भाजपचा सामना करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज-पवार

0
7

अहमदाबाद दि.20 – समान विचारसरणीच्या पक्षांनी भाजपचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी यावेळी योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ‘मंदिर-मस्जीद’ राजकारणाला सुरुवात होणार असल्याची टीकाही केली.आपल्या कमतरतेवर भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांना लक्ष देणे गरजेचे आहे. भाजपला जे यश विधानसभा निवडणुकीत मिळाले आहे ते पाहता भाजपचा सामना करण्यासाठी समविचारी राजकीय पक्षांना एकत्र येण्याची आवश्यकता शरद पवार यांनी बोलून दाखविली. मात्र याबाबत काही पावले उचलण्यात आली आहेत का असे विचारले असता याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले.