यापुढे एकटेच लढणार आणि जिंकणार! उद्धव ठाकरे

0
5

औरंगाबाद –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला. यापुढे प्रत्येक निवडणुकीत एकटेच लढणार आणि निवडणूक जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शरद सहकारी साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.
25 वर्ष भाजपला सांभाळले. प्रत्येक वेळी मदत केली. मात्र आता एकटेच लढणार आणि एकटेच विजयी होणार आहोत. नुकसान कोणाचे होणार हे कळलेच. घरात घुसायला लागलात. आता सोडणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
शिवसेनेने राज्यात सर्वात अगोदर  शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेतकरी हा विषय शहरात मांडला. कारण शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याला कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेचे आहे. जी काही शेतकऱ्यांना मदत मिळाली. ती शिवसेनेमुळेच मिळाली असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.