भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदाराचा मृत्यू:राहुल गांधीसोबत चालत असताना हृदयविकाराचा झटका

0
37

लुधियाना-पंजाबमध्ये सुरू असलेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जालंधरचे काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी यांचे निधन झाले. ते राहुल गांधी यांच्यासमवेत यात्रेत चालत होते.दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तात्काळ फगवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली, असे डॉक्टरांनी सांगितले. तर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

कोण आहेत संतोखसिंह चौधरी

हा फोटो खासदार संतोख सिंह चौधरी यांचा आहे. ते जालंधरचे विद्यमान खासदार होते. 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. याआधी त्यांनी 2014 मध्ये विजय मिळवला होता.
हा फोटो खासदार संतोख सिंह चौधरी यांचा आहे. ते जालंधरचे विद्यमान खासदार होते. 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. याआधी त्यांनी 2014 मध्ये विजय मिळवला होता.

तामिळनाडूच्या खासदारांना म्हणाले- ज्योती हाऊ आर यू- अन् खाली कोसळले

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर राजा वडिंग यांनी सांगितले की, चौधरी संतोखसिंह सकाळी पूर्णपणे चांगले होते. ते स्वतः स्टेजवर घोषणा देत होते. मी त्यांचा हात धरून त्यांना मंचावर आणले होते. ते राहुल गांधीसमवेत निघाले. त्यावेळी तामिळनाडूच्या खासदार ज्योती या देखील त्यावेळी उपस्थित होत्या. संतोखसिंह चौधरी तेव्हा ज्योती यांना बोलत होते, म्हणाले ज्योती हाऊ आर यू आणि तेवढ्यातच ते खाली कोसळले. याबाबत डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

भारत जोडो यात्रेतील त्यांचे फोटो पाहा

भारत जोडो यात्रा काही काळासाठी थांबवली

या घटनेनंतर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी भारत जोडो यात्रा काही काळासाठी थांबवली आहे. ही यात्रा आज लुधियानाच्या लाडोवाल टोल प्लाझा येथून फगवाड्याच्या दिशेने निघाली होती. त्यादरम्यान ही घटना सकाळी घडली. सकाळी 8.45 च्या सुमारास खासदार संतोखसिंह यांची प्रकृती खालावली. त्यानंतर राहुल गांधीही त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. संतोखसिंह चौधरी हे 76 वर्षांचे होते.

सकाळी 9 वाजेपर्यंत राहुल गांधींनी फिल्लौरमधील भटियानपर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. यात्रा टी-ब्रेकसाठी थांबवण्यात आली. टी-ब्रेकसाठी थांबलेले राहुल गांधी काही मिनिटे बसल्यानंतर ते काही काँग्रेस नेत्यांसह कारमध्ये निघून गेले. फिल्लौरच्या भटियान येथील नंबरदार प्रभज्योतसिंग यांच्या घराबाहेर ही यात्रा सद्या थांबविण्यात आली आहे.

राहुल गांधींच्या सुरक्षेत वाढ

दरम्यान, राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. लाडावळे येथे काही काँग्रेस समर्थकांनी राहुल गांधी यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना दूर राहण्यास सांगितले. दोन दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राजा वॉर्डिंग यांना राहुल गांधींच्या सुरक्षेची झळ बसली होती. राहुलला भेटायला ते कुठल्यातरी नेत्याला घेऊन जात होते. सध्या माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, खासदार गुरजित औजला, अमरिंदर सिंग राजा वाडिंग असे काही ज्येष्ठ काँग्रेस नेते त्यांच्याभोवती धावत आहेत.

  • पीएम नरेंद्र मोदी यांनी संतोषसिंह चौधरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. म्हणाले की- ते पंजाबच्या लोकांच्या समस्या व त्यांच्या सेवेसाठी आग्रही होते. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे भगवंत बळ देवो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
  • राहुल गांधी जालंदरमधील फुटबॉल चौकालगत असलेल्या संतोषसिंह चौधरी यांच्या घरी पोहोचले. कुटुंबीयांनी त्यांनी संवाद साधला. अचानक झालेल्या निधनामुळे मी निशब्द झालो आहे. जमिनीशी नाळ जुळलेला नेता गेल्याचे मला दुःख आहे.
  • राहुल गांधी फिल्लौरजवळील भटियान येथील प्रभज्योतसिंग यांच्या घरी टी-ब्रेकसाठी थांबले.
  • राहुल गांधी यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. आता त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेशिवाय त्याच्याभोवती 250 पंजाब पोलिसांची सुरक्षा राहणार आहे.
  • त्यांच्याजवळ कोणालाही परवानगीशिवाय जाऊ दिले जाणार नाही.
  • हवामानामुळे आजही 7 वाजताच यात्रेला सुरूवात झाली. पहाटे 5.30 वाजल्यापासूनच समर्थक जमा होऊ लागले होते.
  • दुपारी फिल्लौर-गोरया येथे टी-ब्रेक असेल. नंतर दुपारी गोरया ते फगवाडा असा प्रवास होईल. रात्रीचा मुक्काम कुठे असेल. दुसऱ्या दिवशी यात्रा जालंधर शहरात होईल.

दोन दिवसांच्या प्रवासानंतर एक दिवसाचा ब्रेक
राहुल गांधी यांनी 10 जानेवारीपासून पंजाबमध्ये यात्रेला सुरूवात केली. पहिल्या दिवशी फतेहगढ साहिब ते लुधियाना येथील खन्ना असा प्रवास करण्यात आला. दुसऱ्या दिवशी समराळा येथून यात्रेची सुरुवात होऊन समराळा चौकात जाहीर सभेने समारोप झाला. या दिवशी राहुल गांधी सायंकाळी फिरले नाहीत. तेथून दिल्लीला रवाना झाले. 13 जानेवारीला लोहारी उत्सवामुळे यात्रा एक दिवसासाठी थांबविण्यात आली. तर आज पुन्हा पंजाबमध्ये येऊन यात्रा सुरू झाली होती.

यासंबंधित अन्य बातम्या वाचा

भारत जोडो यात्रा लुधियानात:राहुल गांधी म्हणाले- पंजाब देशप्रेम, समरसता आणि संतांची भूमी; दंगलग्रस्तांना ठेवले नजरकैदेत

पंजाबमध्ये राहुल गांधीं यांच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या दिवसाला सुरूवात झाली आहे. यात्रेची आज समराळा चौकातून सुरुवात झाली. त्यांच्यासोबत पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजावादिंग आणि माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी हे देखील उपस्थित होते. यात्रेनंतर आज रात्री राहुल गांधी दिल्लीला जातील. उद्या लोहारीमुळे यात्रेला पूर्णविराम राहणार आहे.