
वाशिम (जिमाका) दि. २3 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य शासनाचावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ३ मार्च २०२१ पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखेत विनामुल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२० नियमावली व प्रवेशिका’ या शिर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.
प्रवेशिका पूर्णतः भरून आवश्यक साहित्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात ३ मार्च २०२१ पर्यंत सादर करावी. लेखक अथवा प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करून शकतात. लेखक, प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर अथवा पाकिटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२० साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ३ मार्च २०२१ राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.