम के अलग अलग 10 विडियोज भेजे गए थे जिनमें ढाई वर्ष के बच्चों की सामान्य क्षमता से अधिक बौद्धिक मानसिक और शारीरिक विकास के मापदंडों के आधार पर मरयम का चयन किया गया। जिसके बाद मरयम को स्वर्ण पदक के लिए चुना गया। पुरस्कार के रूप में मरयम को एक स्वर्ण पदक, पहचानपत्र और एक प्रमाणपत्र बहाल किया गया है।
मरयम के दादा फारूकभाई मोतीवाला और दादी रुबीना मोतीवाला ने बताया कि मात्र ढाई वर्ष की मरयम अभी प्ले हाउस में पढ़ रही है और अपनी उम्र की तुलना में बहुत अधिक एक्टिव है। इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स द्वारा मरयम को स्वर्ण पदक दिए जाने से मरियम के परिवार में अत्यंत खुशी का माहौल है। और शहर के सभी परिचितों की ओर से मरियम का अभिनंदन किया जा रहा है।

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय-प्रकल्प अधिकारी निरज मोरे

0

*खापा आश्रम शाळेत समर कॅम्प संपन्न*
तुमसर-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा खापा (खुर्द) तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथे इयत्ता चौथी ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच शारीरिक मानसिक व सुप्त गुणांना वाव देणे हेच आमचे ध्येय आहे,
शासकीय आश्रमशाळा खापा येथे समर कॅम्प दिनांक 24 /4 /2025 ते 13 5/2025 या कालावधीत निवासी स्वरूपाचे विशेष शिकवणी वर्ग आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
आदिवासी विकास विभाग नागपूर च्या अप्पर आयुक्त आयुषी सिंह व प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सदर विशेष शिकवणी वर्गाचे व उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात एकूण 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सकाळी सहा ते सातच्या दरम्यान शारीरिक व्यायाम, ज्ञानसाधना, योगा ,सकाळी नऊ ते 11 दरम्यान शिकवणी वर्ग ,दुपारी एक ते तीन च्या दरम्यान व्यक्तिमत्त्व विकास, चित्रकला, गोंडी पेंटिंग, वारली पेंटिंग ,इत्यादी. टाकाऊ पासून टिकाऊ पदार्थ तयार करणे, मातीकाम ,दुपारी चार ते सहा बॉक्सिंग, कराटे, खेळ व मनोरंजन अभिनय इत्यादी. तसेच सायंकाळी आठ ते नऊच्या दरम्यान संगीत कराओके गायन ,संस्कृती कार्यक्रम इत्यादी विषयक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले
उन्हाळी शिबिरात आम्हाला खूप मजा आली घरची आठवण आली नाही आम्ही घरी असतो तर आम्हाला काहीच शिकायला मिळाले नसते असे मनोगत कुमारी नव्या सर्याम आणि इनवाते यांनी व्यक्त केले, उत्कृष्ट कलाकृती करिता विद्यार्थ्यांमधून प्रथम तीन क्रमांकात दिव्या धूर्वे, कृतिका धूर्वे,अक्षरा धूर्वे आणि विद्या कुंभरे व शरद कंगाली यांना प्रोत्साहन बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले, समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी नीरज मोरे होते तर शाळेचे मुख्याध्यापक सुनील संतोषवार ,उपसरपंच रामचंद्र करमरकर, पालक तथा शाळा व्यवस्थापन समिती चेअध्यक्ष शामलता सलामे ,उपाध्यक्ष निलू मरसकोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती, सदर समारोपदरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेले कलाकृती प्रदर्शनी बघून मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपल्या पाल्यांनी तयार केलेल्या कलाकृती व साहित्य पालकांनी प्रत्यक्ष बघितले व आपल्या पाल्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी कुमारी सलोनी मरकाम व निशा गजाम यांनी केले तर मुख्याध्यापक सुनील संतोषवार यांनी प्रास्ताविक मांडले तर कृतिका धुर्वे यांनी मान्यवरांचे आभार मानले प्रशिक्षक म्हणून नितेश राऊत, पुणेसर बावणे, मयूर नागमोते ,श्रीधर सावंतवान ,रेखा सूर्यवंशी ,मनोज उईके यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले सदर शिबिर आयोजनाबाबत प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांना विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले सदर समारोप कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बॅग देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यापीठ माजी विद्यार्थी समितीच्या माध्यमातून परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार

