प्रतापगड यात्रेचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

0
19

अर्जुनी मोर,दि.27ः-तालुक्यातील ऐतीहासीक प्रतापगड येथील महाशिवरात्रीच्या पर्वावर भरणार्‍या यात्रेत येणार्‍या लाखो भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासनातर्फे ठोस पाऊले उचलली जात आहेत. भावीकांच्या सुविधेत कसलीही उणीव राहू नये यासाठी प्रशासनातर्फे सर्व सोयी पुरविल्या जातात. या संदर्भात या विभागाचे आमदार व राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी २४ फेब्रुवारी रोजी प्रतापगड येथील भक्त निवासात आढावा बैठक घेतली व विविध विभागाच्या अधिकार्‍यांना सोयी पुरविण्यासंदर्भात निर्देश दिले.
४ मार्च पासून सुरू होणार्‍या महादेवाच्या महाशिवरात्रीची यात्रा आणि ख्वाजा हारूनी उर्सच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या व्यवस्थापन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मीक उपवनसंरक्षक युवराज, नियोजन अधिकारी धुत मॅडम, कार्यकारी अधिकारी वैरागकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे,सभापती अरविंद शिवणकर, गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमाईवार, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, तहसीलदार धनंजय देशमुख, जि.प. सदस्या तेजुकला गहाणे, , सरपच अहिल्याबाई वालदे, रघुनाथ लांजेवार, एस.एस. बन्सोडे, वनपरिक्षेत्राधिकारी सी.पी. रहांगडाले, उपविभागीय अभियंता विजय सोनुने, विज विभागाचे उपविभागीय अभियंता शहारे, केशोरी ठाणेदार जाधव, ठाणेदार कुंभरे, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभि. पी.आर. टाकसाडे, भोजराज लोगडे, पं.स. सदस्य रामलाल मुंगणकर आदी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ना. राजकुमार बडोले म्हणाले की, प्रतापगड येथील महादेवाची महाशिवरात्रीची यात्रा व मुस्लीम बांधवाच्या उर्स शरीफा या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश व छत्तीसगड येथून लाखोच्या संख्येत भाविक येतात येणार्‍या भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणीव आंगोळीसाठी पाणी अशी व्यवस्था पाणी पुरवठा व पाटबंधारे विभागाने करावी, आरोग्य विभागाने पाणी निर्जुंतीकरणासाठी विशेष पाऊले उचलावी, बांधकाम विभागाचे रस्त्यांची डागडूजी करून भाविकांना त्रास होणार नाही याची तसवी घ्यावी, हजारोंच्या संख्येनी वाहन येतात त्याची पार्कींगची व्यवस्था करावी, घाणी प्रदूषण होणार नाही ही खबरदारी घ्यावी, हा भाग नक्षल प्रभावित असल्याने भाविकांची सुरक्षा, शांतात व सुव्यवस्था काटेकोरपणे पाळली जावी अशा सुचना व निर्देश पोलिस विभागाला दिले. मोठय़ा प्रमाणात महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होतो. त्या महाप्रसादाची व भंडाराची तपासणी करूनच भाविकांना महाप्रसाद द्यावे, अशा सुचना आरोग्य विभागाला दिले.
यात्रा परिसरातील गावातील दारूबंदी करावी, विज विभागाने २४ तास विज पुरवठा सुरू ठेवावा जर विज पुरवठा खंडीत झाला तर जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश ही ना. बडोले यांनी दिले. भाविकांना येण्या-जाण्यासाठी बसेसची व्यवस्था आगार प्रमुखांनी करावी, यात्रे दरम्यान काही अनुचित प्रकारावर आळा घालण्यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तथा यात्रास्थळची सुटींग करण्यात यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या. तसेच ताजूरत्या शौचालयाची व्यवस्थाही करण्यात यावी. यावेळी विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी आप-आपल्या विभागाच्या आढावा सादर केला. प्रास्ताविक गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमाईवार, संचालन राजु वलथरे यांनी केले. तर आभार सहा. गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड यांनी मानले. आढावा बैठकीला अधिकारी, कर्मचारी व स्थानिक ग्रा.पं. पदाधिकारी तथा गावकरी उपस्थित होते