गोंदिया : महाराष्ट्रात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असताना, कोणाचे फोटो कोणासोबत आहेत, यावरून एखादी व्यक्ती दोषी ठरत नाही; मात्र तपासातून जे सत्य समोर येईल, त्यानुसार योग्य कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली.ते आज (दि. २० मार्च) गोंदिया येथे माध्यमांशी बोलत होते.
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर या प्रकरणाने वेग घेतला आहे.या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद अधिकच चिघळला आहे. या व्हिडिओंमध्ये त्या अशोक खरात यांच्यासोबत दिसत असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. या संदर्भात गोंदिया येथे माध्यमांशी संवाद साधताना खासदार पटेल म्हणाले, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा विविध लोकांशी संपर्क येत असतो. समाजात वावरताना अनेकांसोबत उठबस होते; मात्र कोणाचे नाव अशा प्रकरणांमध्ये येणे हे निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री सुमित्रा पवारांसोबत चर्चा करून पुढील निर्णय
या प्रकरणात कोणाचाही दोष सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, या संदर्भात पक्षातील इतरही वरिष्ठ नेत्यांसोबतच उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि कोणालाही वाचवले जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला.
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर या प्रकरणाने वेग घेतला आहे.या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद अधिकच चिघळला आहे. या व्हिडिओंमध्ये त्या अशोक खरात यांच्यासोबत दिसत असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. या संदर्भात गोंदिया येथे माध्यमांशी संवाद साधताना खासदार पटेल म्हणाले, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा विविध लोकांशी संपर्क येत असतो. समाजात वावरताना अनेकांसोबत उठबस होते; मात्र कोणाचे नाव अशा प्रकरणांमध्ये येणे हे निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री सुमित्रा पवारांसोबत चर्चा करून पुढील निर्णय
या प्रकरणात कोणाचाही दोष सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, या संदर्भात पक्षातील इतरही वरिष्ठ नेत्यांसोबतच उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि कोणालाही वाचवले जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला.





