दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

0
2

मुंबई, दि. 27 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये  मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

➡️ बुलढाणा –  ५८.४५ टक्के

➡️ अकोला – ५८.०९ टक्के

➡️ अमरावती – ६०.७४ टक्के

➡️ वर्धा – ६२.६५ टक्के

➡️ यवतमाळ – वाशिम – ५७.०० टक्के.

➡️ हिंगोली –  ६०.७९ टक्के

➡️ नांदेड –  ५९.५७ टक्के

➡️ परभणी – ६०.०९ टक्के