गोंदिया,दि.18ः केंंद्रातील भाजप सरकारच्या वतीने सातत्याने सर्वसामान्यांची कोंडी केली जात आहे. मागील सहा महिन्यांपासून घरगुती वापरात येणाNया गॅस सिलिंडरच्या किमतीत सतत दरवाढ केली जात असल्याने त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवेदन सादर करुन निषेध नोंदविण्यात आला आहे.निवेदन देतांना विनोद हरिणखेडे,राजेश कापसे,अशोक शहारे,मनोहर वालदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्यातल्यात्यात एकाच दिवशी गॅस सिलिंडरच्या विंâमतीत १४५ रूपयांची दरवाढ करून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या प्रकाराला घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाNयांना
जिल्हाधिकाNयांमार्पâत राष्ट्रपतींना निवेदन सादर करून दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली. वेंâद्रातील भाजप सरकार अफलातून निर्णयामुळे महागाई वाढली आहे. महागाई आटोक्यात
आणण्याऐवजी सर्वसामान्यांना उपयोगी येणाNया जीवनोपयोगी वस्तूंच्या किमतीत दरवाढ केली जात आहे. या प्रकारामुळे जनतेचे हाल होत आहे. सर्वसामान्य गरीब नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
मागील सहा महिन्यांपासून घरगुती वापरात येणारे गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढत आहेत.





