बीड,दि-2 – जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळवले आहे. माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्त्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने यश मिळवल्याने भाजपला धक्का बसला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना यानिमित्ताने शह दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीडमधील जनतेने सहानभूतीच्या राजकारणाला मुठमाती दिली असून या पुढे विकासाचे राजकारण करा असा संदेश दिला आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे