पाकिस्तानच्या नापाक गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर

0
10

श्रीनगर, दि. 5 – जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पूँछच्या दिगवार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि मोर्टर शेलचा मारा केला. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानच्या नापाक हरकतीला चोख प्रत्युत्तर दिले. अजूनही दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु आहे.
भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पाकिस्तानने या सेक्टरमध्ये दुस-यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. 48 तासात पाकिस्तानने चौथ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मंगळवारी राजौरी जिल्ह्यात भीमबेर गालीमध्ये पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता.राजौरी-पूँछ जिल्ह्यात 24 तासात पाकिस्तानने तिस-यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.