माजी खासदार बोपचेंसह आ.गाणार व जायस्वाल सुरक्षित
मुंबई,दि.29 – मुंबई – कसारा घाटाजवळ दुरंतो एक्सप्रेस रुळावरुन घसरले आहेत. नागपूरकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या या गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरले आहेत. आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानकादरम्यान रुळावर पावसामुळे दगड-माती आल्यामुळे सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. जोरदार पाऊस आणि धुक्यामुळे चालकाला आंदाज आला नाही. चालकानं प्रसंगावधान दाखवून लगेच ब्रेक लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. विशेष म्हणजे अपघात झालेल्या डब्यामध्ये भंडारा-गोंदियाचे माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय राजकीय समन्वयक डा.खुशाल बोपचे, शिक्षक आमदार ना.गो.गाणार आणि रामटेकचे माजी आमदार आशिष जायस्वाल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे गोंदिया जिल्हा महासचिव रविकांत बोपचे हे सुध्दा होते.या अपघातात जिवितहानी कुठलीही झाली नसून सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती माजी खासदार डाॅ.बोपचे यांनी बेरार टाईम्स शी बोलतांना दिली.सर्व आजी माजी लोकप्रतिनिधीही सुरक्षित असून रेल्वेप्रशासनाने लगेच सहकार्याला सुरवात केल्याचेही सांगितले.अपघाताच्या वेळी सुद्धा पाऊस सुरूच असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. विशेष म्हणजे, देशात रेल्वे अपघाताची 10 दिवसांतील ही तिसरी मोठी घटना आहे.
इंजिन, ए.च – 1, ए 1 आणि ए 2 यासह 9 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. यामुळे मुंबईकडे येणारी अप आणि-डाऊन मार्गावरील रेल्वेवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातात कोणत्याही जिवीतहानी झालेली नोही. मात्र अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. रुळावरुन घसरलेल्या डब्ब्यातून जखमी प्रवाशांना बाहेर काढत असल्याचे चित्र सध्या तिथे आहे. रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. या अपघातामूळे मुंबई-नागपूर मार्गावरील रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली आहे.सकाळी साडेसहापासून वाहतूक ठप्प झाल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. घसरलेले डबे हटविण्यासाठी रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, आज दिवसभर वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता आहे. कल्याण टिटवाळ्या दरम्यान कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसची व्यवस्था केल्याची माहिती व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली.
सेवाग्राम एक्स्प्रेस
कल्याण कसारा लोकल रेल्वे वाहतूक सुद्धा विस्कळीत
हेल्पलाईन नंबर ठाणे – 022-25334840
हेल्पलाईन नंबर कल्याण – 0251– 2311499
हेल्पलाईन नंबर नागपूर – 0712-2564342