औरगांबादेत निघाला राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा

0
15

औरंगाबाद,दि.03(विशेष प्रतिनिधी)– राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे. क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून विभागीय कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. तिथे मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. येथे शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.औरगांबादेत एवढा मोठा विशालकाय मोर्चा निघालेला नव्हता अशा मोर्चा निघालेला आहे.यात विद्यार्थी,विद्यार्थिीनीसह महिला शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.हल्लाबोल मोर्चाच्या सुरुवातील शेतकरी आत्महत्येचा जिवंत देखावा करण्यात आला आहे. क्रांतीचौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चा पैठणगेट, सिटी चौक, शहागंज मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचणार आहे. मोर्चामध्ये महिला आणि मुलींची संख्या लक्षणीय आहे. त्यासोबतच संपूर्ण मराठवाड्यातून कार्यकर्ते आले आहेत.