
खामगाव,दि.२७ः पहिली,दुसरीत शिकणारी मुलं म्हणजेच मुक्त स्वभावाची.त्यांच्याकडून परिणामकारक शिकणं घडून यावं असं प्रत्येक शिक्षकाला वाटतं.आपण जणू काही खेळतंच आहोत असं जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा ते एकरुप होऊन दिलेल्या कार्यात आनंदाने सहभागी होतातच यात तिळमात्र शंका नाही.जेव्हा विद्यार्थी आनंदी असतो तेव्हा घडणारं अध्ययन खूपच परिणामकारक होत असते याचं शास्त्रीय कारण म्हणजे विद्यार्थी शिकण्यासाठी पंचज्ञानेंद्रियांसह शिकण्यासाठी तयार झालेला असतो.विद्यार्थ्यांना शिकण्यात रममाण करणे हेच कोणत्याही शिक्षकाला अभिप्रेत असते आणि हीच किमया घडवून आणली ती खामगाव तालुक्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजेश वासुदेव कोगदे यांनी.
कोरोना काळामध्ये तर कोगदे गुरुजींनी घरोघरी जाऊन या पद्धतीने केवळ एक ते दीड महिन्यात इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना वाचन करायला शिकविले.ही पद्धती तेव्हा महाराष्ट्रात खूप शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांकरिता वापरली आणि आजही वापरत आहेत.
सविस्तर माहिती पहा
या पद्धतीचे फायदे जाणून घेऊया
या पद्धतीने वर्गातील सर्वच विद्यार्थी वाचन करायला शिकतात.
विशेष म्हणजे विद्यार्थी श्रुतलेखन अचूक व आत्मविश्वासाने करतात.
पंचज्ञानेंद्रियांचा वापर होत असल्याने एकाच महिन्यात विद्यार्थी वाचन शिकतात.
विद्यार्थ्यांना शिकण्यातून आनंद मिळतो व त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.
एकंदरीत सगळं शिकणंचं आनंददायी बनते.
एक मात्रा,काना दोन मात्रा,दोन मात्रा,काना एक मात्रा ह्यामध्ये मुलांची परंपरागत पद्धतीने खूपच गफलत होते, परंतु,या पद्धतीने एकही विद्यार्थी गोंधळ न करता अचूक वाचन शिकतो.
राजेश कोगदे शिक्षक
जि प म उच्च प्राथमिक शाळा कदमापूर ता -खामगाव जि-बुलढाणा