नागपूर दि.२० : कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी निर्धार व्यक्त केला आहे.“आम्ही सरकारमध्ये असलो, तरी बाहेर आंदोलन सुरु राहिल. किंबहुना, कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही.”महायुतीच्या सरकारमधील मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा असताना, खासदार राजू शे शेट्टींनी नागपुरात आंदोलन केले.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला विरोध करणाऱ्या एसबीआयच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या वक्तव्यानंतर आता खासदार राजू शेट्टी त्यांच्या विरुद्ध मैदानात उतरले आहेत. भट्टाचार्य यांचे वक्तव्याचा निषेध करत राजू शेट्टींनी नागपुरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले.शिवाय अरुंधती भट्टाचार्य यांचा पुतळाही जाळला.