पाण्यावरून दोन गावांत तुंबळ मारामारी

0
7

नाथाचीपाग व तामकणेतील 16 जण जखमी; सहा जण गंभीर 

पाटण – उभ्या महाराष्ट्रात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याचे चित्र असताना आता पाण्यासाठी मारामारी होण्याचे प्रकार सुद्धा घडत असल्याच्या बातम्या यायला सुरवात झाली आहे. पिण्याचे पाणी पळवून नेण्याच्या कारणावरून नाथाचीपाग व तामकणे या दोन गावांतील ग्रामस्थांत तुंबळ मारामारीत झाली. परिणामी, 16 जण जखमी असून सहा जण गंभीर आहेत. जखमींना उपचारासाठी कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. अन्य किरकोळ जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.