ट्रकने पाच मजुरांना चिरडले, दोन ठार

0
76

चंद्रपूर- घुग्घुस – वणी राज्य महामार्ग क्रमांक ७ वरील पुनवट गावाजवळ बुधवारी सायंकाळी चार वाजताचा सुमारास भीषण अपघात घडला. घुग्घुसपासून अवघ्या पाच कि.मी. अंतररावर घडलेल्या अपघातात भरधाव ट्रकने व्हीआरसीएल कंपनीच्या चार मजुरांना चिरडले. महादेव बालवटकर (बेलोरा), राजू मिलमिले (मारेगाव) असे मृतकांची नावे आहेत. सुरेश जुनघरी, सतीश गेडाम आणि एक मजूर गंभीररीत्या जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.
प्राप्त माहीतीनुसार, घुग्घुस – वणी मार्गावर आयव्हीआरसीएल या कंपनीच्या मार्गाचे डागडुजीचे काम सुरू होते. ते ट्रॅक्टर आणि पिकअपने माल वाहतूक करीत होते. यावेळी वणी येथून येणार्‍या भरधाव ट्रकने ( एमएच ३१ एफसी ६३९९ ) पाच मजुरांना चिरडले. यात बेलोरा आणि मारेगाव येथील मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तीन मजूर गंभीररीत्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वणी तालुक्यातील सिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन तरवडे यांनी घटनास्थळ गाठले. जखमीना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मागील काही महिन्यात या मार्गावर लहान-मोठय़ा अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.