गुडेनूरवासियांनी नाल्यावर केला बांबूचा पूल

0
8

आलापल्ली(सुचित जम्बोजवार),दि.12 : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसर अजूनही विकासाच्या कोसो दूर असल्याचे चित्र अद्यापही जाणवते. बिनागुंडाला भेट देण्यासाठी जात असतांना गुडेनूर गावाजवळ एका नाला पडतो. या नाल्यावर अजूनपर्यंत शासन प्रशासनातर्फे पुलाचे बांधकाम करण्यात आलेल नसल्यामुळे नागरीकांनी मोठ्या शिताफीने बांबूपासून पारंपारिक पद्धतील पुल बांधून या मार्गावरुन प्रवास करीत असल्याचे हे बोलके चित्र. एकीकडे शासन ‘अच्छे दिन’च्या वल्गना देत असतांना जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासीबहूल नागरीक स्वातंत्र्यांच्या ७० वर्षानंतरही विकासाच्या मुख्य प्रवाहात अजूनही सामील झाले नसल्याचे यावून स्पष्ट होत आहे.