नागपूर,दि.०७– देशात निश्चितपणे जातनिहाय जनगणना होणार असून या प्रक्रियेतून दलित, इतर मागासवर्ग आणि आदिवासींवर होत असलेला अन्याय उघड होईल, असे राहुल गांधी म्हणाले. नागपुरात संविधान सन्मान परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, जात जनगणनेने सर्व काही स्पष्ट होईल. त्यांच्याकडे किती शक्ती आहे आणि त्यांची भूमिका काय आहे हे प्रत्येकाला कळेल आम्ही 50 टक्के (आरक्षण मर्यादा) देखील मोडून लावू” व सर्वांना संंधी उपलब्ध करुन देत ९० टक्के उपेक्षित लोकांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही सुध्दा त्यांनी यावेळी दिली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रथम दीक्षाभूमीवर पोहोचले जेथे बाबा साहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. येथे राहुल गांधी यांनी आंबेडकरांना आदरांजली वाहिली. यानंतर ते संविधान परिषदेला संबोधित करण्यासाठी आले होते. राहुल यांनी लोकसभा निवडणुकीत ‘संविधान धोक्यात आहे’ अशी मांडणी केली होती, ज्याचा फायदा भारतीय आघाडीला निवडणुकीत झाला. आजही राहुल गांधी यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट हल्लाबोल केला .
राहुल गांधी म्हणाले की, “जातीय जणगणनेतून सगळं काही स्पष्ट होईल. देशातील प्रत्येक गरिब व्यक्तीला आपल्या हातात किती ताकद आहे, हे कळेल. ज्याप्रमाणे संविधान हे केवळ पुस्तक नसून जगण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे जातीय जणगणना ही एक विकासाची पद्धत आहे.” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना हा केवळ ग्रंथ नसून जीवनपद्धती आहे, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते म्हणाले की जेव्हा आरएसएस आणि भाजपचे लोक संविधानावर “हल्ला” करतात तेव्हा ते देशाच्या आवाजावर हल्ला करतात.असे ते म्हणाले.
“काहीही झालं तरी जातीय जणगणना होणार आहे.
जातीय जनगणना होणार आणि ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडली जाणार, हे देशातील जनतेने निश्चित केलं आहे. जातीय जणगणनेमुळे संविधान सुरक्षित राहिल. आपल्यासोबत कोणता अन्याय होतोय हे जेव्हा जनतेला कळेल तेव्हा ते संविधानाचं पुस्तक हातात घेतील. या देशात दररोज ९० टक्के लोकांसोबत अन्याय होतोय. त्याच्याविरोधात आम्ही सगळे लढा देत आहोत. यातील जातीय जणगणना आणि ५० टक्के आरक्षणाची भिंत या दोन पहिल्या पायऱ्या आहेत,” असेही ते म्हणाले.



