बंगलोर(वृत्तसंस्था)दि.18ः – एकीकडे देशात कोरोना विषाणूचे थैमान तर दुसरीकडे मध्य प्रदेशात राजकीय थैमान.कमलनाथ सरकार पडणार का स्थिर राहणार ? अशी बिकट परिस्थती होईल याची काही झलक आज बघायला शिवराजसिंह चौहान यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेत आहे. कमलनाथ सरकार लवकरच बहुमताची चाचणी घ्यावी, अशी विनंती भाजप नेत्यांनी कोर्टात केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री कमलनाथ आणि राज्यपाल लालजी टंडन यांच्यात मध्य प्रदेशात पत्रांची देवाणघेवाण सुरू आहे. अशा परिस्थितीत आमदार कोणच्या बाजूला बसतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तर मध्य प्रदेशच्या राजकीय नाटकाचा परिणाम बेंगळुरूमध्ये दिसून आला कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशिवाय डीके शिवकुमार यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व नेते बंगळुरू रिसॉर्टजवळ धरणावर बसले होते. ते कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना बेंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले असून दिग्विजय सिंह यांनी पोलिस ठाण्यातच उपोषण सुरू केले आहे. लोकशाहीची हत्या केली जात असून त्यांना आमदारांना भेटू दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.