0
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्यासह आता रोजगार प्राप्त होणार आहे. माजी विद्यार्थी समितीच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत मंगळवार, दि. १३ मे २०२५ रोजी सामंजस्य करार (MoU) केला आहे. माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी परम ग्रुपचे प्रकल्प प्रमुख श्री गणेश पवार यांच्या समवेत एमओयूचे हस्तांतरण केले.‌
जमनालाल बजाज प्रशासकीय भावनातील सभाकक्षात आयोजित कार्यक्रमाला प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, आयआयएल प्रभारी संचालक डॉ. निशिकांत राऊत, शिक्षण मंचच्या अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे, शिक्षण मंचचे महामंत्री डॉ. सतीश चाफले, माजी विद्यार्थी समितीचे डॉ. पांडुरंग डांगे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगेश भुते, डॉक्टर देवराम नंदनवार, अधिसभा सदस्य डॉ. रतिराम चौधरी, डॉ. आशिष टिपले, डॉ. अनंत पांडे, डॉ. नितीन माथनकर, परम ग्रुपचे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर श्री. सचिन शिंदे व विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांची उपस्थिती होती. प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार तसेच स्वयंरोजगार प्राप्त व्हावा याकरिता कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. रोजगार नसलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करून नामांकित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न परम स्किल ट्रेनिंग इंडिया कडून केला जाणार आहे. पुढील ५ वर्षात नवीन विद्यार्थ्यांना रोजगारयुक्त निःशुल्क कौशल्य प्राप्त करून देत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्योगांमध्ये परम स्किल ट्रेनिंग इंडिया कडून रोजगार मिळवून दिला जाणार आहे. प्राथमिक टप्प्यात विद्यापीठ शैक्षणिक परिसरासह नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण ७ ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहेत. यानंतर वर्धा, भंडारा व गोंदिया येथे देखील परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहेत. बारावी ते पदवी मधील कोणत्याही शाखेच्या, कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यास याकरिता निःशुल्क प्रवेश मिळणार आहे. यामध्ये ३ महिन्यांचे कौशल्य अभ्यासक्रम शिकविले जाणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्योगांमध्ये १०० टक्के रोजगार-स्वयंरोजगार प्राप्त करून दिला जाणार असल्याचे परम ग्रुपचे प्रकल्प संचालक श्री. गणेश पवार यांनी सांगितले. प्रथम टप्प्यात मल्टी स्किल टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने डेटा सायन्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नर्सिंग असे आजच्या युगात नोकरीसाठी उपयुक्त अभ्यासक्रम राबवून विद्यार्थ्यांना सामंजस्य कराराच्या माध्यमातून रोजगार प्राप्त करून दिला जाणार आहे.

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त श्वेता सिंघल

0
विभागीय लोकशाही दिनात 31 प्रकरणांवर सुनावणी
अमरावती, दि. 14 : लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित अर्जदारांना कळविणे प्रशासनाचे काम आहे. विभागीय लोकशाही दिनासाठी दाखल झालेल्या प्रकरणांसंबंधी मुद्देनिहाय चौकशी, तपासणी करुन तत्काळ निराकरण करावे, तक्रार अयोग्य असल्यास तसे अर्जदारास कळवावे. मागील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनी येवू नये, याची संबंधित विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी आज येथे दिले.
यावेळी विभागीय लोकशाही दिनात दाखल एकूण 31 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार सहा प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर उर्वरित प्रकरणांवर पंधरा दिवसांत आवश्यक कार्यवाही करुन अंतीम अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीमती सिंघल यांनी संबंधित विभागाला दिल्या.
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, उपायुक्त अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजू फडके, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह पोलीस, महापालिका, महसूल, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी बैठकीला उपस्थित होते.
विभागीय लोकशाही दिनासाठी सामान्य प्रशासन विभागाव्दारे सादर करण्यात आलेल्या 12 स्वीकृत अर्जांपैकी दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच 19 अस्वीकृत अर्जांपैकी 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण 31 अर्जांवर सविस्तर चर्चा आजच्या विभागीय लोकशाही दिनात झाली.
लोकशाही दिनासाठी विभागातून उपस्थित राहिलेल्या तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करुन अंतिम अहवाल तत्काळ सादर करण्यात यावा. तक्रार अयोग्य असल्यास खारिज करुन संबंधितांना कळविण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी संबंधितांना दिले. मागील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनात सुनावणीसाठी येवू नये. लोकशाही दिनासाठी दाखल केलेल्या तक्रार अर्जांवर वेळेत कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

राज्यातील 49 शाळांचा शून्य निकाल

0

मुंबई — महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्‍या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 94.10 टक्के इतका लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.71 टक्क्यांनी घटला आहे. लातूर पॅटर्नची पोलखोल झाली असून दहा शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. राज्यात अशा 49 शाळांना भोपळा फोडता आला नाही.यंदा एकूण 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

यंदाच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याने 99.32 गुणांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे, तर सर्वात कमा निकाल हा गडचिरोरील जिल्ह्यात आहे. 82.67 टक्के निकाल या जिल्ह्याचा आहे. याशिवाय राज्यातील 49 शाळांमधील निकाल हा शून्य टक्के राहिला आहे. ही एक चिंता वाढवणारी बाब आहे. तसेच 285 विद्यार्थी हे काटावर पास झाले आहेत. म्हणजेच या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत 35 टक्के गुण मिळाले आहेत.

दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 14 लाख 68 हजार 582 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पहाता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.

35 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
मुंबई: 67 विद्यार्थी
नागपूर: 63 विद्यार्थी
पुणे: 59 विद्यार्थी
संभाजी नगर: 28 विद्यार्थी
अमरावती: 28 विद्यार्थी
लातूर: 18 विद्यार्थी
कोल्हापूर: 13 विद्यार्थी
नाशिक: 9 विद्यार्थी
कोकण: 0 विद्यार्थी
49 शाळांचा निकाल शून्य टक्के आहे, त्या शाळा खालीलप्रमाणे
>लातूर: 10 शाळा

संभाजी नगर: 9 शाळा
नागपूर: 8 शाळा
पुणे: 7 शाळा
मुंबई: 5 शाळा
अमरावती: 4 शाळा
नाशिक: 4 शाळा
कोल्हापूर: 1 शाळा
कोकण: 1 शाळा

पुणे जिल्ह्याने निकालांत 97.26 टक्के मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे. तर दुसरीकडे पुण्यातील ७ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. तर पुणे विभागात 59 विद्यार्थ्यांना केवळ 35 टक्के गुण मिळाले आहेत.